शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रोहयो कामासाठी घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:30 IST

स्थानिक पंचायत समिती अंतर्गत रामगड गट ग्राम पंचायतींमार्फत मागील दोन वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली नाही.

ठळक मुद्देमजूर आक्रमक : ग्रा.पं.कार्यालयात जाऊन रोजगार सेवकाला विचारला जाब

ऑनलाईन लोकमतकुरखेडा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत रामगड गट ग्राम पंचायतींमार्फत मागील दोन वर्षांपासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे हाताला काम नसलेल्या संतप्त नोंदणीकृत मजुरांनी ग्राम पंचायत कार्यालयात धडक देऊन ग्रा. पं. पदाधिकारी व ग्रामरोजगार सेवकाला घेराव घालून या बाबीचा जाब विचारला. दरम्यान यावेळी ताणतणावाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती.रामगड गट ग्राम पंचायतीमध्ये पदाधिकारी, ग्रामरोजगारसेवक यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे ग्रा. पं. ची प्रशासकीय व्यवस्था पूर्णत: ढेपाळली आहे. अंतर्गत वादामुळे मागील चार महिन्यांपासून या ग्राम पंचायतीची मासिक सभा झाली नसल्याची माहिती उजेडात आली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत येथे ८३४ मजुरांची नोंदणी करण्यात आली आहे. ग्रा. पं. च्या आराखड्यात अनेक कामांना मंजुरी आहे. मात्र पदाधिकारी व रोजगारसेवक व ग्रामसेवकांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याने गेल्या दोन वर्षांपासून गावात रोहयोची कामे सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे ८३४ मजूर रोजगारापासून वंचित आहेत. संतप्त मजुरांनी मागील तीन दिवसांपासून ग्राम पंचायतीवर धडक देत पदाधिकारी व ग्रामरोजगारसेवकास जाब विचारत ग्राम पंचायतीला कुलूप ठोकण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.या प्रकरणाची माहिती मिळताच पं. स. उपसभापती मनोज दुनेदार यांनी पंचायत विस्तार अधिकारी पारधी यांच्यासह मंगळवारी ग्रा. पं. कार्यालयाला भेट दिली. यावेळी सरपंच, उपसरपंच व मजुरांची संयुक्त बैठक घेऊन समजूत घातली. पुढील आठवड्यात रोहयोची कामे सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मजुरांनी मागे घेतले.