शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

बालमृत्यूंचे मूळ कुपोषणातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:29 IST

आतापर्यंत कुपोषणाने बालकांचे मृत्यू होतात हे आरोग्य यंत्रणा मान्य करत नव्हती. पण मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा बालमृत्यूचे कारण भूक असू शकते हे सांगितले आहे.

ठळक मुद्देआदिवासी विभागाच्या विविध योजनांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आतापर्यंत कुपोषणाने बालकांचे मृत्यू होतात हे आरोग्य यंत्रणा मान्य करत नव्हती. पण मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा बालमृत्यूचे कारण भूक असू शकते हे सांगितले आहे. कुपोषित बालकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना वेगवेगळे आजार जडतात. त्यातून त्यांचा मृत्यू होतो. बालमृत्यूंचे मूळ कुपोषणात आहे. त्याचा योग्य तो छडा लावा, अशी सूचना राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केली.आदिवासी विभागाअंतर्गत चालणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी ते दोन दिवसांच्या गडचिरोली दौºयावर आले. मंगळवारी दुपारी गडचिरोलीत पोहोचताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.संदीप राठोड, आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हास्तरिय अधिकारी उपस्थित होते. पेसा कायद्यांतर्गत (आदिवासीबहुल क्षेत्र) येणाऱ्या गावांमध्ये रिक्त पदांची भरती करताना ग्रामसभेच्या शिफारसीनुसार उमेदवाराची निवड केली जाते. त्यातून अनेक समस्या उद्भवतात. त्या क्षेत्रातही गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड व्हावी अशी सूचना सीईओ डॉ.राठोड यांनी केली.पोषण आहारात दिला जाणारा रेडिमेड पाकिटबंद आहार मुले खात नव्हती. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तो आहार बंद करून तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ दिली जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.लामतुरे यांनी बैठकीत दिली.स्वस्त धान्य दुकानांमधून बायोमेट्रिक पद्धतीने धान्यवाटप होते म्हणजे पारदर्शकता आली असे होत नाही. धान्याचे योग्य प्रकारे वाटप होते किंवा नाही याची सरप्राईज व्हिजीट मधून तपासणी करण्याचे निर्देश पंडित यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीनंतर पंडीत यांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यातही जिल्ह्यातील विविध अडचणींवर चर्चा झाली.

टॅग्स :Melghatमेळघाट