शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बाल विकास विभागाकडे केंद्र शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: February 20, 2017 00:42 IST

देशाची भावी पिढी घडविण्याचे महत्त्वाचे काम बाल विकास विभागाकडे आहे. मात्र या विभागाकडे केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

एटापल्लीत मेळावा : रमेशचंद्र दहिवडे यांचा आरोपएटापल्ली : देशाची भावी पिढी घडविण्याचे महत्त्वाचे काम बाल विकास विभागाकडे आहे. मात्र या विभागाकडे केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. या विभागाच्या योजनांवरील खर्च दिवसेंदिवस घटत चालला आहे. हे धोरण अन्यायकारक असून या विरोधात तीव्र लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी केले. एटापल्ली येथे अंगणवाडी महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी छाया कागदेलवार, सलेस्तीना कुजूर, सुवर्णा सरकार, मोनिका बिश्वास, निलीमा बेडके, अनुसया झाडे यांच्यासह एटापल्ली तालुक्यातील इतर अंगणवाडी कर्मचारी सदर मेळाव्याला उपस्थित होते. पुढे बोलताना रमेशचंद्र दहिवडे म्हणाले की, गेल्या ४० वर्षाच्या कार्यकाळात अंगणवाडी महिलांना पाच वर्ष तर कधी तीन वर्षाच्या अंतराने मानधनात वाढ होत होती. मात्र पहिल्यांदाच पाच वर्षांचा कालावधी उलटूनही अंगणवाडी महिलांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. यावरून अंगणवाडी महिलांबाबत तसेच या विभागाच्या मार्फतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत शासन फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या वेळी अनेक फसव्या घोषणा देऊन केंद्र व राज्यातील सरकार सत्तेवर आले. आता या सर्व घोषणांचा विसर पडला आहे. केंद्र शासनाला त्यांच्या घोेषणांची आठवण करून देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी तसेच देशभरातील इतर कर्मचारी व नागरिकांनी व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक भाषणात गुलशन शेख यांनी अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात आला नाही. अल्पसे मानधन दिले जाते. ते देखील नियमित दिले जात नाही. छाया कागदेलवार यांनी अंगणवाडी महिलांना किमान वेतन देण्याची मागणी मेळाव्यादरम्यान केली. (तालुका प्रतिनिधी)