शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गावातील टिल्लूपंप बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:02 IST

फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षांपासून दर उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होत असताना स्थानिक प्रशासनाने कोणती उपाययोजना केली,.........

ठळक मुद्देवैरागडची ग्रामसभा गाजली : फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईची समस्या

ऑनलाईन लोकमतवैरागड : फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मागील दहा वर्षांपासून दर उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर होत असताना स्थानिक प्रशासनाने कोणती उपाययोजना केली, असा प्रश्न उपस्थित करीत गावातील टिल्लूपंप बंद करावे, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान गावातील पाणी समस्येबरोबरच इतरही प्रश्नांवर ग्रामसभा चांगलीच गाजली.वैरागड येथे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्यां पाणी टंचाई समस्येच्या निवारणासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना कार्यक्रमांतर्गत गोरजाई डोहावर पाणीपुरवठा योजना २०१३ मध्ये कार्यान्वित करण्यात आली. परंतु या योजनेची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. या योजनेनुसार नवीन पाणीपुरवठा विहीर व फिल्टरेशन गॅलरी, नवीन गृहपंप, नवीन पाईपलाईन, गावात नवीन वितरण व्यवस्था आदींचा समावेश होता. परंतु नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी कुठे मुरले हे समजण्या पलिकडचे होते. नवीन पाणीपुरवठा योजनेची फाईल मंत्रालयात असल्याचे राष्टÑीय ग्रामीण पेयजल योजनेचे अधिकारी सांगतात. ही योजना रखडण्यास संबंधित विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.सध्या चालू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचे गावात समान वितरण होत नाही. याला कारण नळधारक आहेत. अनेक कुटुंबात विद्युत टिल्लूपंप वापरले जात असल्याने इतर कुटुंबांना पिण्याचेही पाणी मिळत नाही. त्यामुळे ज्यावेळेत नळ योजनेचा पाणीपुरवठा सुरू असतो. त्यावेळी विद्युत पुरवठा बंद ठेवण्याचा ठराव घेण्यात आला. यावेळी सरपंच गौरी सोमनानी, उपसरपंच श्रीराम अहीरकर, ग्रा. पं. सदस्य नलिनी आत्राम, नलिनी सहारे, माधुरी बोडणे, संगीता धनकर, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, अतुल मेश्राम, मुनेश्वर मडावी, सुमन खरवडे, राजू आकरे, सुरेंद्र बावनकर, नामदेव धनकर उपस्थित होते.गाळ उपसाची  चौकशी करणारतत्कालीन ग्रामविकास अधिकारी डाखरे यांच्या कार्यकाळात न्यायालयातील गाळ उपसणे व फेकणे या कामाकरिता ३ लाख ६९ हजारांचा खर्च झाला. तरी एका ट्रॅक्टर मालकाचे ५० हजार रूपये देणे बाकी आहे. परंतु उपसलेला गाळ मात्र गायब आहे. याची चौकशी करणार, असे सचिव एन. ए. घुटके यांनी सांगितले.