शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणाची दोन हजार कामे पूर्ण

By admin | Updated: July 21, 2015 02:17 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सहा विभागांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १

गडचिरोली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सहा विभागांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ९५८ जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली असून ४२७ कामे अपूर्ण आहेत. पावसाळा सुरू झाल्याने सध्या जलसंधारणाच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे उर्वरित कामे पावसाळ्यानंतर केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच जलव्यवस्थापन संदर्भात राज्याला पूर्णपणे सक्षम करण्यासाठी राज्याच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने यंदा २०१५-१६ या वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हाती घेण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात जिल्ह्यातील १५२ गावांची निवड करण्यात आली. या १५२ गावांमध्ये एकूण ४ हजार ११८ जलसंधारणाची कामे मंजूर करण्यात आली. यापैकी यंदा प्रशासनाच्या वतीने एकूण २ हजार ३८५ कामांना सुरूवात करण्यात आली. यापैकी सद्य:स्थितीत १ हजार ९५८ कामे पूर्ण झाले आहे. तर ४२७ कामे अपूर्ण आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी, वन, लघुसिंचाई, पंचायत समिती, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जलसंधारणाची कामे घेण्यात आली. जलयुक्त शिवार अभियान २०१५ ते २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १५२ गावांमध्ये २ हजार ३८५ कामे सुरू करण्यात आली. यापैकी १ हजार ९५८ कामे पूर्ण करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कामांवर ३२ कोटींचा खर्चजलयुक्त शिवार अभियानांतर्गत १५२ गावातील एकूण ४ हजार ११८ कामांसाठी शासनाने १०८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. विविध विभागाने या कामांवर लाखो रूपये खर्च केले असून आतापर्यंत सर्व विभाग मिळून जलसंधारणाच्या कामांवर ३२ कोटी रूपये खर्च झाले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. ३० जून होती अखेरची डेडलाईनजलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या १५२ गावातील विविध विभागाच्या वतीने घेण्यात आलेली जलसंधारणाची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करावयाची होती. जून महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत तसे निर्देश राज्याचे उपायुक्त हेमंतकुमार पवार यांनी दिले होते. मात्र अनेक कामे अपूर्ण आहेत.कृषी विभाग आघाडीवरजलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या मनरेगा विभागाने ३२१, वन विभागाने ४७५, जि.प. सिंचाई विभागाने १२८, लघू सिंचाई विभागाने १२ व चंद्रपूर लघू सिंचाई विभागाने केवळ एक काम पूर्ण केले आहे. कृषी विभागाने सर्वाधिक १ हजार १२१ कामे पूर्ण करून जलयुक्त शिवार अभियानात आघाडी घेतली आहे. विभागनिहाय अपूर्ण कामेकृषी विभाग २८जिल्हा परिषद मनरेगा१३६वन विभाग१५५जि.प. सिंचन९१लघुसिंचन १५लघुसिंचन चंद्रपूर०२