शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

संगणक शिक्षक झाले बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 23:21 IST

राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आयसीटी (इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी) हा विषय शिकविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने २००८ पासून आयसीटी योजना सुरू केली.

ठळक मुद्देशासनाने आयसीटी योजना गुंडाळली : कंपन्यांशी असलेला करारनामा संपुष्टात

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आयसीटी (इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी) हा विषय शिकविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने २००८ पासून आयसीटी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत विविध कंपन्यांशी करार करून राज्यभरातील शाळांमध्ये तब्बल आठ हजार संगणक शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती केली. दरवर्षी संबंधित कंपन्यांकडून सदर शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने पुनर्नियुक्ती केली जाते, पण आता १५ वर्षांच्या सेवेनंतर शासनाने नवीन वर्षासाठी आयसीटी योजना चालविणाऱ्या कंपन्यांशी करारच केला नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ७३ शिक्षकांसह राज्यभरातील आठ हजार शिक्षकांवर १५ डिसेंबरपासून बेरोजगारीचे संकट कोसळले आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर व संगणकाचे ज्ञान देण्यासाठी शासनाने २००८ मध्ये आयसीटी योजना सुरू केली होती. शासनाने संगणक शिक्षकांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे या मागणीसाठी आयटी शिक्षक संघटनेमार्फत अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान मोर्चाही काढला होता. त्यावेळी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी संगणक शिक्षकांना बेरोजगार होऊ देणार नाही, त्यांना सेवेत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले होते. मात्र त्यानंतर शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भात कुठलीही कार्यवाही झाली नाही.आता कंपन्यांशी केलेला शासनाचा करार संपल्याने या संगणक शिक्षकांची सेवा संपुष्टात आली आहे. १५ डिसेंबरपासून ‘काम नाही, तर वेतन नाही’ अशा समस्येत राज्यभरातील संगणक शिक्षक सापडले आहेत. आयसीटी योजनेअंतर्गत २०१३ पासून संगणक शिक्षणाचा तिसरा टप्पा सुरू होता. या तीनही टप्प्यात नियुक्त झालेले शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत होते. परंतू आता कंपन्यांशी असलेला पाच वर्षांचा तिसºया टप्प्याचा करार संपुष्टात आल्याने सर्व आयसीटी शिक्षक बेरोजगार झाले आहेत.मुंबईत आंदोलनाचा इशाराआयसीटी योजनेअंतर्गत आतापर्यंत कार्यरत असलेल्या संगणक शिक्षकांच्या शिष्टमंडळाने गडचिरोलीच्या जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन सदर संगणक शिक्षकांना आपल्या कार्यालयामार्फत मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. परंतू त्याबाबत अद्याप त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. १५ वर्षाच्या सेवेनंतर शासनाने घेतलेल्या भूमिकेविरूद्ध न्याय मागण्यासाठी येत्या २ फेब्रुवारी २०१९ रोजी मुंबई येथे आंदोलन करण्याचा इशारा आयसीटी शिक्षक संघटनेने दिला असल्याचे राजेंद्र मुनघाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षक