शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

आरक्षण मुद्यावर मंत्रीमंडळाचे दुर्लक्ष मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेत

By admin | Updated: May 8, 2014 23:48 IST

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ओबीसी सरकारच्या भूमिकेवर संतप्त

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण १९ टक्क्यावरून ६ टक्के करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत महाराष्टÑाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चामोर्शी येथील जाहीर सभेत मतदान पार पडताच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय तत्काळ घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र मंत्रीमंडळाच्या दोन बैठका आटोपूनही राज्य मंत्रीमंडळाने ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला नसल्याने जिल्ह्यातील ओबीसी समाजबांधव संतप्त झाले आहे. शासनाच्या खोट्या आश्वासनाबाबत तीव्र नाराजी ओबीसी समाजात व्यक्त होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात ४६ टक्के ओबीसी समाज वास्तव्याला आहे. शेती हा ओबीसी समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. गडचिरोली जिल्ह्यात पूर्वी ओबीसी समाजाला १९ टक्के आरक्षण नोकर्‍या व पदोन्नतीमध्ये दिल्या जात होते. त्यानंतर ते ११ टक्के करण्यात आले. यातही कपात करून राज्य सरकारने हे आरक्षण ६ टक्क्यावर आणले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या नोकर भरतीत ओबीसी हद्दपार झाले आहे. गेल्या पाच वर्षात वन व पोलीस विभागाच्या भरतीत केवळ ७५ ओबीसींना नोकर्‍या मिळू शकल्या. ओबीसींचे आरक्षण गडचिरोली जिल्ह्यात वाढवून १९ टक्के करण्यात यावे, ही मागणी गेल्या १० वर्षांपासून ओबीसी समाज करीत आहे. या संदर्भात अनेकदा आंदोलनेही झालीत. परंतु अनुसूचित जमातीचे लोकप्रतिनिधी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर बोटचेपी भूमिका घेत आहे. गडचिरोली शहरात विविध ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन साखळी उपोषण व आमरण उपोषणही केले. त्यावेळी चिमूर आमदार विजय वडेट्टीवार व आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आंदोलनकर्त्यांना ही मागणी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी चामोर्शी येथे मुख्यमंत्री आले असतांना त्यांनी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मतदान होताच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मार्गी लावला जाईल, असे जाहीर आश्वासन जनतेला दिले होते. १० एप्रिलला विदर्भात मतदान पार पडले. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान २४ एप्रिलला पूर्ण झाले. ३० एप्रिलला व ७ मे ला राज्य मंत्रीमंडळाच्या बैठका झाल्यात. मात्र यात गडचिरोली जिल्ह्याच्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कुठेही चर्चेला आला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हे आश्वासन पूर्ण होते किंंवा नाही, अशी शंका ओबीसी समाजबांधवांना येऊ लागली आहे. आगामी सहा महिन्याने विधानसभेच्या निवडणुका आहे. त्यामुळे ओबीसी समाज आता सरकारच्या विरोधात पुन्हा तीव्र लढ्यासाठी सज्ज होत आहे.