शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

जलसंधारणाची दोन हजार कामे पूर्ण

By admin | Updated: July 21, 2015 02:17 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सहा विभागांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १

गडचिरोली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सहा विभागांतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ९५८ जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आली असून ४२७ कामे अपूर्ण आहेत. पावसाळा सुरू झाल्याने सध्या जलसंधारणाच्या कामाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे उर्वरित कामे पावसाळ्यानंतर केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच जलव्यवस्थापन संदर्भात राज्याला पूर्णपणे सक्षम करण्यासाठी राज्याच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने यंदा २०१५-१६ या वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हाती घेण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात जिल्ह्यातील १५२ गावांची निवड करण्यात आली. या १५२ गावांमध्ये एकूण ४ हजार ११८ जलसंधारणाची कामे मंजूर करण्यात आली. यापैकी यंदा प्रशासनाच्या वतीने एकूण २ हजार ३८५ कामांना सुरूवात करण्यात आली. यापैकी सद्य:स्थितीत १ हजार ९५८ कामे पूर्ण झाले आहे. तर ४२७ कामे अपूर्ण आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी, वन, लघुसिंचाई, पंचायत समिती, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जलसंधारणाची कामे घेण्यात आली. जलयुक्त शिवार अभियान २०१५ ते २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १५२ गावांमध्ये २ हजार ३८५ कामे सुरू करण्यात आली. यापैकी १ हजार ९५८ कामे पूर्ण करण्यात आली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)कामांवर ३२ कोटींचा खर्चजलयुक्त शिवार अभियानांतर्गत १५२ गावातील एकूण ४ हजार ११८ कामांसाठी शासनाने १०८ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. विविध विभागाने या कामांवर लाखो रूपये खर्च केले असून आतापर्यंत सर्व विभाग मिळून जलसंधारणाच्या कामांवर ३२ कोटी रूपये खर्च झाले असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे. ३० जून होती अखेरची डेडलाईनजलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड करण्यात आलेल्या १५२ गावातील विविध विभागाच्या वतीने घेण्यात आलेली जलसंधारणाची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करावयाची होती. जून महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत तसे निर्देश राज्याचे उपायुक्त हेमंतकुमार पवार यांनी दिले होते. मात्र अनेक कामे अपूर्ण आहेत.कृषी विभाग आघाडीवरजलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या मनरेगा विभागाने ३२१, वन विभागाने ४७५, जि.प. सिंचाई विभागाने १२८, लघू सिंचाई विभागाने १२ व चंद्रपूर लघू सिंचाई विभागाने केवळ एक काम पूर्ण केले आहे. कृषी विभागाने सर्वाधिक १ हजार १२१ कामे पूर्ण करून जलयुक्त शिवार अभियानात आघाडी घेतली आहे. विभागनिहाय अपूर्ण कामेकृषी विभाग २८जिल्हा परिषद मनरेगा१३६वन विभाग१५५जि.प. सिंचन९१लघुसिंचन १५लघुसिंचन चंद्रपूर०२