शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरच्या तुटवड्याने शहरातील नागरिक हैराण

By admin | Updated: October 20, 2014 23:12 IST

शहरातील हजारो कुटुंब स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करतात. त्यानुसार शहरासह परिसरातील नागरिकांना दररोज ४०० ते ५०० सिलिंडरची आवश्यकता भासते. परंतु प्रतीदिवस केवळ

ंगडचिरोली : शहरातील हजारो कुटुंब स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करतात. त्यानुसार शहरासह परिसरातील नागरिकांना दररोज ४०० ते ५०० सिलिंडरची आवश्यकता भासते. परंतु प्रतीदिवस केवळ ५० सिलिंडर देण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत असल्याने अनेक नागरिकांना गॅस सिलिंडरपासून वंचित राहावे लागत आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा वाढविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. शहरात गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. परिणामी नागरिकांना रॉकेल, सरपणावर स्वयंपाक करावा लागत आहे. जिल्हा वनाने संपन्न असल्याने मोठ्या प्रमाणात सरपणाची व्यवस्था जंगलातून होऊ शकते, परंतु सरकारने पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचा ध्यास घेतल्यामुळे धूरविरहीत इंधनाचा वापर करणे नागरिकांसमोर मोठे आव्हान आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी भरपूर प्रमाणात सरपणाचा वापर केला जातो. परंतु गडचिरोली शहरात सरपणाचा वापर करणे नागरिकांना शक्य नाही. शहरात हजारो कुटुंबियांकडे गॅस सिलिंडर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे काम शहरातील नागरिक करत आहेत. परंतु गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शहरातील नागरिकांची वाताहत होत आहे. संबंधीत एजन्सीकडून दर दिवशी ५० सिलिंडर देण्याचे प्रशासनाकडून नियोजित करण्यात आले आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे सकाळपासूनच अनेक नागरिक एजन्सीसमोर रांगा लावून उभे राहत असल्याचे अनेक दिवसांपासूनचे चित्र आहे. रात्रीपासूनच सिलिंडरसाठी नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. गॅस एजन्सी सकाळी ९ ते १० वाजता सुरू होत असल्याने नागरिकांना सिलिंडर दुपारपर्यंत मिळतो. ५० हून अधिक असलेल्या ग्राहकांना रांगेत उभे राहूनही परत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात आहे. त्याबरोबरच त्रासही सहन करावा लागत आहे. नगर परिषदेचे सभापती संजय मेश्राम व अजय भांडेकर यांनी पुरवठा अधिकाऱ्यांची विचारणा केली असता, कम्प्युटर सॉफ्टवेअरमधून केवळ ५० पावत्यांचे नियोजन असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे सांगितले. दररोज नागरिकांना गॅस एजन्सीसमोर ताटकळत उभे राहून सिलिंडरची मागणी करावी लागत आहे. ५० हून अधिक असलेल्या ग्राहकांना सकाळपासून रांगेत राहूनही शेवट परत जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्य:स्थितीत दिवाळी सण जवळ येऊन ठेपल्याने शहरातील नागरिकांना गॅस सिलिंडरचा वाढीव पुरवठा करावा, अशी मागणी न. प. चे सभापती संजय मेश्राम, अजय भांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)