शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

नवी नोट मिळविण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकताच

By admin | Updated: November 13, 2016 02:00 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनात असलेली १००० व ५०० ची नोट अचानकपणे रद्द केली.

प्रचंड त्रास : रांगेत उभे राहिलेल्या सर्वसामान्यांची प्रतिक्रियागडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनात असलेली १००० व ५०० ची नोट अचानकपणे रद्द केली. या आता जुन्या झालेल्या नोटा बँकेत जमा करून नवीन दोन हजाराची नोट घेण्यासाठी नागरिकांच्या गेल्या तीन दिवसांपासून बँक परिसरात रांगा लागून आहे. मुंबईसह देशाच्या काही भागात तीन नागरिकांचा नोटा बदलविण्याच्या भानगडीत मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर शनिवारी लोकमतने सकाळपासून रांगेत लागलेल्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया शनिवारी दिवसभर जाणून घेतल्या. अनेक नागरिकांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी उचलले हे स्वागतार्ह पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. गडचिरोली शहरात भारतीय स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्रच्या परिसरात नोटा बदलविण्यासाठी व नवीन नोट घेण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या भावना जाणल्या. यावेळी बोलताना गडचिरोली शहरातील साईनगरचे वसंत गेडाम म्हणाले, जुने नोट बदलण्यासाठी आपण को-आॅपरेटिव्ह बँकेच्या मुख्य शाखेत काल गेलो होतो, परंतु तेथे आपले पैसे बदलले नाही. त्यामुळे आज बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पैसे बदलण्यासाठी आलो. सध्या आपल्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नसल्याने नाईलाजास्तव रांगेत लागावे लागले. काही दिवस सर्वसामान्यांना त्रास होणार असला तरी शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे.साईनगरातीलच गजानन उमरे म्हणाले, सरकारचा प्लॅन अतिशय वाखाणण्याजोगा आहे. रांगेत लागावे लागत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. मात्र काही दिवसच या परिस्थितीतून सर्वसामान्यांना जावे लागणार आहे. खाते नसलेल्या बँकांमध्ये पैसे बदली करण्यास अडचणी येत आहेत. वसा येथील निलकंठ दुमाने म्हणाले, सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. सर्वसामान्यांना या प्रक्रियेतून जाताना त्रास होत असला तरी नकली नोटांवर यामुळे अंकूश लागणार आहे. तसेच या निर्णयाने भविष्यात सकारात्मक परिणाम मिळण्यास मदत होणार आहे.गडचिरोली येथील रामपुरी वॉर्डातील विद्यार्थी योगेश वासनिक म्हणाले, सध्या खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. अनेक दुकानदार ५०० रूपयांचे जुने नोट घेण्यास धजत नाही. काही दुकानदार सामान देतात. परंतु संपूर्ण ५०० रूपयांचे सामान खरेदी करण्यास सांगतात. छोट्याशा वस्तूसाठी ५०० रूपये खर्च करणे परवडणारे नाही. त्यामुळे बँकेसमोर रांगेत लागून त्रास होईल, तरी सहन करणे योग्य वाटते.गडचिरोलीच्या रामनगरातील संजय कामडी म्हणाले, देशातील भ्रष्टाचार रोखणे व धनदांडग्यांनी लपविलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने योग्य निर्णय घेणे गरजेचे होते. विद्यमान सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. चार-पाच दिवस त्रास होईल. मात्र काही दिवसातच परिस्थिती सुरळीत होईल. सौरभ धंदरे म्हणाले, सरकारने घेतलेला निर्णय योग्य व चांगला आहे. निर्णय उशिरा झाला असला तरी, सर्वसामान्यांच्या हिताचा आहे. काही दिवस त्रास होईल. मात्र मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी तसेच श्रीमंत लोकांनी दडविलेला पैसा या निमित्ताने बाहेर पडेल. सरकारचा निर्णय देशहिताचा आहे. अशा प्रकारचा निर्णय पूर्वीच घ्यायला हवा होता. गडचिरोली येथील अभय भांडेकर म्हणाले, चांगल्या निर्णयाचा लोकांना त्रास होणारच. सध्या घेतलेला निर्णय देशहिताचा आहे. सुरूवातीच्या दिवसात त्रास होईल, मात्र लवकरच जनजीवन पूर्वपदावर येईल. या निर्णयामुळे काळ्या पैशाला लगाम लागण्यास मदत निश्चितच होईल.कॉम्प्लेक्समधील पी. एम. दुर्गे म्हणाले, सरकारने योग्य निर्णय घेतला मात्र पैसे बदलणे व जुने पैसे भरण्याची व्यवस्था वेगळी करायला हवी होती. सदर व्यवस्था बँकेतच स्वतंत्रपणे केली असती तरी बँकेच्या दैनंदिन व्यवहारात अडचणी आल्या नसत्या. शिवाय बँकेत विनाकारण गर्दी जमली नसती. सध्या बाहेरगावाहून अनेक नागरिक येथे येतात. मात्र अधिकारी व कर्मचारीच बराच काळ बँकेतून गायब राहतात. त्यामुळे बँकेचा व्यवहार ठप्प पडतो. याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतो.गडचिरोलीच्या कॅम्प एरियातील रवींद्र समर्थ म्हणाले, सध्या पैसे बदलण्याची सर्वसामान्य नागरिकांना लगबग झाली आहे. शिवाय जुन्या व्यवहारात चालत नसल्याने पैशाची नागरिकांना गरज आहे. अशा स्थितीत पैसे बदलणे व पैसे काढण्यासाठी नागरिकांची बँकांमध्ये गर्दी होत आहे. खेड्यापाड्यातून येथे ग्राहक येत असल्याने गर्दी दिसून येत आहे. सध्या सर्वसामान्यांना त्रास होत असला तरी सरकारचा निर्णय योग्य आहे. चांगल्या निर्णयामुळे त्रास होत असेल तरी काही दिवस सहन करणे योग्यच म्हणावे लागेल.गडचिरोलीच्या कॅम्प एरियातील मनोज मेश्राम म्हणाले, विद्यमान सरकारने घेतलेला निर्णय जनहिताचा आहे. पैसे बदलण्यासाठी अथवा पैसे काढण्यासाठी, पैसे भरण्यासाठी नागरिकांना रांगेत लागावे लागत असेल तर ते देशहिताचेच आहे. मेहनत करून गोळा केलेला पैसा बँकेत भरताना त्रास होत असेल तरी गैर नाही. त्यामुळे नागरिकांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून सरकारच्या योजना अंमलबजावणीस सहकार्य करणे देशहिताचेच राहिल. यात त्रास झाला तरी तो सहन करण्याची क्षमता प्रत्येकांनी बाळगावी.गोगाव येथील मुखरू मुनघाटे म्हणाले, ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक जुने पैसे बदलण्यासाठी व खर्च करण्यासाठी पैसे काढण्याकरिता बँक येत असल्याने गर्दी दिसून येत आहे. मात्र ही गर्दी चार ते पाच दिवस राहिल. त्यानंतर स्थिती सर्वसामान्य होईल. यात सर्वसामान्याना त्रास होत असेल तरी गैर नाही. (शहर प्रतिनिधी)