शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

गावाच्या विकासासाठी पुढे या

By admin | Updated: December 9, 2015 01:57 IST

कासवी गावातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी रोजगार क्षेत्रात संधी निर्माण करणे आवश्यक आहे.

मान्यवरांचे आवाहन : दत्तक ग्राम कासवी येथील ग्रामसभेत गाव विकासावर झाली चर्चाआरमोरी : कासवी गावातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी रोजगार क्षेत्रात संधी निर्माण करणे आवश्यक आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी सर्व गावकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांनी केले. गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय आरमोरीने दत्तक ग्राम योजनेंतर्गत तालुक्यातील कासवी हे गाव विकासासाठी दत्तक घेतले. या अनुषंगाने समन्वय समितीच्या उपस्थितीत शनिवारी कासवी येथे ग्राम पंचायतीच्या सभागृहात पहिली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी डॉ. खालसा बोलत होते. यावेळी मंचावर कासवीच्या सरपंच पुष्पलता तिवाडे, उपसरपंच प्रवीण रहाटे, ग्रामसेवक जवंजालकर उपस्थित होते. या ग्रामसभेत कासवी गावाच्या विकासासंदर्भात सर्व क्षेत्राच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. गावकऱ्यांनी महाविद्यालय व विद्यार्थ्यांना सहकार्य करून कासवी गावाचा कायापालट करण्यासाठी नेहमी सहकार्याची भूमिका बजावावी, असे आवाहन सरपंच पुष्पलता तिवाडे व उपसरपंच प्रवीण रहाटे यांनी केले. याप्रसंगी दत्तक ग्राम विकासासाठी संयुक्त कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा तर सदस्य म्हणून सरपंच पुष्पलता तिवाडे, उपसरपंच प्रवीण रहाटे, रितेश सडमाके, आशा कानतोडे, आसाराम प्रधान, अजय गुरनुले, शेषराव कुमोटी, चंद्रकांत दोनाडकर, उदाराम दिगोरे, प्रा. शशिकांत गेडाम, प्रा. ज्ञानेश ठाकरे, प्रा. गंगाधर जुआरे, प्रा. डॉ. अमिता बन्नोरे, प्रा. डॉ. विजय गोरडे, प्रा. मेश्राम यांचा समावेश आहे. संचालन प्रा. शशिकांत गेडाम यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)