शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

चौकाला व्यावसायिकांचा विळखा

By admin | Updated: July 23, 2016 02:03 IST

आष्टी येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे घरांच्याही बांधकामात वाढ झालेली आहे.

आष्टी येथे वाहतुकीस अडथळा : गाव सीमेनुसार फेरर्सर्वेक्षण करून अतिक्रमण हटवावे आष्टी : आष्टी येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे घरांच्याही बांधकामात वाढ झालेली आहे. रस्त्याच्या सीमेवर अनेक लोकांनी पूर्वी घरे बांधली होती. परंतु आता येथील मुख्य चौकातही काही व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने चौकाला व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा विळखा आहे. परिणामी येथे वाहतुकीस अडथळा येत आहे. या समस्येबद्दल काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार सादर करून गाव सीमेनुसार पुनर्सर्वेक्षण करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली आहे. १९९१ ला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येथील मुख्य रस्त्यापासून गावाची सीमा ठरविण्यात आली होती. परंतु बऱ्याच लोकांनी या आदेशाची पायमल्ली करून रस्त्यालगत घरे बांधली. तसेच येथील मुख्य चौकातही अनेक व्यावसायिकांनी खासगी दुकाने थाटली. त्यामुळे चौकातीलही रस्ते अरूंद झाले. त्यामुळे येथून आलापल्ली, गोंडपिंपरी, चामोर्शी मार्गे जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा होत आहे. परिणामी येथे वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन सामान्य नागरिकांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे. सध्या डॉ. आंबेडकर चौक पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात असून चारही बाजुंनी दिवसेंदिवस सदर अतिक्रमण वाढत आहे. परिणामी चारचाकी, दुचाकी वाहने रस्त्यावरच उभी करून लोकांना दुकानांमधील साहित्य खरेदी करावे लागत आहेत. त्यामुळे येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. व्यावसायिक वस्तूही ठेवतात रस्त्यावर आष्टी येथील डॉ. आंबेडकर चौकातील व्यावसायिकांकडून वस्तू रस्त्यावर ठेवल्या जात असल्याने रस्ते आधीच अरूंद झाले आहेत. शिवाय पुन्हा येथे विविध वस्तू खरेदी करण्याकरिता येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यालगत राहत असल्याने पादचाऱ्यांना तसेच इतर वाहनधारकांना आवागमन करताना त्रास होत आहे. या समस्येसंदर्भात काही लोकांनी जिल्हाधिकारी तसेच चामोर्शी येथील तहसीलदारांकडे तक्रार करून अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परंतु तक्रारीनंतर अद्यापही कुठलीही कारवाई झालेली नाही. आष्टी येथील मुख्य चौकातील अतिक्रमण हटणे गरजेचे आहे. तेव्हाच येथील वाहतूक सुरळीत होऊ शकते. अन्यथा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.