शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

गावातील टिल्लूपंप बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:02 IST

फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षांपासून दर उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होत असताना स्थानिक प्रशासनाने कोणती उपाययोजना केली,.........

ठळक मुद्देवैरागडची ग्रामसभा गाजली : फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईची समस्या

ऑनलाईन लोकमतवैरागड : फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षांपासून दर उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होत असताना स्थानिक प्रशासनाने कोणती उपाययोजना केली, असा प्रश्न उपस्थित करीत गावातील टिल्लूपंप बंद करावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान गावातील पाणी समस्येबरोबरच इतरही प्रश्नांवर ग्रामसभा चांगलीच गाजली.वैरागड येथे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्यां पाणी टंचाई समस्येच्या निवारणासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यक्रमांतर्गत गोरजाई डोहावर पाणीपुरवठा योजना २०१३ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. परंतु या योजनेची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. या योजनेनुसार नवीन पाणीपुरवठा विहीर व फिल्टरेशन गॅलरी, नवीन गृहपंप, नवीन पाईपलाईन, गावात नवीन वितरण व्यवस्था आदींचा समावेश होता. परंतु नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी कुठे मुरले हे समजण्या पलिकडचे होते. नवीन पाणीपुरवठा योजनेची फाईल मंत्रालयात असल्याचे राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेचे अधिकारी सांगतात. ही योजना रखडण्यास संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.सध्या चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचे गावात समान वितरण होत नाही. याला कारण नळधारक आहेत. अनेक कुटुंबात विद्युत टिल्लूपंप वापरले जात असल्याने इतर कुटुंबांना पिण्याचेही पाणी मिळत नाही. त्यामुळे ज्यावेळेत नळ योजनेचा पाणीपुरवठा सुरू असतो. त्यावेळी विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी सरपंच गौरी सोमनानी, उपसरपंच श्रीराम अहीरकर, ग्रा. पं. सदस्य नलिनी आत्राम, नलिनी सहारे, माधुरी बोडणे, संगीता धनकर, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, अतुल मेश्राम, मुनेश्वर मडावी, सुमन खरवडे, राजू आकरे, सुरेंद्र बावनकर, नामदेव धनकर उपस्थित होते.गाळ उपसाची  चौकशी करणारतत्कालीन ग्रामविकास अधिकारी डाखरे यांच्या कार्यकाळात न्यायालयातील गाळ उपसणे व फेकणे या कामाकरिता ३ लाख ६९ हजारांचा खर्च झाला. तरी एका ट्रॅक्टर मालकाचे ५० हजार रूपये देणे बाकी आहे. परंतु उपसलेला गाळ मात्र गायब आहे. याची चौकशी करणार, असे सचिव एन. ए. घुटके यांनी सांगितले.