शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

प्रभारी कुलगुरू मिळाले; विद्यापीठाच्या समित्या कधी होणार स्थापन?

By admin | Updated: October 18, 2014 23:25 IST

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र विद्यापीठाला लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा राज्य शासनाने

गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मात्र विद्यापीठाला लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा राज्य शासनाने उपलब्ध करून दिल्या नाही. तसेच विद्यापीठाच्या प्रशासकीय कामासाठी आवश्यक असलेल्या विविध समित्यांचे गठणही करण्यात आलेले नाही. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाचा कारभार अधांतरी झाला. गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित रूजू झाले आहे. आता या विद्यापीठाच्या विद्वत्त व व्यवस्थापन समित्यांच्या गठणाचा मुहूर्त कधी निघतो, याची शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना प्रतीक्षा आहे.राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने गडचिरोली येथे २००९ मध्ये गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. २ आॅक्टोबर २०११ पासून गोंडवाना विद्यापीठाचा प्रत्यक्ष कारभार सुरू झाला. गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होण्याचा मान डॉ. विजय आर्इंचवार यांना मिळाला. आर्इंचवार यांच्या काळात गोंडवाना विद्यापीठाची सुरूवात झाली. या विद्यापीठांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील २५० च्या आसपास महाविद्यालय येतात. नवीनच सुरूवात करतांना नोकरी भरती, खरेदी आदी प्रकरणामुळे कुलगुरू व कुलसचिव दोघांच्या कारभारामुळे विद्यापीठाची मोठी चर्चा समाजात होत राहीली. या प्रकरणीही अनेक तक्रारीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही दाखल झाल्यात. गोंडवाना विद्यापीठाने नवीनच वाटचाल करताना ४५ दिवसात परीक्षांचे निकाल लावून विक्रमही केला. मात्र गोंडवाना विद्यापीठाचा कारभार कुलगुरूंच्याच ताब्यात एकवटलेला दिसत होता. दोन ते अडीच वर्षाच्या काळात गोंडवाना विद्यापीठाच्या विद्वत्त व व्यवस्थापन समित्याही राज्यशासनाने गठीत केल्या नाही. उच्च व तंत्र शिक्षण विभागात या फाईली दाबून ठेवण्यात आल्या. प्राचार्य फोरमने विद्यापीठाच्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकल्यावरही शासनाने मात्र कोणतीही कार्यवाही केली नाही. आता निवडणुकीच्या काळात गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांची निवड केली आहे. विद्यापीठाचा लौकिक कायम ठेवण्यासोबतच नक्षलग्रस्त भागातील या विद्यापीठात असणाऱ्या महाविद्यालयांचा शैक्षणिक दर्जाही उंचाविण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. तसेच राज्यशासनाकडे प्रलंबित असलेला विद्वत्त व व्यवस्थापन समित्यांच्या गठणाचा प्रस्ताव शासन कोणत्या मुहूर्तावर मार्गी लावतो, याची प्रतीक्षा या समित्यांवर नाव असणाऱ्यांनाही लागली आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयाकडे आता अनेकांचे लक्ष आहे. (जिल्हा प्रतिनिधी)