‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत राज्यभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चामाेर्शी येथील नगर पंचायतमध्ये पर्यावरण संवर्धनाची शपथ घेण्यात आली. भूमी, जल, वायू, आकाश या पंचतत्त्वाचे संवर्धन करण्याकरिता वृक्षाराेपण, तलाव साैंदर्यीकरण, घनकचरा व्यवस्थापन, साैरऊर्जेचा वापर अधिक करणे, प्रदूषण न करणाऱ्या वाहनांचा वापर करणे आदी माेहीम राबविली जात आहे. नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने ही माेहीम जाेमात सुरू आहे. शहरातील गाव तलावात अनावश्यक वनस्पती व प्लास्टिक कचरा माेठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पाणी साठवणूक क्षमता घटत आहे. तलावातील विशिष्ट भागातील कचरा काढण्याचे काम प्रशासनाचे वतीने टप्प्याटप्प्याने सुरू आहे. पहिल्या दिवशी दाेन ट्रॅक्टर म्हणजे जवळपास ५ टन वनस्पती व प्लास्टिक कचरा तलावातून बाहेर काढण्यात आला. मुख्याधिकारी सतीश चाैधरी यांच्या मार्गदर्शनात जलस्वच्छता माेहीम सुरू करण्यात आली. या माेहिमेत निखिल कारेकर, भारत वासेकर, सुरेश नगराळे, शेख सय्यद, अल्केश बन्साेड, स्नेहल भुरसे, राकेश काेत्तावार, दिलीप लाडे, साेनी पिपरे, आकाश काेडव्ते, राकेश वासेकर व अन्य कर्मचारी सहभागी झाले.
चामाेर्शीत तलाव स्वच्छता माेहीम जाेमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST