शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

चणा व उडीद डाळ पोहोचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:32 IST

दिवाळीनिमित्त राशन दुकानातून चणा व उडीद डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र हे धान्य जिल्ह्यात उपलब्धच झाले नाही. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत चणा व उडीद डाळ वितरित झालीच नाही.

ठळक मुद्देदिवाळीची भेट : लाभार्थ्यांचा झाला भ्रमनिरास

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवाळीनिमित्त राशन दुकानातून चणा व उडीद डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र हे धान्य जिल्ह्यात उपलब्धच झाले नाही. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत चणा व उडीद डाळ वितरित झालीच नाही. शासनाचे आश्वासन हवेतच विरले असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून केला जात आहे.गरीब नागरिकांना राशन दुकानाच्या माध्यमातून अत्यंत कमी किमतीत धान्य उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये तांदूळ, गहू व साखर यांचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून तूर डाळ उपलब्ध करून दिली जात आहे. यावर्षीच्या दिवाळीत पहिल्यांदाच चणा व उडीद डाळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. याबाबतचे निर्देशही पुरवठा विभाग व संबंधित दुकानदारांना देण्यात आले होते. दुकानदारांकडून कार्डनिहाय माहिती मागविण्यात आली होती. त्यामुळे दिवाळीपूर्वी चणा व उडीद डाळ उपलब्ध होईल, अशी आशा लाभार्थी बाळगून होते. दिवाळीच्या कालावधीत नोव्हेंबर महिन्याच्या धान्याचे वितरण करण्यात आले. लाभार्थी चणा व उडीद डाळीबाबत राशन दुकानदाराला विचारणा करीत होता. मात्र डाळ उपलब्ध झाली नसल्याचे सांगावे लागत होते. शासनाने चणा व उडीद डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे वेळेच्या आत ही डाळ राशन दुकानांपर्यंत पोहोचली नाही.अतिशय निकृष्ट गहू उपलब्धनोव्हेंबर महिन्यात काही राशन दुकानदारांना अतिशय निकृष्ट दर्जाचे गहू उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही पोत्यांमधील गहू एवढे खराब आहेत की ते जनावरेही खावू शकत नाही. ऐन दिवाळीच्या कालावधीत निकृष्ट दर्जाचे गहू उपलब्ध करून देण्याबाबत लाभार्थ्यांनी ओरड केली आहे. काही लाभार्थी तर दुकानदारासोबत हुज्जत घालत होते.एक किलो गव्हामुळे लाभार्थी नाराजइतर जिल्ह्यांमध्ये प्रती लाभार्थी दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू दिले जातात. मात्र गडचिरोली जिल्ह्यात केवळ एक किलो गहू व चार किलो तांदूळ दिले जातात. जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. प्रत्येकाच्या घरीच धान पिकतात. त्यामुळे त्यांना गव्हाची खऱ्या अर्थाने आवश्यकता असताना गहूच कमी उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची अडचण होत आहे. लोकप्रतिनिधींनी या गंभीरबाबीकडे लक्ष घालून गहू व तांदळाचे प्रमाण बदलवावे, अशी मागणी आहे.