शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण मुद्यावर मंत्रीमंडळाचे दुर्लक्ष मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेत

By admin | Updated: May 8, 2014 23:48 IST

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ओबीसी सरकारच्या भूमिकेवर संतप्त

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत महाराष्टÑाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चामोर्शी येथील जाहीर सभेत मतदान पार पडताच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय तत्काळ घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र मंत्रीमंडळाच्या दोन बैठका आटोपूनही राज्य मंत्रीमंडळाने ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला नसल्याने जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधव संतप्त झाले आहे. शासनाच्या खोट्या आश्वासनाबाबत तीव्र नाराजी ओबीसी समाजात व्यक्त होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ४६ टक्के ओबीसी समाज वास्तव्याला आहे. शेती हा ओबीसी समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. गडचिरोली जिल्ह्यात पूर्वी ओबीसी समाजाला १९ टक्के आरक्षण नोकर्‍या व पदोन्नतीमध्ये दिल्या जात होते. त्यानंतर ते ११ टक्के करण्यात आले. यातही कपात करून राज्य सरकारने हे आरक्षण ६ टक्क्यावर आणले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या नोकर भरतीत ओबीसी हद्दपार झाले आहे. गेल्या पाच वर्षात वन व पोलीस विभागाच्या भरतीत केवळ ७५ ओबीसींना नोकर्‍या मिळू शकल्या. ओबीसींचे आरक्षण गडचिरोली जिल्ह्यात वाढवून १९ टक्के करण्यात यावे, ही मागणी गेल्या १० वर्षांपासून ओबीसी समाज करीत आहे. या संदर्भात अनेकदा आंदोलनेही झालीत. परंतु अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर बोटचेपी भूमिका घेत आहे. गडचिरोली शहरात विविध ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन साखळी उपोषण व आमरण उपोषणही केले. त्यावेळी चिमूर आमदार विजय वडेट्टीवार व आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आंदोलनकर्त्यांना ही मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चामोर्शी येथे मुख्यमंत्री आले असतांना त्यांनी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मतदान होताच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मार्गी लावला जाईल, असे जाहीर आश्वासन जनतेला दिले होते. १० एप्रिलला विदर्भात मतदान पार पडले. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान २४ एप्रिलला पूर्ण झाले. ३० एप्रिलला व ७ मे ला राज्य मंत्रीमंडळाच्या बैठका झाल्यात. मात्र यात गडचिरोली जिल्ह्याच्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कुठेही चर्चेला आला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हे आश्वासन पूर्ण होते किंंवा नाही, अशी शंका ओबीसी समाजबांधवांना येऊ लागली आहे. आगामी सहा महिन्याने विधानसभेच्या निवडणुका आहे. त्यामुळे ओबीसी समाज आता सरकारच्या विरोधात पुन्हा तीव्र लढ्यासाठी सज्ज होत आहे.