शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोचीनारा ग्रामपंचायतीने मिळवले आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

जिल्हा मुख्यालयापासून १२० किमी लांब असलेल्या नक्षलग्रस्त, डोंगराळ व दुर्गम भागातील पेसा ग्रामपंचायत असलेल्या कोचीनाराने आयएसओ मानांकन पटकावले आहे. हा बहुमान पटकावणारी तालुक्यातील पहिली, तसेच नवीन आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यापूर्वी या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, महाआवास अभियान पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये आता आयएसओ मानांकनाची भर पडली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : जिल्हा मुख्यालयापासून १२० किमी लांब असलेल्या नक्षलग्रस्त, डोंगराळ व दुर्गम भागातील पेसा ग्रामपंचायत असलेल्या कोचीनाराने आयएसओ मानांकन पटकावले आहे. हा बहुमान पटकावणारी तालुक्यातील पहिली, तसेच नवीन आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. यापूर्वी या ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार, महाआवास अभियान पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये आता आयएसओ मानांकनाची भर पडली आहे. दिनांक ४ मे २०२२ रोजी ग्रामपंचायत कार्यालय कोचीनारा येथे आएसओ मानांकन सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर आयएसओ लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, तर प्रमुख अतिथी म्हणून कोरचीचे तहसीलदार छगनलाल भंडारी, गटविकास अधिकारी राजेश फाये, काँग्रेसचे जिल्हा महासचिव मनोज अग्रवाल, मुख्याध्यापक शालिक कराडे, आशिष अग्रवाल, बेतकाठीच्या सरपंच कुती हुपुंडी, नागपूरचे आयएसओ ऑडिटर विनोद कोल्हे व शुभम मारबते, सरपंच सुनीता मडावी, उपसरपंच रुपराम देवांगण, ग्रामसेवक दामोदर पटले, पोलीस पाटील श्रावण घावडे, ग्रामसेवक संघटनेने विभागीय उपाध्यक्ष प्रदीप भांडेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.गटविकास अधिकारी राजेश फाये यांनी ग्रा.पं.ला शुभेच्छा देत तालुक्यातील इतरही ग्रामपंचायतींनी कोचीनाराचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. सरपंच सुनीता मडावी यांनी ग्रामसेवक दामोदर पटले यांच्या मागदर्शनाने व सर्व सदस्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पुढेही गावाच्या विकासासाठी कार्य करत राहू, असे सांगितले. या कार्यक्रमासाठी ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारी, ग्रामस्तरीय सर्व कर्मचारी, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांनी परिश्रम घेतले. संचालन हिरामन मेश्राम, तर आभार उपसरपंच रुपराम देवांगण यांनी मानले.

स्वप्न पूर्ण, आता दर्जाही टिकविणारप्रास्ताविकात ग्रामसेवक दामोदर पटले यांनी ग्रामपंचायतीचा जलद गतीने विकास होण्यासाठी ग्रामपंचायत आयएसओ करणे माझे स्वप्न होते, ते आज प्रत्यक्षात साकारले. त्यासाठी ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली. ग्रामपंचायतचा हा आयएसओ दर्जा टिकवणे, गतिमानता व लोकाभिमुख कार्य करणे हे आमचे कर्तव्य असून आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिली.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत