शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

घटनात्मक मार्गाने समाजात बदल घडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 01:27 IST

आदिवासी नागरिकांनी भारतीय राज्यघटनेच्या मार्गाने समाजात बदल घडवावा, असे आवाहन विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख श्रीहरी अणे यांनी केले.

ठळक मुद्देश्रीहरी अणे यांचे आवाहन : मंगेवाडात भूमकाल दिवस व गोंडवाना महासंमेलन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : आदिवासी नागरिकांनी भारतीय राज्यघटनेच्या मार्गाने समाजात बदल घडवावा, असे आवाहन विदर्भ राज्य आघाडीचे प्रमुख श्रीहरी अणे यांनी केले.तालुक्याच्या मंगेवाडा येथे इलाका ग्रामसभा व इलाक्यातील सर्व ग्रामसभेच्या संयुक्त विद्यमाने गोंडवाना वीर क्रांतीकारी शहीदांना श्रध्दांजली, गोंडवाना गोटूल महासंमेलन व भूमकाल दिवसाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. सदर महासंमेलनात तालुक्यातील ४४ ग्रामसभांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगेवाडाचे पोलीस पाटील सुनील कुमरे, विशेष अतिथी म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे कार्याध्यक्ष निरज खांदेवाल, अनिल जवादे, तर प्रमुख अतिथी म्हणून केशर शहा सयाम, जि.प. सदस्य अनिल केरामी, सुरसुंडीचे सरपंच श्रीराम गेडाम, गोंडवाना गोटूल सेनेचे मुकेश नरोटे, वनरक्षक गुरू वाढई आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना श्रीहरी अणे म्हणाले, सरकार व पोलीस आपली अयशस्वीता लपविण्याकरिता आदिवासींना पळवून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात. कलम ११० चा गैरवापर होत आहे. आदिवासी समाज विखुरलेला असल्याने आदिवासींवर अन्याय होत आहे. नक्षल भागात गुन्हे घडले की, आदिवासींना पकडून नेले जाते. कलम ११० च्या गैरवापराबद्दल सर्व ग्राम पंचायतीने ठराव घेऊन संघटनेच्या माध्यमातून कोर्टात याचिका दाखल करावी. अहिंसेचा मार्ग अवलंबून घटनेच्या मार्गाने समाजात बदल घडवावा, असे त्यांनी सांगितले.आदिवासी समाजाने आपली अस्मिता विसरू नये. आपल्या गोंडी संस्कृतिची जतन करावे, मुंबई-दिल्लीचे सरकार आपले प्रश्न सोडवू शकत नाही. आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विदर्भ राज्य होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारच्या खोट्या भूलथापांना बळी न पडता, विदर्भ राज्याच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.निरज खांदेवाल यांनीही मार्गदर्शन केले. या महासंमेलनाला इलाक्यातील आदिवासी महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन ग्रामसभा कार्याध्यक्ष ईश्वर कुमरे यांनी केले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली