शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

यावर्षी खरीप पिकांची स्थिती समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती सर्वसाधारण चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस कहर करीत आहे. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेकांनी धान कापले नाही. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजत आहेत. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे.

ठळक मुद्देपीक पाहणी अहवाल : सर्वच तालुक्यांमधील पैसेवारी ५० च्या वर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महसूल व कृषी विभागाने आॅक्टोबर महिन्यात केलेल्या पाहणीत पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ६७ पैसे आढळून आली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. राज्यभरातील खरीप पिकांची नेमकी स्थिती कशी आहे, याचा अंदाज येण्यासाठी सप्टेंबर महिन्यात नजर अंदाज पैसेवारी काढली जाते. याला हंगामी पैसेवारी सुद्धा असे म्हटले आहे. या पैसेवारीचा अहवाल १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला. यामध्ये जिल्ह्यातील खरीप पिकांची पैसेवारी सरासरी ६९ टक्के आढळून आली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाहणी करण्यात आली. त्यामध्ये पिकांची स्थिती थोडी कमकुवत आढळून आली. त्यामुळे सरासरी पैसेवारी ६७ टक्के दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे १२ ही तालुक्यातील पैसेवारी ५० टक्केपेक्षा अधिक आढळून आली आहे. ५० टक्केपेक्षा अधिक उत्पादन झाल्यास पीक परिस्थिती सर्वसाधारण चांगली असल्याचा अंदाज शासनाकडून वर्तविला जाते. ५० टक्केपेक्षा अधिक पैसेवारी असल्यास संबंधित जिल्हा किंवा तालुक्याला शासनाकडून दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले जात नाही. कृषी विभाग व महसूल विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक चांगली पिकांची स्थिती देसाईगंज तालुक्यातील असल्याचे म्हटले आहे. या तालुक्याची पैसेवारी ७६ दाखविण्यात आली आहे. तर भामरागड तालुक्यातील पैसेवारी सर्वात कमी ५७ एवढी दाखविण्यात आली आहे.परतीच्या पावसामुळे अंतिम पैसेवारी घटण्याची शक्यताऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती सर्वसाधारण चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस कहर करीत आहे. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेकांनी धान कापले नाही. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजत आहेत. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. सुरूवातीपासून जवळपास अडीच महिने पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीन, कापूस पिकाचीही वाढ खुंटली आहे. काही कपाशीचे पीक पाण्यामुळे कुजून गेले. नोव्हेंबर महिन्यात पिकांची अंतिम पाहणी केली जाणार आहे व त्याचा अहवाल १ डिसेंबर रोजी प्रकाशित केला जाणार आहे. या अंतिम पाहणीत पैसेवारी घटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती