शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

कोचीनारा ग्रामपंचायतीने मिळवले आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

जिल्हा मुख्यालयापासून १२० किमी लांब असलेल्या नक्षलग्रस्त, डोंगराळ व दुर्गम भागातील पेसा ग्रामपंचायत असलेल्या कोचीनाराने आयएसओ मानांकन पटकावले आहे. हा बहुमान पटकावणारी तालुक्यातील पहिली, तसेच नवीन आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यापूर्वी या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, महाआवास अभियान पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये आता आयएसओ मानांकनाची भर पडली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : जिल्हा मुख्यालयापासून १२० किमी लांब असलेल्या नक्षलग्रस्त, डोंगराळ व दुर्गम भागातील पेसा ग्रामपंचायत असलेल्या कोचीनाराने आयएसओ मानांकन पटकावले आहे. हा बहुमान पटकावणारी तालुक्यातील पहिली, तसेच नवीन आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यापूर्वी या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, महाआवास अभियान पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये आता आयएसओ मानांकनाची भर पडली आहे. दिनांक ४ मे २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय कोचीनारा येथे आएसओ मानांकन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर आयएसओ लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, तर प्रमुख अतिथी म्हणून कोरचीचे तहसीलदार छगनलाल भंडारी, गटविकास अधिकारी राजेश फाये, काँग्रेसचे जिल्हा महासचिव मनोज अग्रवाल, मुख्याध्यापक शालिक कराडे, आशिष अग्रवाल, बेतकाठीच्या सरपंच कुती हुपुंडी, नागपूरचे आयएसओ ऑडिटर विनोद कोल्हे व शुभम मारबते, सरपंच सुनीता मडावी, उपसरपंच रुपराम देवांगण, ग्रामसेवक दामोदर पटले, पोलीस पाटील श्रावण घावडे, ग्रामसेवक संघटनेने विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.गटविकास अधिकारी राजेश फाये यांनी ग्रा.पं.ला शुभेच्छा देत तालुक्यातील इतरही ग्रामपंचायतींनी कोचीनाराचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. सरपंच सुनीता मडावी यांनी ग्रामसेवक दामोदर पटले यांच्या मागदर्शनाने व सर्व सदस्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पुढेही गावाच्या विकासासाठी कार्य करत राहू, असे सांगितले. या कार्यक्रमासाठी ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारी, ग्रामस्तरीय सर्व कर्मचारी, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांनी परिश्रम घेतले. संचालन हिरामन मेश्राम, तर आभार उपसरपंच रुपराम देवांगण यांनी मानले.

स्वप्न पूर्ण, आता दर्जाही टिकविणारप्रास्ताविकात ग्रामसेवक दामोदर पटले यांनी ग्रामपंचायतीचा जलद गतीने विकास होण्यासाठी ग्रामपंचायत आयएसओ करणे माझे स्वप्न होते, ते आज प्रत्यक्षात साकारले. त्यासाठी ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली. ग्रामपंचायतचा हा आयएसओ दर्जा टिकवणे, गतिमानता व लोकाभिमुख कार्य करणे हे आमचे कर्तव्य असून आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत