शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

सिलिंडरच्या तुटवड्याने शहरातील नागरिक हैराण

By admin | Updated: October 20, 2014 23:12 IST

शहरातील हजारो कुटुंब स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करतात. त्यानुसार शहरासह परिसरातील नागरिकांना दररोज ४०० ते ५०० सिलिंडरची आवश्यकता भासते. परंतु प्रतीदिवस केवळ

ंगडचिरोली : शहरातील हजारो कुटुंब स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडरचा वापर करतात. त्यानुसार शहरासह परिसरातील नागरिकांना दररोज ४०० ते ५०० सिलिंडरची आवश्यकता भासते. परंतु प्रतीदिवस केवळ ५० सिलिंडर देण्याचे नियोजन असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात येत असल्याने अनेक नागरिकांना गॅस सिलिंडरपासून वंचित राहावे लागत आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा वाढविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. शहरात गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. परिणामी नागरिकांना रॉकेल, सरपणावर स्वयंपाक करावा लागत आहे. जिल्हा वनाने संपन्न असल्याने मोठ्या प्रमाणात सरपणाची व्यवस्था जंगलातून होऊ शकते, परंतु सरकारने पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचा ध्यास घेतल्यामुळे धूरविरहीत इंधनाचा वापर करणे नागरिकांसमोर मोठे आव्हान आहे. ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी भरपूर प्रमाणात सरपणाचा वापर केला जातो. परंतु गडचिरोली शहरात सरपणाचा वापर करणे नागरिकांना शक्य नाही. शहरात हजारो कुटुंबियांकडे गॅस सिलिंडर आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे काम शहरातील नागरिक करत आहेत. परंतु गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शहरातील नागरिकांची वाताहत होत आहे. संबंधीत एजन्सीकडून दर दिवशी ५० सिलिंडर देण्याचे प्रशासनाकडून नियोजित करण्यात आले आहे, असे बोलले जात आहे. त्यामुळे सकाळपासूनच अनेक नागरिक एजन्सीसमोर रांगा लावून उभे राहत असल्याचे अनेक दिवसांपासूनचे चित्र आहे. रात्रीपासूनच सिलिंडरसाठी नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. गॅस एजन्सी सकाळी ९ ते १० वाजता सुरू होत असल्याने नागरिकांना सिलिंडर दुपारपर्यंत मिळतो. ५० हून अधिक असलेल्या ग्राहकांना रांगेत उभे राहूनही परत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जात आहे. त्याबरोबरच त्रासही सहन करावा लागत आहे. नगर परिषदेचे सभापती संजय मेश्राम व अजय भांडेकर यांनी पुरवठा अधिकाऱ्यांची विचारणा केली असता, कम्प्युटर सॉफ्टवेअरमधून केवळ ५० पावत्यांचे नियोजन असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही, असे सांगितले. दररोज नागरिकांना गॅस एजन्सीसमोर ताटकळत उभे राहून सिलिंडरची मागणी करावी लागत आहे. ५० हून अधिक असलेल्या ग्राहकांना सकाळपासून रांगेत राहूनही शेवट परत जावे लागत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्य:स्थितीत दिवाळी सण जवळ येऊन ठेपल्याने शहरातील नागरिकांना गॅस सिलिंडरचा वाढीव पुरवठा करावा, अशी मागणी न. प. चे सभापती संजय मेश्राम, अजय भांडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)