शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

घटनात्मक मार्गाने समाजात बदल घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 01:27 IST

आदिवासी नागरिकांनी भारतीय राज्यघटनेच्या मार्गाने समाजात बदल घडवावा, असे आवाहन विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख श्रीहरी अणे यांनी केले.

ठळक मुद्देश्रीहरी अणे यांचे आवाहन : मंगेवाडात भूमकाल दिवस व गोंडवाना महासंमेलन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : आदिवासी नागरिकांनी भारतीय राज्यघटनेच्या मार्गाने समाजात बदल घडवावा, असे आवाहन विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख श्रीहरी अणे यांनी केले.तालुक्याच्या मंगेवाडा येथे इलाका ग्रामसभा व इलाक्यातील सर्व ग्रामसभेच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना वीर क्रांतीकारी शहीदांना श्रध्दांजली, गोंडवाना गोटूल महासंमेलन व भूमकाल दिवसाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. सदर महासंमेलनात तालुक्यातील ४४ ग्रामसभांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगेवाडाचे पोलीस पाटील सुनील कुमरे, विशेष अतिथी म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष निरज खांदेवाल, अनिल जवादे, तर प्रमुख अतिथी म्हणून केशर शहा सयाम, जि.प. सदस्य अनिल केरामी, सुरसुंडीचे सरपंच श्रीराम गेडाम, गोंडवाना गोटूल सेनेचे मुकेश नरोटे, वनरक्षक गुरू वाढई आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना श्रीहरी अणे म्हणाले, सरकार व पोलीस आपली अयशस्वीता लपविण्याकरिता आदिवासींना पळवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. कलम ११० चा गैरवापर होत आहे. आदिवासी समाज विखुरलेला असल्याने आदिवासींवर अन्याय होत आहे. नक्षल भागात गुन्हे घडले की, आदिवासींना पकडून नेले जाते. कलम ११० च्या गैरवापराबद्दल सर्व ग्राम पंचायतीने ठराव घेऊन संघटनेच्या माध्यमातून कोर्टात याचिका दाखल करावी. अहिंसेचा मार्ग अवलंबून घटनेच्या मार्गाने समाजात बदल घडवावा, असे त्यांनी सांगितले.आदिवासी समाजाने आपली अस्मिता विसरू नये. आपल्या गोंडी संस्कृतिची जतन करावे, मुंबई-दिल्लीचे सरकार आपले प्रश्न सोडवू शकत नाही. आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विदर्भ राज्य होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारच्या खोट्या भूलथापांना बळी न पडता, विदर्भ राज्याच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.निरज खांदेवाल यांनीही मार्गदर्शन केले. या महासंमेलनाला इलाक्यातील आदिवासी महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन ग्रामसभा कार्याध्यक्ष ईश्वर कुमरे यांनी केले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली