लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : शालेय विद्यार्थ्यांना केंद्रीस्तरीय, तालुका व जिल्हा स्तरावर जाऊन शिक्षण घेता यावे, यासाठी मानव विकास मिशनची बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणच्या बसेस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद आहेत. धानोरा-रांगी मार्गावरील बस मागील दीड महिन्यापासून बंद असल्याने या मार्गे प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.धानोरा-रांगी मार्गावरील बस मागील दीड महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे या मार्गे शिक्षणासाठी ये-जा करणाºया विद्यार्थ्यांना तसेच अन्य प्रवाशांना खासगी प्रवाशी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी प्रवाशी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी भरणा केला जातो. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. धानोरा-रांगी मार्गावरून एसटी महामंडळाच्या बसेस व खासगी प्रवाशी वाहने ये-जा करीत असतात. परंतु अतिवृष्टीमुळे सदर मार्गाची दुरवस्था झाली. परिणामी या मार्गावरील महामंडळाची बससेवा बंद झाली. परंतु खासगी प्रवाशी वाहतूक सुरू आहे. ढवळी, वाघभूमी, मोहली, रांगी या पर्यायी मार्गाने खासगी वाहतूक सुरू आहे. हा मार्ग दहा किमीचा आहे.शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी २०१२ मध्ये मॉडेल सुरू केले. येथे इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत वर्ग असून १५१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी ९० ते ९५ विद्यार्थी बाहेरगावाहून ये-जा करतात. धानोरा येथून ४० ते ४५ विद्यार्थी दररोज मोहली येथे शिक्षणाकरिता येतात. तसेच रांगी परिसरातून ३० ते ४० विद्यार्थी धानोरा येथे शाळा व महाविद्यालयीन शिक्षणाकरिता येतात. बसफेरी बंद असल्याने खासगी वाहनांमध्ये कोंबून नेले जात असल्याने विद्यार्थीही त्रस्त झाले आहेत.पाठपुरावा करूनही दुर्लक्षमोहली येथील मॉडेल स्कूलच्या मुख्याध्यापकांनी बस आगार तसेच तहसीलदारांना निवेदन देऊन मोहली मार्गे बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली होती. परंतु रस्ता खराब असल्याचे कारण दाखविण्यात आले. ज्या मार्गाने खासगी प्रवाशी वाहतूक सुरू आहे. त्या मार्गाने एसटी बस का जाऊ शकत नाही, असा सवालही पालकांनी केला आहे.
बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST
शालेय विद्यार्थ्यांना केंद्रीस्तरीय, तालुका व जिल्हा स्तरावर जाऊन शिक्षण घेता यावे, यासाठी मानव विकास मिशनची बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणच्या बसेस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बंद आहेत. धानोरा-रांगी मार्गावरील बस मागील दीड महिन्यापासून बंद असल्याने या मार्गे प्रवास करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
बसअभावी विद्यार्थ्यांचे हाल
ठळक मुद्देरांगी बस दीड महिन्यांपासून बंद : खासगी वाहनातून धोकादायक प्रवास