शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

बालमृत्यूंचे मूळ कुपोषणातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:29 IST

आतापर्यंत कुपोषणाने बालकांचे मृत्यू होतात हे आरोग्य यंत्रणा मान्य करत नव्हती. पण मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा बालमृत्यूचे कारण भूक असू शकते हे सांगितले आहे.

ठळक मुद्देआदिवासी विभागाच्या विविध योजनांचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आतापर्यंत कुपोषणाने बालकांचे मृत्यू होतात हे आरोग्य यंत्रणा मान्य करत नव्हती. पण मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा बालमृत्यूचे कारण भूक असू शकते हे सांगितले आहे. कुपोषित बालकांची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना वेगवेगळे आजार जडतात. त्यातून त्यांचा मृत्यू होतो. बालमृत्यूंचे मूळ कुपोषणात आहे. त्याचा योग्य तो छडा लावा, अशी सूचना राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी केली.आदिवासी विभागाअंतर्गत चालणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी ते दोन दिवसांच्या गडचिरोली दौºयावर आले. मंगळवारी दुपारी गडचिरोलीत पोहोचताच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, आदिवासी विकास विभागाचे सहायक आयुक्त डॉ.संदीप राठोड, आदिवासी प्रकल्प अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांच्यासह सर्व विभागांचे जिल्हास्तरिय अधिकारी उपस्थित होते. पेसा कायद्यांतर्गत (आदिवासीबहुल क्षेत्र) येणाऱ्या गावांमध्ये रिक्त पदांची भरती करताना ग्रामसभेच्या शिफारसीनुसार उमेदवाराची निवड केली जाते. त्यातून अनेक समस्या उद्भवतात. त्या क्षेत्रातही गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड व्हावी अशी सूचना सीईओ डॉ.राठोड यांनी केली.पोषण आहारात दिला जाणारा रेडिमेड पाकिटबंद आहार मुले खात नव्हती. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर तो आहार बंद करून तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ दिली जात असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.लामतुरे यांनी बैठकीत दिली.स्वस्त धान्य दुकानांमधून बायोमेट्रिक पद्धतीने धान्यवाटप होते म्हणजे पारदर्शकता आली असे होत नाही. धान्याचे योग्य प्रकारे वाटप होते किंवा नाही याची सरप्राईज व्हिजीट मधून तपासणी करण्याचे निर्देश पंडित यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीनंतर पंडीत यांनी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे पदाधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यातही जिल्ह्यातील विविध अडचणींवर चर्चा झाली.

टॅग्स :Melghatमेळघाट