शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

गाव विकासासाठी एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 23:24 IST

राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन चांगले काम करावे, चांगल्या कामातून ग्रामस्थांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.

ठळक मुद्देखासदारांचे आवाहन : कुनघाडात पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन

आॅनलाईन लोकमततळोधी (मो.) : राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन चांगले काम करावे, चांगल्या कामातून ग्रामस्थांनी गावाचा विकास साधावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले.कुनघाडा (रै.) ग्रामपंचायत आवारात कुनघाडा (रै.), नवेगाव (रै.) व तळोधी (मो.) या तीन गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या भूमीपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते उद्घाटक बोलत होते. यावेळी मंचावर सहउद्घाटक आ. डॉ. देवराव होळी तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आ. कृष्णा गजबे, माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, नगराध्यक्ष योगीता पिपरे, सरपंच अविनाश चलाख, पं.स. सभापती आनंद भांडेकर, पं. स. सदस्य सुभाष वासेकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, तळोधीच्या सरपंच माधुरी सुरजागडे, नामदेव उडाण, जि.प. सदस्य रमेश बारसागडे, बाबुराव कुकुडे, संतोष भांडेकर, जलप्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता संजय वाघ, श्रावण भांडेकर, उपसरपंच दुधबळे, मीना कोडाप, दिलीप चलाख आदी मान्यवर उपस्थित होते.शनिवारी खा. अशोक नेते यांच्या हस्ते प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन ग्रामपंचायतीच्या आवारात करण्यात आले. पुढे बोलताना खा. नेते म्हणाले, सरकारच्या निर्देशानुसार ग्राम आराखडा पाच वर्षांचा बनवून त्यानुसार विकास कामे होऊ शकतात. त्यादृष्टीने सरकारचे प्रयत्न असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाच बंधारे पूर्णत्वास आले असून यापुढेही सिंचन सुविधेवर भर राहणार आहे. वन विभागाच्या अटी दूर होताच रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार आहे, असे नेते यांनी सांगितले. सदर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वॉटर फिल्टर सुविधेमुळे तीन गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाबाबत विद्यमान केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता संजय वाघ, संचालन जि.प. सदस्य रमेश बारसागडे यांनी केले तर आभार अभियंता अभय कोतपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व नागरिक उपस्थित होते.