शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

यावर्षी खरीप पिकांची स्थिती समाधानकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

ऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती सर्वसाधारण चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस कहर करीत आहे. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेकांनी धान कापले नाही. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजत आहेत. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे.

ठळक मुद्देपीक पाहणी अहवाल : सर्वच तालुक्यांमधील पैसेवारी ५० च्या वर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महसूल व कृषी विभागाने आॅक्टोबर महिन्यात केलेल्या पाहणीत पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ६७ पैसे आढळून आली आहे.यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ७७ हजार ८८१ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यावर्षी सुरूवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने धानपिकाची स्थिती चांगली आहे. रोगराई सुद्धा कमी प्रमाणात आहे. राज्यभरातील खरीप पिकांची नेमकी स्थिती कशी आहे, याचा अंदाज येण्यासाठी सप्टेंबर महिन्यात नजर अंदाज पैसेवारी काढली जाते. याला हंगामी पैसेवारी सुद्धा असे म्हटले आहे. या पैसेवारीचा अहवाल १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाला. यामध्ये जिल्ह्यातील खरीप पिकांची पैसेवारी सरासरी ६९ टक्के आढळून आली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पाहणी करण्यात आली. त्यामध्ये पिकांची स्थिती थोडी कमकुवत आढळून आली. त्यामुळे सरासरी पैसेवारी ६७ टक्के दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे १२ ही तालुक्यातील पैसेवारी ५० टक्केपेक्षा अधिक आढळून आली आहे. ५० टक्केपेक्षा अधिक उत्पादन झाल्यास पीक परिस्थिती सर्वसाधारण चांगली असल्याचा अंदाज शासनाकडून वर्तविला जाते. ५० टक्केपेक्षा अधिक पैसेवारी असल्यास संबंधित जिल्हा किंवा तालुक्याला शासनाकडून दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले जात नाही. कृषी विभाग व महसूल विभागाने केलेल्या पाहणीत सर्वाधिक चांगली पिकांची स्थिती देसाईगंज तालुक्यातील असल्याचे म्हटले आहे. या तालुक्याची पैसेवारी ७६ दाखविण्यात आली आहे. तर भामरागड तालुक्यातील पैसेवारी सर्वात कमी ५७ एवढी दाखविण्यात आली आहे.परतीच्या पावसामुळे अंतिम पैसेवारी घटण्याची शक्यताऑक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत धानाची स्थिती सर्वसाधारण चांगली होती. हलके धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पाऊस कहर करीत आहे. त्यामुळे १५ दिवसांचा कालावधी उलटूनही अनेकांनी धान कापले नाही. कापलेल्या धानाच्या कडपा बांधितच कुजत आहेत. वादळवाऱ्यामुळे जड धान कोसळून पडले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. सुरूवातीपासून जवळपास अडीच महिने पाऊस पडला. त्यामुळे सोयाबीन, कापूस पिकाचीही वाढ खुंटली आहे. काही कपाशीचे पीक पाण्यामुळे कुजून गेले. नोव्हेंबर महिन्यात पिकांची अंतिम पाहणी केली जाणार आहे व त्याचा अहवाल १ डिसेंबर रोजी प्रकाशित केला जाणार आहे. या अंतिम पाहणीत पैसेवारी घटण्याची शक्यता आहे.

टॅग्स :agricultureशेती