शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पेसा अधिसूचनेत बदल करा; राज्यपालांना साकडे

By admin | Updated: April 26, 2015 02:02 IST

आदिवासी बहूल भागातील शासकीय, निमशासकीय पदावर त्या भागात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी उमेदवारांचीच भरती करण्याचा निर्णय पेसा

देसाईगंज : आदिवासी बहूल भागातील शासकीय, निमशासकीय पदावर त्या भागात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी उमेदवारांचीच भरती करण्याचा निर्णय पेसा अधिसूचना लागू झाल्यामुळे घेण्यात आला आहे. या अध्यादेशात दुरूस्ती करून नवीन ओबीसी प्रवर्गाच्या हिताचा अध्यादेश काढण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी व आमदार क्रिष्णा गजबे यांनी राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली. यावेळी आमदारांसमवेत ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, रविशंकर बोमनवार, वामनराव सावसागडे आदी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित जमाती बरोबरच बहुसंख्य ओबीसी प्रवर्गाचे नागरिक वास्तव्याला आहेत. अनेक गावात ओबीसी व आदिवासी समाज एकत्रितरित्या वास्तव्य करतात. मात्र ९ जून २०१३ रोजी भारत सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये पेसा अधिसूचना अनुसूचित क्षेत्रासाठी लागू केली आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यात एक हजार ३११ गावांमध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. येथे शासनाच्या १२ जागा या केवळ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठीच राखीव राहणार आहेत. त्यामुळे ओबीसी समाजाची मोठी गोची झाली आहे. ओबीसी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ही बाब आमदार डॉ. देवराव होळी व आमदार क्रिष्णा गजबे यांनी राज्यपालांना समाजावून सांगितली. त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी पेसा अधिसूचनेत बदल करण्यात यावा, अशी विनंती दोन्ही आमदारांनी राज्यपाल महोदयांकडे केली. यावेळी जिल्ह्याच्या विविध विकास प्रश्नावरही राज्यपालांशी चर्चा करण्यात आली. (वार्ताहर)