शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शीचे उपजिल्हा रूग्णालय रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST

चामोर्शी तालुक्यातील लोकसंख्या, विस्तार व रूग्णांची संख्या लक्षात घेता येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्याची अनेक दिवसांपासून जनतेची मागणी होती. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली ही मागणी महाराष्ट्र शासनाने १७ जानेवारी २०१३ मध्ये सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा मंजूर केला.

ठळक मुद्देसात वर्षांपासून प्रतिक्षाच : आरोग्य सेवा कोलमडली

रत्नाकर बोमीडवार।लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी तालुका मुख्यालयी असलेल्या ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. मात्र त्यानंतर कुठलीही कार्यवाही न झाल्याने चामोर्शी तालुक्यातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची प्रतीक्षा कायम आहे.चामोर्शी तालुक्यातील लोकसंख्या, विस्तार व रूग्णांची संख्या लक्षात घेता येथील ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करण्याची अनेक दिवसांपासून जनतेची मागणी होती. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली ही मागणी महाराष्ट्र शासनाने १७ जानेवारी २०१३ मध्ये सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा मंजूर केला. त्यात चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपलब्ध असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालयामध्ये श्रेणी वर्धन करण्यास मान्यता देण्यात आली. परंतु साडेसात वर्ष उलटूनही या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे जनतेत संताप व्यक्त केला जात आहे.चामोर्शी तालुक्यात ७५ ग्राम पंचायती, एक नगर पंचायत असून एकूण २१० गावे आहेत. तालुक्याची लोकसंख्या ३ लाखाच्या आसपास आहे. एवढ्या मोठ्या तालुक्यातील आरोग्य समस्या सोडविण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयाची आवश्यकता कितीतरी वर्षापासून होती. प्रदीर्घ काळ मागणी केल्यानंतर सन २०१३ मध्ये शासनाने ‘त्या’ मागणीला मान्यता दिली. परंतु शासनाच्या आरोग्य विभागाची म्हैैस चिखलात फसली. अद्याप ती निघाली नाही. अनेक लोकप्रतिनिधी आले व गेले परंतु कोणीही चामोर्शीच्या आरोग्यसेवेला गांभीर्याने घेतले नाही.चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात मे २०२० या एका महिन्यात ४ हजार २०८ बाह्य रूग्ण, २२४ आंतररूग्ण भरती होते. गरोदर माता ८२, प्रसूती झालेल्या महिला ३३, विविध लसीकरण ७७, प्रथम सिझर प्रसूती १, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे ६० रूग्ण दाखल होते. एवढ्या रूग्णसंख्येसाठी केवळ ३० खाटांचे रूग्णालय कसे सांभाळत असेल, याची कल्पना न केलेली बरी. अनेक कंत्राटी वैैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भरवशावर चामोर्शी तालुक्याची आरोग्य सेवा सुरू आहे. कार्यरत कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थायी होण्यासाठी अनेकदा आंदोलने केली. अजुनही लढा सुरूच आहे. अस्थायी कर्मचाºयांना न्याय देऊन चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रूपांतर करावे, अशी मागणी जोर धरत आहे.दोन रूग्णवाहिकांची आवश्यकताचामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात अ‍ॅडव्हॉन्स लाईफ सपोर्ट १०८ व बीएससी-१०८ अशा दोन रूग्णवाहिकांची गरज आहे. त्यामुळे शासनाने सदर दोन्ही रूग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी चामोर्शीकरांनी केली आहे. यासाठी पुढाकाराची गरज आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल