शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

घटनात्मक मार्गाने समाजात बदल घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 01:27 IST

आदिवासी नागरिकांनी भारतीय राज्यघटनेच्या मार्गाने समाजात बदल घडवावा, असे आवाहन विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख श्रीहरी अणे यांनी केले.

ठळक मुद्देश्रीहरी अणे यांचे आवाहन : मंगेवाडात भूमकाल दिवस व गोंडवाना महासंमेलन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : आदिवासी नागरिकांनी भारतीय राज्यघटनेच्या मार्गाने समाजात बदल घडवावा, असे आवाहन विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख श्रीहरी अणे यांनी केले.तालुक्याच्या मंगेवाडा येथे इलाका ग्रामसभा व इलाक्यातील सर्व ग्रामसभेच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना वीर क्रांतीकारी शहीदांना श्रध्दांजली, गोंडवाना गोटूल महासंमेलन व भूमकाल दिवसाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. सदर महासंमेलनात तालुक्यातील ४४ ग्रामसभांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगेवाडाचे पोलीस पाटील सुनील कुमरे, विशेष अतिथी म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष निरज खांदेवाल, अनिल जवादे, तर प्रमुख अतिथी म्हणून केशर शहा सयाम, जि.प. सदस्य अनिल केरामी, सुरसुंडीचे सरपंच श्रीराम गेडाम, गोंडवाना गोटूल सेनेचे मुकेश नरोटे, वनरक्षक गुरू वाढई आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना श्रीहरी अणे म्हणाले, सरकार व पोलीस आपली अयशस्वीता लपविण्याकरिता आदिवासींना पळवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. कलम ११० चा गैरवापर होत आहे. आदिवासी समाज विखुरलेला असल्याने आदिवासींवर अन्याय होत आहे. नक्षल भागात गुन्हे घडले की, आदिवासींना पकडून नेले जाते. कलम ११० च्या गैरवापराबद्दल सर्व ग्राम पंचायतीने ठराव घेऊन संघटनेच्या माध्यमातून कोर्टात याचिका दाखल करावी. अहिंसेचा मार्ग अवलंबून घटनेच्या मार्गाने समाजात बदल घडवावा, असे त्यांनी सांगितले.आदिवासी समाजाने आपली अस्मिता विसरू नये. आपल्या गोंडी संस्कृतिची जतन करावे, मुंबई-दिल्लीचे सरकार आपले प्रश्न सोडवू शकत नाही. आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विदर्भ राज्य होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारच्या खोट्या भूलथापांना बळी न पडता, विदर्भ राज्याच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.निरज खांदेवाल यांनीही मार्गदर्शन केले. या महासंमेलनाला इलाक्यातील आदिवासी महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन ग्रामसभा कार्याध्यक्ष ईश्वर कुमरे यांनी केले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली