शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

बाल विकास विभागाकडे केंद्र शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: February 20, 2017 00:42 IST

देशाची भावी पिढी घडविण्याचे महत्त्वाचे काम बाल विकास विभागाकडे आहे. मात्र या विभागाकडे केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे.

एटापल्लीत मेळावा : रमेशचंद्र दहिवडे यांचा आरोपएटापल्ली : देशाची भावी पिढी घडविण्याचे महत्त्वाचे काम बाल विकास विभागाकडे आहे. मात्र या विभागाकडे केंद्र व राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. या विभागाच्या योजनांवरील खर्च दिवसेंदिवस घटत चालला आहे. हे धोरण अन्यायकारक असून या विरोधात तीव्र लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष रमेशचंद्र दहिवडे यांनी केले. एटापल्ली येथे अंगणवाडी महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी छाया कागदेलवार, सलेस्तीना कुजूर, सुवर्णा सरकार, मोनिका बिश्वास, निलीमा बेडके, अनुसया झाडे यांच्यासह एटापल्ली तालुक्यातील इतर अंगणवाडी कर्मचारी सदर मेळाव्याला उपस्थित होते. पुढे बोलताना रमेशचंद्र दहिवडे म्हणाले की, गेल्या ४० वर्षाच्या कार्यकाळात अंगणवाडी महिलांना पाच वर्ष तर कधी तीन वर्षाच्या अंतराने मानधनात वाढ होत होती. मात्र पहिल्यांदाच पाच वर्षांचा कालावधी उलटूनही अंगणवाडी महिलांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. यावरून अंगणवाडी महिलांबाबत तसेच या विभागाच्या मार्फतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत शासन फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या वेळी अनेक फसव्या घोषणा देऊन केंद्र व राज्यातील सरकार सत्तेवर आले. आता या सर्व घोषणांचा विसर पडला आहे. केंद्र शासनाला त्यांच्या घोेषणांची आठवण करून देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी तसेच देशभरातील इतर कर्मचारी व नागरिकांनी व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रास्ताविक भाषणात गुलशन शेख यांनी अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात आला नाही. अल्पसे मानधन दिले जाते. ते देखील नियमित दिले जात नाही. छाया कागदेलवार यांनी अंगणवाडी महिलांना किमान वेतन देण्याची मागणी मेळाव्यादरम्यान केली. (तालुका प्रतिनिधी)