शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

शेतकऱ्यांचा महावितरणच्या अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:29 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोटारपंपाने पाणीपुरवठा करून धानपीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देपाणीपुरवठ्यासाठी धडपड : सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोटारपंपाने पाणीपुरवठा करून धानपीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. मात्र कुरखेडा तालुक्याच्या आंधळी व सावलखेडा भागात गेल्या आठ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे वीज मोटारपंप जळाले. शिवाय पाणीपुरवठ्याच्या कामात अडचणी येत आहेत. महावितरणच्या वतीने कुठलेही भारनियमन न करता सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुरखेडा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना बुधवारी घेराव केला.२४ तासाच्या आत आंधळी भागात व तालुक्यात सुरळीत वीज पुरवठा करावा, अन्यथा शिवसेना कुरखेडाच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा शिवसैनिकासह संतप्त शेतकºयांनी दिला आहे. कुरखेडाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख डॉ.महेंद्रकुमार मोहबंशी, तालुका प्रमुख आशिष काळे, कामगार सेना जिल्हा प्रमुख नरेंद्र तिरनकर, दशरथ लाडे, विजय पुस्तोडे, दिगांबर नाकाडे, लोमेश कोटांगले, मुजाहिद शेख, केशव भोडे, विठोबा लाकडे, रवींद्र कऱ्हाडे, आसाराम देवारे, रतिराम कºहाडे, विनायक जांभुळकर, तुलाराम टेंभूर्णे, भास्कर कुसाम, भारत जांभुळकर, लक्ष्मण कऱ्हाडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. या भागातील ७० टक्के लोकांची उपजीविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. यंदाही शेकडो शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड केली आहे. धानपीक ऐन गर्भात असताना पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. तालुक्यातील आंधळी, नवरगाव, सोनेरांगी, कऱ्हाडी, सावलखेडा आदीसह लगतच्या गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून महावितरणच्या वतीने कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे.विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे वीज पंपही जळाले आहे. परिणामी पाण्याअभावी शेतकºयांचे धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.