लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्य शासनाने रविवारी राज्यभरात १४४ कलम (जमावबंदी) लागू केले. शासकीय कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्केच कर्मचारी उपस्थित राहतील, असा निर्णय घेतला. त्यामुळे गडचिरोलीसह इतर तालुकास्थळांवरील गर्दी ओसरून शहरे व शासकीय कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले.दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनामार्फत आणखी कडक नियम केले जात आहेत. रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले. जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यात सहभाग घेतला. ९ वाजेपर्यंत कर्फ्यू होता. त्यानंतर लगेच राज्यभरात १४४ कलम लागू करण्यात आले. या नियमाबरोबरच एसटी, खासगी बस, रेल्वे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बस व इतर प्रवाशी वाहने बंद झाल्याने ग्रामीण भागात गडचिरोली शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली. तसेच कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के उपस्थितीमुळे शासकीय कार्यालये ओस पडली होती. जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, बसस्थानक ही गजबजलेली ठिकाणे आहेत. मात्र सोमवारी ही सर्वच ठिकाणे ओस पडल्याचे दिसून येत होते.दुसऱ्या जिल्ह्यातील वाहनांना प्रवेश बंदीकोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यानी दुसऱ्या राज्यातून व जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना बंदी घातली आहे. पेट्रोलियम पदार्थ, दूध, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे व जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांना सूट दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती, उद्योग करणारे व्यवसाय वगळता इतर सर्व उद्योगधंदे तत्काळ प्रभावाने बंद करावे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष दीपक सिंगला यांनी मंगळवारी निर्गमित केले आहेत.कुरखेडात स्वतंत्र कक्षकोरोना संशयीत रुग्णांकरिता उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे. तसेच ५० बेडची क्षमता असलेले आदिवासी मुलांचे वसतिगृह आरोग्य विभागाने अधिग्रहीत केले आहे. आकस्मिक स्थिती निर्माण झाल्यास सदर इमारत रुग्णालय म्हणून वापरली जाणार आहे. गुजरात राज्यातून आलेल्या एका इसमाला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संभाजी ठाकर यांनी दिली आहे.अहेरीत फवारणीअहेरी- कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अहेरी नगर पंचायतीने रस्त्यांवर कीटकनाशकाची फवारणी करण्यात आली. नागरिकांनी वेळोवेळी हात धुवावे तसेच स्वच्छता बाळगावी, असे आवाहन केले जात आहे.व्हॉट्सअॅपवर करता येणार तक्रारीशासकीय कार्यालयांमध्ये केवळ पाच टक्केच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये जनतेची गर्दी टाळण्याच्या उद्देशाने ९४०३००९९७६ हा व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. जनतेला जिल्हा परिषदेच्या प्रशासनाबाबत काही तक्रारी असल्यास या तक्रारी सदर व्हॉट्सअॅप क्रमांकावर नागरिकांनी पाठवाव्या. सदर तक्रारी प्राधान्यक्रमाने निकाली काढल्या जातील. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला जिल्हा परिषदेत प्रवेश दिला जाणार नाही. जिल्हा परिषदेच्या ई-मेल आयडीवरही तक्रारी स्वीकारल्या जातील, असे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे.
शहरे व कार्यालये पडली ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST
गडचिरोलीसह इतर तालुकास्थळांवरील गर्दी ओसरून शहरे व शासकीय कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनामार्फत आणखी कडक नियम केले जात आहेत. रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले. जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यात सहभाग घेतला. ९ वाजेपर्यंत कर्फ्यू होता. त्यानंतर लगेच राज्यभरात १४४ कलम लागू करण्यात आले.
शहरे व कार्यालये पडली ओस
ठळक मुद्देकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना : रस्त्यांवरील वाहनांची संख्या घटली