शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड संपर्कात, आता आरोग्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

यावर्षीच्या पुराने २०१० च्या महापुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाल्याचा अनुभव अनेक नागरिक सांगत आहेत. नगरातील मध्य बाजारपेठ, आंबेडकर वार्ड, आयटीआय व शोभानगरमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पहाटेची वेळ असल्याने मध्य बाजारपेठ वगळता गावातील इतर नागरिक गाढ झोपेत होते.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांची भेट : घरे, दुकानांच्या तळमजल्यावर चिखल

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहात असल्याने गेल्या आठवडाभरापासून संपर्काबाहेर असलेल्या आणि गावात पाणी शिरल्याने हाह:कार उडालेल्या भामरागडला मंगळवारी सकाळी दिलासा मिळाला. गावातील पाणी ओसरण्यासोबतच पर्लकोटावरील पुलाने मोकळा श्वास घेतल्याने नागरिकांचा आणि प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. आता गावात स्वच्छता ठेवण्यासोबत शुद्ध पाणी पुरवठा करणे आणि आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेण्याचे आव्हान कायम आहे.यावर्षीच्या पुराने २०१० च्या महापुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाल्याचा अनुभव अनेक नागरिक सांगत आहेत. नगरातील मध्य बाजारपेठ, आंबेडकर वार्ड, आयटीआय व शोभानगरमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पहाटेची वेळ असल्याने मध्य बाजारपेठ वगळता गावातील इतर नागरिक गाढ झोपेत होते. अशातच पाणी शिघ्र गतीने वाढत असल्याने घरातील सामान काढण्यासाठीही नागरिकांना वेळ मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांचा जीव वाचला असला तरी मोठे नुकसान झाले आहे. घरातील अन्नधान्य खराब झाले, गाळ व कचºयाची दुर्गंधी येवू नये आणि बीमारी पसरू नये या हेतूने तहसीलदार कैलास अंडील, एसडीपीओ डॉ. कुणाल सोनवने यांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरूवात झाली.लोकबिरादरी टीमचे श्रमदानतब्बल पाच दिवसांनी १० सप्टेंबरला सकाळी ९ वाजता नदीपुलावरील पूर ओसरला. मात्र भामरागडमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरून दुर्गंधी पसरल्याने रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार अंडील यांनी श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन सर्वांना केले. त्याला प्रतिसाद देत हेलकसा येथील लोकबिरादरी टीमने अनिकेत आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राचार्य डॉ.विलास तळवेकर व सचिन मुक्कावार यांच्या नेतृत्वात श्रमदान केले. यात लोकबिरादरीतील कर्मचारी व कार्यकर्ते तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे काही विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी साचलेला गाळ उचलला. चिखलाने घसरण झालेला रस्ता पाण्याने धुवून काढला. बाजारपेठेत साचलेला कचरा उचलला. स्थानिक दुकानदारांना सामान हलविण्यास मदतही केली. या टीममध्ये मुख्याध्यापक शरिफ शेख, अधीक्षक अशोक चापले, क्र ीडा शिक्षक विवेक दुबे, प्रा.गिरीश कुलकर्णी, प्रा.खुशाल पवार, शिक्षक सुरेश गुट्टेवार, तुषार कापगते, जमीर शेख, श्रीराम झोडे, प्रकल्पातील कार्यकर्ते प्रफुल्ल पवार, अशोक गायकवाड, केतन फडणीस, गोपाळ बारदेव, दीपक मेश्राम, गणेश हिवरकर आदींचा सहभाग होता. मुकेश ठेकेदार यांनी स्वत:चे डिजेल इंजिन लावून पाण्याची सोय करून दिली आणि पूर्णवेळ श्रमदानही केले. 

टॅग्स :floodपूरRainपाऊस