शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

घाणीच्या विरोधात नागरिकांचा एल्गार

By admin | Updated: June 23, 2014 00:06 IST

येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये मानव मंदिर परिसरामध्ये दर शनिवारला आठवडी बाजार भरतो. बाजार संपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास येथील विक्रेते नाशवंत ओला भाजीपाला रस्त्यावरच फेकून देतात.

अहेरी : येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये मानव मंदिर परिसरामध्ये दर शनिवारला आठवडी बाजार भरतो. बाजार संपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास येथील विक्रेते नाशवंत ओला भाजीपाला रस्त्यावरच फेकून देतात. ग्रामपंचायत प्रशासन तसेच बाजार कंत्राटदार स्वच्छता करण्याबाबत एकमेकाकडे बोट दाखवीत आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दरम्यान शनिवारी आठवडी बाजारच्या दिवशी या वार्डातील नागरिकांनी ग्रा.पं. प्रशासनाच्या विरोधात आंदोलन पुकारले. दरम्यान काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिणामी दुपारी उशिरापर्यंत बाजार भरू दिला नाही.आठवडी बाजारातील कचरा आठवडाभर रस्त्यावरच सडत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या भागात पावसाळ्यात रोगाची साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्येबाबत ग्रा.पं. सदस्य शैलेश पटवर्धन यांना नागरिकांनी सांगितले. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडे पटवर्धन यांच्या सूचनेकडे पुर्णत: दुर्लक्ष केले. ग्रामपंचायत प्रशासन, कंत्राटदार घाणीच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला. दरम्यान शनिवारी आठवडी बाजाराच्या दिवशी वार्डातील नागरिक एकत्र जमले. जोपर्यंत या परिसरात स्वच्छता करण्यात येत नाही. तोपर्यंत या ठिकाणी एकाही भाजीविक्रेत्यांना बसू देणार नाही, असा पवित्रा नागरिकांनी घेतला. दरम्यान व्रिकेते, ठेकेदार व नागरिकांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. सरपंच गंगाराम कोडापे, उपसरपंच पेदापल्लीवार, सचिव उंदीरवाडे यांनी सदर समस्या लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर बाजार नेहमीप्रमाणे सुरू झाला. (प्रतिनिधी)