शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ११ मुलींचे आरोप पूर्णत: निराधार

By admin | Updated: February 20, 2017 00:43 IST

चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमधील त्या ११ मुलींनी पोलिसात दिलेली तक्रार पूर्णत: खोटी आहे. तसेच पत्रकार परिषदेत माझ्यावर व संस्थेवर केलेले सर्व आरोप निराधार आहेत.

संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न : प्रमोद साळवे व नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींची पत्रपरिषदेत माहिती गडचिरोली : चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमधील त्या ११ मुलींनी पोलिसात दिलेली तक्रार पूर्णत: खोटी आहे. तसेच पत्रकार परिषदेत माझ्यावर व संस्थेवर केलेले सर्व आरोप निराधार आहेत. सदर ११ मुलींनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची रात्री-बेरात्री रॅगिंग घेतली, अशी तक्रार स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चातगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. मात्र या तक्रारीवर कुठलीही कारवाई झाली नाही. या प्रकरणी कारवाई होऊ नये, याकरिता त्या ११ मुलींनी माझ्यावर निराधार आरोप केले, अशी माहिती डॉ. प्रमोद साळवे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य सुषमा गजभिये व विद्यार्थिनींनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेला स्टुडंट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्ष नीलिमा बारसागडे, सचिव भारती सडमेक, अभिलाषा तागडे, नगिना कन्नाके, पूजा सडमेक, प्राजक्ता भांडेकर आदींसह विद्यार्थीनी उपस्थित होत्या. यावेळी सर्वांनी सांगितले की, बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थिनी नलिनी पुडो, गुणश्री बेताल, श्वेता घुमे, राजश्री गावंडे, मोनाली गडपाडे, हीना शेख, शीतल गेडाम, दीपिका हरामी, उत्कर्षा मसराम, स्वाती जांभुळकर व प्रज्ञा चुनारकर आदी ११ मुली १३ फेब्रुवारी २०१७ रोजी वसतिगृह व कॉलेजमधून बेपत्ता होत्या. दुपारी ३ वाजता कुठलीही परवानगी न घेता व न सांगता वसतिगृहाच्या बाहेर गेल्या, अशी माहिती नर्सिंगच्या कॉलेजच्या प्राचार्य सुषमा गजभिये यांना मिळाली व तशी तक्रार गजभिये यांनी चातगाव पोलीस मदत केंद्रात त्याच दिवशी दाखल केली. त्यानंतर या सर्व विद्यार्थिनींच्या पालकांना प्राचार्य सुषमा गजभिये व शिक्षिका प्रेरणा रासेकर यांनी फोनद्वारे सदर मुली वसतिगृहातून बेपत्ता असल्याची माहिती दिली, असे त्यांनी सांगितले. नर्सिंग कॉलेजमधील तब्बल १३४ मुलींची या ११ मुलींच्या विरोधात माझ्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे, अशी माहिती डॉ. साळवे यांनी यावेळी दिली. सदर ११ मुली प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची रात्रीच्या वेळी रॅगिंग घेतात. तसेच रात्री अभ्यास करीत नाही, इकडे तिकडे भटकत असतात, असे विद्यार्थिनींनी सांगितले. पालक सभेत गोंधळ घालणाऱ्या सदर ११ मुलींवर व त्यांनी सोबत आणलेल्या हंसराज बेताल, नागपूरचा पोलीस शिपाई गणेश, हमीद शेख तसेच अन्य एका इसमावर कारवाई करावी, अन्यथा आपण व अन्य विद्यार्थिनी तीव्र आंदोलन उभारतील, असा इशाराही डॉ. प्रमोद साळवे यांनी केला. (प्रतिनिधी)संस्थाध्यक्षांच्या कारभारामुळे आमचे शैक्षणिक नुकसानप्रवेश शुल्क न दिल्याचे कारण सांगून संस्थापंकांनी आमचा महाविद्यालयात प्रवेश करुन घेतला नाही. त्यामुळे आम्हाला परीक्षेत नापास करण्यात आले, तसेच साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये संस्थापक डॉ. प्रमोद साळवे यांच्याकडून आम्हाला अभद्र वागणूक मिळते, असा आरोप चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजच्या बीएस्सी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला राजश्री गावंडे, शीतल गेडाम, हीना शेख, गुणश्री बेताल, श्वेता घुमे, दीपिका हारामी, उत्कर्षा मसराम, प्रज्ञा चुनारकर, नलिनी पुडो व त्यांचे पालक उपस्थित होते. या सर्वांनी सांगितले की, आम्ही चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये बीएस्सी नर्सिंगच्या द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत आहोत. विद्यार्थिंनींनी त्यांच्या जातनिहाय प्रवर्गानुसार आकारण्यात आलेले शुल्क देऊन महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. त्या शुल्काशिवाय खानावळ व बसशुल्कही आम्ही वेळोवेळी देत असतो. परंतु यंदा परीक्षा दिल्यानंतर ६ विद्यार्थिनींना शून्य गूण देण्यात आले, तर अन्य ६ विद्यार्थिनींचे निकाल प्रतीक्षेत ठेवण्यात आले. यासंदर्भात आपण नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘हा विषय तुमच्या महाविद्यालयाशी संबंधित असून, त्यांच्याशीच संपर्क साधा,’ असे उत्तर दिले. यावरुन संबंधित महाविद्यालयाचे संस्थापक आमच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असल्याचे दिसून येते, असे विद्यार्थिनींनी सांगितले. डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजमध्ये अनेक भौतिक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे आम्ही विद्यार्थिनी त्रस्त आहोत, असेही विद्यार्थिनींनी पत्रकार परिषदेत सांगितले.