शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी खरीप पिकांची स्थिती समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती सर्वसाधारण चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस कहर करीत आहे. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेकांनी धान कापले नाही. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजत आहेत. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे.

ठळक मुद्देपीक पाहणी अहवाल : सर्वच तालुक्यांमधील पैसेवारी ५० च्या वर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महसूल व कृषी विभागाने आॅक्टोबर महिन्यात केलेल्या पाहणीत पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ६७ पैसे आढळून आली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. राज्यभरातील खरीप पिकांची नेमकी स्थिती कशी आहे, याचा अंदाज येण्यासाठी सप्टेंबर महिन्यात नजर अंदाज पैसेवारी काढली जाते. याला हंगामी पैसेवारी सुद्धा असे म्हटले आहे. या पैसेवारीचा अहवाल १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला. यामध्ये जिल्ह्यातील खरीप पिकांची पैसेवारी सरासरी ६९ टक्के आढळून आली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाहणी करण्यात आली. त्यामध्ये पिकांची स्थिती थोडी कमकुवत आढळून आली. त्यामुळे सरासरी पैसेवारी ६७ टक्के दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे १२ ही तालुक्यातील पैसेवारी ५० टक्केपेक्षा अधिक आढळून आली आहे. ५० टक्केपेक्षा अधिक उत्पादन झाल्यास पीक परिस्थिती सर्वसाधारण चांगली असल्याचा अंदाज शासनाकडून वर्तविला जाते. ५० टक्केपेक्षा अधिक पैसेवारी असल्यास संबंधित जिल्हा किंवा तालुक्याला शासनाकडून दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले जात नाही. कृषी विभाग व महसूल विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक चांगली पिकांची स्थिती देसाईगंज तालुक्यातील असल्याचे म्हटले आहे. या तालुक्याची पैसेवारी ७६ दाखविण्यात आली आहे. तर भामरागड तालुक्यातील पैसेवारी सर्वात कमी ५७ एवढी दाखविण्यात आली आहे.परतीच्या पावसामुळे अंतिम पैसेवारी घटण्याची शक्यताऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती सर्वसाधारण चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस कहर करीत आहे. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेकांनी धान कापले नाही. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजत आहेत. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. सुरूवातीपासून जवळपास अडीच महिने पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीन, कापूस पिकाचीही वाढ खुंटली आहे. काही कपाशीचे पीक पाण्यामुळे कुजून गेले. नोव्हेंबर महिन्यात पिकांची अंतिम पाहणी केली जाणार आहे व त्याचा अहवाल १ डिसेंबर रोजी प्रकाशित केला जाणार आहे. या अंतिम पाहणीत पैसेवारी घटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती