शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

चणा व उडीद डाळ पोहोचलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:32 IST

दिवाळीनिमित्त राशन दुकानातून चणा व उडीद डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र हे धान्य जिल्ह्यात उपलब्धच झाले नाही. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत चणा व उडीद डाळ वितरित झालीच नाही.

ठळक मुद्देदिवाळीची भेट : लाभार्थ्यांचा झाला भ्रमनिरास

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवाळीनिमित्त राशन दुकानातून चणा व उडीद डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र हे धान्य जिल्ह्यात उपलब्धच झाले नाही. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत चणा व उडीद डाळ वितरित झालीच नाही. शासनाचे आश्वासन हवेतच विरले असल्याचा आरोप लाभार्थ्यांकडून केला जात आहे.गरीब नागरिकांना राशन दुकानाच्या माध्यमातून अत्यंत कमी किमतीत धान्य उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये तांदूळ, गहू व साखर यांचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून तूर डाळ उपलब्ध करून दिली जात आहे. यावर्षीच्या दिवाळीत पहिल्यांदाच चणा व उडीद डाळ वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. याबाबतचे निर्देशही पुरवठा विभाग व संबंधित दुकानदारांना देण्यात आले होते. दुकानदारांकडून कार्डनिहाय माहिती मागविण्यात आली होती. त्यामुळे दिवाळीपूर्वी चणा व उडीद डाळ उपलब्ध होईल, अशी आशा लाभार्थी बाळगून होते. दिवाळीच्या कालावधीत नोव्हेंबर महिन्याच्या धान्याचे वितरण करण्यात आले. लाभार्थी चणा व उडीद डाळीबाबत राशन दुकानदाराला विचारणा करीत होता. मात्र डाळ उपलब्ध झाली नसल्याचे सांगावे लागत होते. शासनाने चणा व उडीद डाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र योग्य नियोजन केले नाही. त्यामुळे वेळेच्या आत ही डाळ राशन दुकानांपर्यंत पोहोचली नाही.अतिशय निकृष्ट गहू उपलब्धनोव्हेंबर महिन्यात काही राशन दुकानदारांना अतिशय निकृष्ट दर्जाचे गहू उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही पोत्यांमधील गहू एवढे खराब आहेत की ते जनावरेही खावू शकत नाही. ऐन दिवाळीच्या कालावधीत निकृष्ट दर्जाचे गहू उपलब्ध करून देण्याबाबत लाभार्थ्यांनी ओरड केली आहे. काही लाभार्थी तर दुकानदारासोबत हुज्जत घालत होते.एक किलो गव्हामुळे लाभार्थी नाराजइतर जिल्ह्यांमध्ये प्रती लाभार्थी दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू दिले जातात. मात्र गडचिरोली जिल्ह्यात केवळ एक किलो गहू व चार किलो तांदूळ दिले जातात. जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. प्रत्येकाच्या घरीच धान पिकतात. त्यामुळे त्यांना गव्हाची खऱ्या अर्थाने आवश्यकता असताना गहूच कमी उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची अडचण होत आहे. लोकप्रतिनिधींनी या गंभीरबाबीकडे लक्ष घालून गहू व तांदळाचे प्रमाण बदलवावे, अशी मागणी आहे.