शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

२२ वर पाणी पुरवठा योजना बंद

By admin | Updated: March 9, 2016 02:18 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गेल्या दोन वर्षात गडचिरोली तालुक्यात एकूण ३२ स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

विद्युत पुरवठ्याचा अभाव : गडचिरोली तालुक्यात पाणी टंचाई तीव्र, अनेक योजनांचे काम अपूर्णदिलीप दहेलकर गडचिरोलीजिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गेल्या दोन वर्षात गडचिरोली तालुक्यात एकूण ३२ स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत. यापैकी नऊ नळ योजनेला विद्युत पुरवठा करण्यात आला नाही. सहा योजनेचे काम बंद आहे. तर काम पूर्ण होऊनही सात योजनेची चाचणी सुरू आहे. याशिवाय अनेक योजनेचे काम तांत्रिक कारणामुळे ठप्प पडले आहे. गडचिरोली तालुक्यात ३२ पैकी केवळ दोन योजनेचा पाणी पुरवठा सुरू आहे. तर आठ योजना मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. पाणी पुरवठा योजनेची विदारक स्थिती असून २२ वर पाणी योजना बंद असल्याने गडचिरोली तालुक्यात आतापासूनच पाणी टंचाईची समस्या प्रचंड तीव्र झाली आहे. मात्र प्रशासन सुस्त आहे. तर दुसरीकडे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे. गडचिरोली तालुक्यात सन २०१४-१५ या वर्षात वार्षिक कृती आराखड्यांतर्गत एकूण १४ नळ पाणी पुरवठा योजनेची कामे हाती घेण्यात आली. यापैकी खुर्सा व कनेरी येथील पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून पाणी पुरवठा सुरू करण्यात आले आहे. मारोडा, साखरा, वाकडी, मुडझा बुज. येथील कामे पूर्ण झाली असून चाचणी सुरू आहे. विशेष म्हणजे, मुडझा बुज. नळ पाणी पुरवठा योजनेंतर्गत ग्रामपंचायत प्रशासनाकडून खासगी नळ जोडण्या करण्यात आल्या नाहीत. चुरचुरा माल, जेप्रा, खरपुंडी, मुरमाडी, हिरापूर, पोटेगाव या योजनांना अद्यापही विद्युत जोडणी करण्यात आली नाही. कोट्यवधी रूपयांचा निधी पाणी पुरवठा योजनेच्या कामावर फस्त झाला आहे. मात्र त्याचा उपयोग सध्या तरी गावातील नागरिकांना होत नसल्याचे दिसून येत आहे.गडचिरोलीतही पाण्यासाठी हाहाकारवैनगंगा नदीतील पाण्याची पातळी खालावल्याने गडचिरोली नगर पालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या पाणी योजनेला अत्यल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. परिणामी गडचिरोली शहरात गेल्या दीड महिन्यापासून दिवसातून केवळ एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. नदी पात्रातील विहिरीतील गाळ उपसणे, बंधारा बांधणे आदीसह इतर कामांची सुरूवात संबंधित कंत्राटदारांनी पाच ते सहा दिवसांपूर्वी केली आहे. सदर काम होण्यासाठी आणखी दीड महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने एप्रिल महिन्यात शहरवासीयांना पाणी टंचाईच्या प्रखर झळा सोसाव्या लागणार आहेत.पालिका प्रशासनाच्या लेटलतीफ कारभारामुळे गडचिरोली शहरात पहिल्यांदाच पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सहा पाणी योजनेचे काम बंदसन २०१५-१६ वर्षात हाती घेण्यात आलेल्या १० पाणी योजनांपैकी सहा नळ योजनांचे काम बंद आहे. यामध्ये गुरवडा, धुंडेशिवणी, दिभना माल, राजगाटा चेक, कोटगल व पारडी कुपी यांचा समावेश आहे. तसेच मौशीखांब व विहिरगाव पाणी योजनेला विद्युत डिमांड प्राप्त आहे. पारडी कुपी पाणी योजनेच्या निधी खर्चात अफरातफरी झाली असल्याने यातील दोषींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात पाणी योजना मंजुरीच्या प्रतीक्षेतवार्षीक कृती आराखडा सन २०१६-१७ अंतर्गत गडचिरोली पंचायत समितीमधील ग्रामपंचायत प्रशासनाने सात नळ पाणी पुरवठा योजना व एका साध्या विहिरीचे काम प्रस्तावित केले. मात्र सदर सर्वच कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. महादवाडी-कुऱ्हाडी, सावरगाव-पेटेडोंगरी, आंबेटोला, इंदाळा, मेंढा या पाच गावातील पाणी योजनेच्या कामास शासनाकडून अद्यापही मंजुरी मिळाली नाही तर कन्हाळगावातील साध्या विहिरीचे कामही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. गोगाव व अमिर्झा या दोन पाणी योजनेच्या कामाचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाणी पुरवठा विभागाच्या विभागीय कार्यालयास सादर करण्यात आले आहे. मात्र अद्यापही मंजुरी मिळाली नाही.