शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

शेतकऱ्यांचा महावितरणच्या अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:29 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोटारपंपाने पाणीपुरवठा करून धानपीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देपाणीपुरवठ्यासाठी धडपड : सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोटारपंपाने पाणीपुरवठा करून धानपीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. मात्र कुरखेडा तालुक्याच्या आंधळी व सावलखेडा भागात गेल्या आठ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे वीज मोटारपंप जळाले. शिवाय पाणीपुरवठ्याच्या कामात अडचणी येत आहेत. महावितरणच्या वतीने कुठलेही भारनियमन न करता सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुरखेडा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना बुधवारी घेराव केला.२४ तासाच्या आत आंधळी भागात व तालुक्यात सुरळीत वीज पुरवठा करावा, अन्यथा शिवसेना कुरखेडाच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा शिवसैनिकासह संतप्त शेतकºयांनी दिला आहे. कुरखेडाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख डॉ.महेंद्रकुमार मोहबंशी, तालुका प्रमुख आशिष काळे, कामगार सेना जिल्हा प्रमुख नरेंद्र तिरनकर, दशरथ लाडे, विजय पुस्तोडे, दिगांबर नाकाडे, लोमेश कोटांगले, मुजाहिद शेख, केशव भोडे, विठोबा लाकडे, रवींद्र कऱ्हाडे, आसाराम देवारे, रतिराम कºहाडे, विनायक जांभुळकर, तुलाराम टेंभूर्णे, भास्कर कुसाम, भारत जांभुळकर, लक्ष्मण कऱ्हाडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. या भागातील ७० टक्के लोकांची उपजीविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. यंदाही शेकडो शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड केली आहे. धानपीक ऐन गर्भात असताना पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. तालुक्यातील आंधळी, नवरगाव, सोनेरांगी, कऱ्हाडी, सावलखेडा आदीसह लगतच्या गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून महावितरणच्या वतीने कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे.विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे वीज पंपही जळाले आहे. परिणामी पाण्याअभावी शेतकºयांचे धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.