शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
3
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
4
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
5
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
6
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
7
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
8
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
9
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
12
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
13
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
14
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
15
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
18
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
19
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
20
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीबहुल जिल्ह्यातील बिंदू नामावलीत होणार बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:37 IST

शासनाने अलिकडेच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी (एसईबीसी) आरक्षण लागू केले आहे. सदर आरक्षण लक्षात घेऊन आदिवासीबहुल असलेल्या जिल्ह्यांमधील प्रशासकीय पदांच्या बिंदू नामावलीत बदल केला जाणार आहे.

ठळक मुद्देशासन निर्णय : गट ‘क’ व ‘ड’ ची भरती

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : शासनाने अलिकडेच सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी (एसईबीसी) आरक्षण लागू केले आहे. सदर आरक्षण लक्षात घेऊन आदिवासीबहुल असलेल्या जिल्ह्यांमधील प्रशासकीय पदांच्या बिंदू नामावलीत बदल केला जाणार आहे. याबाबतचा निर्णय शासनाने १६ ऑगस्ट रोजी घेतला आहे.राज्यात नाशिक, धुळे, नंदूरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर व गडचिरोली हे आदिवासीबहुल जिल्हे आहेत. आदिवासींना शासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याच्या उद्देशाने शासनाने वेळोवेळी शासन निर्णय काढून या जिल्ह्यातील अनुसूचित जमातींचे (आदिवासी) आरक्षण वाढविले आहे. सद्य:स्थितीत पालघर, धुळे, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २२ टक्के, रायगड जिल्ह्यात ९ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यात १५ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात १४ टक्के व गडचिरोली जिल्ह्यात २४ टक्के आरक्षण अनुसूचित जमातींसाठी देण्यात आले आहे. शासनाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी १६ टक्के आरक्षण लागू केले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांच्या बिंदू नामावलीत बदल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने एसईबीसींचे आरक्षण १६ टक्केवरून १३ टक्के केले आहे. आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये गट ‘क’ व गट ‘ड’ च्या पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये एसईबीसीचे आरक्षण १६ टक्केवरून १३ टक्के करून नव्याने बिंदू नामावली तयार केली जाईल. त्यानुसारच पदभरती होणार आहे. याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

टॅग्स :Governmentसरकार