शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अहेरी राजनगरीत स्वच्छतेची ऐसीतैशी

By admin | Updated: May 23, 2017 00:44 IST

राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी शहरात स्वच्छतेची पूर्णपणे वाट लागली आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उभे झाले आहेत.

ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे : नाल्यांचा उपसा रखडला, नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नगर पंचायतीचे दुर्लक्षलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : राजनगरी म्हणून ओळख असलेल्या अहेरी शहरात स्वच्छतेची पूर्णपणे वाट लागली आहे. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उभे झाले आहेत. कचरापेटीमध्ये टाकलेला कचरा नियमितपणे उचलला जात नाही. त्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. कचऱ्यामुळे पावसाळ्यात दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अहेरी उपविभागातील सर्वात मोठे शहर म्हणून अहेरीची ओळख आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत झाले. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पंचायत नियोजनबध्द काम करेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र नगर पंचायत स्थापन होऊन सुध्दा स्वच्छतेच्या बाबतीत कोणताच फरक पडला नाही. पूर्वी प्रमाणेच कचऱ्याचे ढिगारे आजही कायम आहेत. किंबहुना काही वार्डांमध्ये कचऱ्याची समस्या अधिक तीव्र झाली आहे. राजवाडाकडे जाणाऱ्या मार्गावर कचरा पसरला आहे. याच मार्गावर आदिवासी विकासचे वसतिगृह व स्वयंम अपार्टमेंट आहे. येथील नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालयाजवळ कचराकुंडी आहे. सदर कचराकुंडी कचऱ्याने पूर्णपणे भरली आहे. मात्र येथील कचरा उचलण्याकडे नगर पंचायत दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कचराकुंडीच्या सभोवताल कचरा पडला आहे. पावसाळ्यापूर्वी या संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.