शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

चारित्र्य घडविणारे साहित्य जगात केवळ भारतातच

By admin | Updated: December 3, 2015 01:39 IST

जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय, हिंमत व आत्मविश्वास या त्रिसूत्रीची गरज आहे. त्याचप्रमाणे चारित्र्यवान व्यक्ती निर्माण करण्यासाठी साहित्याची गरज आहे.

नामदेव कल्याणकर यांचे प्रतिपादन : नैतिक जीवनावर पुस्तकाचे वितरणगडचिरोली : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय, हिंमत व आत्मविश्वास या त्रिसूत्रीची गरज आहे. त्याचप्रमाणे चारित्र्यवान व्यक्ती निर्माण करण्यासाठी साहित्याची गरज आहे. चारित्र्य घडविणारे साहित्य संपूर्ण जगात केवळ भारतातच आहे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान मुंबईद्वारा प्रकाशित नैतिक जीवनावर आधारित पुस्तक वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, सुधीर भातकुलकर, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे प्रमुख प्रकाश पुसदकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कुलगुरू डॉ. कल्याणकर म्हणाले, सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांमुळे समाजाला दिशा मिळते. समाजाच्या उन्नतीसाठी संस्कृती संवर्धनासारखे कार्यक्रम राबवून अरविंद पोरेड्डीवार यांनी समाजाप्रती असलेल्या आपुलकीचे दर्शन घडविले आहे. अशा व्यक्तींमुळे समाजात चारित्र्यवान लोकांची निर्माण झालेली पोकळी नक्कीच भरून निघेल, तसेच भावी पिढी घडविण्याचे काम नैतिक जीवनावर आधारित पुस्तकाचे वाचन करून त्यातील काही बाबी आचरणात आणल्यास सुसंस्कृत समाज निर्माण होण्यास मदत होईल, असा आशावाद कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी यावेळी व्यक्त केला.अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील जनतेने चांगल्या प्रकारे संस्कृतीचे जतन केले आहे. आज बालवयात आपण त्यांच्यावर चांगले संस्कार केल ेतर येणारी नवीन भावी पिढी चांगल्या विचाराची राहणार आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमार्फत नैतिक जीवनावर आधारित परीक्षेचे आयोजन केल्यास संस्कारक्षम पिढी तयार होईल, असे पोरेड्डीवार यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात उज्ज्वल भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांची कमी नाही आणि त्यांची घोडदौड कुणीही रोखू शकणार नाही. जीवनात मेहनतीमध्ये सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळते, असे प्रंचित पोरेड्डीवार यांनी प्रास्ताविकातून सांगितले.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)