शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

शेतकऱ्यांचा महावितरणच्या अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:29 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोटारपंपाने पाणीपुरवठा करून धानपीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देपाणीपुरवठ्यासाठी धडपड : सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडल्या आहेत. परिणामी धानपीक धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत मोटारपंपाने पाणीपुरवठा करून धानपीक वाचविण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. मात्र कुरखेडा तालुक्याच्या आंधळी व सावलखेडा भागात गेल्या आठ दिवसांपासून कमी दाबाचा वीज पुरवठा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे वीज मोटारपंप जळाले. शिवाय पाणीपुरवठ्याच्या कामात अडचणी येत आहेत. महावितरणच्या वतीने कुठलेही भारनियमन न करता सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुरखेडा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना बुधवारी घेराव केला.२४ तासाच्या आत आंधळी भागात व तालुक्यात सुरळीत वीज पुरवठा करावा, अन्यथा शिवसेना कुरखेडाच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढून कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशारा शिवसैनिकासह संतप्त शेतकºयांनी दिला आहे. कुरखेडाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, उपजिल्हा प्रमुख डॉ.महेंद्रकुमार मोहबंशी, तालुका प्रमुख आशिष काळे, कामगार सेना जिल्हा प्रमुख नरेंद्र तिरनकर, दशरथ लाडे, विजय पुस्तोडे, दिगांबर नाकाडे, लोमेश कोटांगले, मुजाहिद शेख, केशव भोडे, विठोबा लाकडे, रवींद्र कऱ्हाडे, आसाराम देवारे, रतिराम कºहाडे, विनायक जांभुळकर, तुलाराम टेंभूर्णे, भास्कर कुसाम, भारत जांभुळकर, लक्ष्मण कऱ्हाडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. या भागातील ७० टक्के लोकांची उपजीविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. यंदाही शेकडो शेतकऱ्यांनी धानपिकाची लागवड केली आहे. धानपीक ऐन गर्भात असताना पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करण्याची धडपड शेतकरी करीत आहेत. तालुक्यातील आंधळी, नवरगाव, सोनेरांगी, कऱ्हाडी, सावलखेडा आदीसह लगतच्या गावांमध्ये गेल्या आठ दिवसांपासून महावितरणच्या वतीने कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत आहे.विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे वीज पंपही जळाले आहे. परिणामी पाण्याअभावी शेतकºयांचे धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.