शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

संस्कारक्षम पिढी घडविणे पालकांसमोर आव्हान

By admin | Updated: December 23, 2016 00:58 IST

बदलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये मुलाला संस्कारक्षम बनविणे सर्वात मोठे आव्हान असून हे आव्हान पालकांनी पेलले पाहिजे,

शांतिलाल मुथ्था यांचे प्रतिपादन : भारतीय जैन समाजातर्फे सत्कार कार्यक्रम गडचिरोली : बदलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये मुलाला संस्कारक्षम बनविणे सर्वात मोठे आव्हान असून हे आव्हान पालकांनी पेलले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष तथा शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील तळोधी केंद्रात चालू वर्षात मूल्यवर्धन हा उपक्रम शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी शांतिलाल मुथ्था गडचिरोली जिल्ह्यात गुरूवारी आले होते. या निमित्त भारतीय जैन संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने धानोरा मार्गावरील रामायण हॉटेलमध्ये गुरूवारी शांतिलाल मुथ्था यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुथ्था बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटना शाखा चंद्रपूरचे अमर गांधी, दीपक पारख, महेंद्र मंडलेचा, प्रशांत बैद, नीरज खजांची, जितेंद्र जोगड, गौरव कोचर, दिलीप भंडारी, पद्म लोढा, रोहित पुगलिया, भारतीय जैन संघटना शाखा गडचिरोलीचे डॉ. गणेश जैन, शैलेश महाजन, प्रकाशभाई कामदार, धनराज जैन, मनोज जैन, डॉ. सुषमा गणेश जैन, सुरेश खजांची, टोपरे, डोळस, अनिल जैन, सावळकर, निरज बोथरा यांच्यासह जैन समाजातील अनेक नागरिक व महिला उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भारतीय जैन संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने शांतिलाल मुथ्था यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना शांतिलाल मुथ्था म्हणाले की, मुलगी बाहेरच्या वातावरणाचा सामना करू शकेल, यासाठी तिला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली जाते. या कार्यशाळेत मुलींना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ३ हजार मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात आले आहे. जैन समाजाच्या विकासासाठीही विविध कार्यक्रम भारतीय जैन संघटनेच्या वतीने राबविले जातात. राज्य दृष्काळमुक्त करण्यासाठी चित्रपट अभिनेते आमीर खान व जैन संघटनेच्या विद्यमाने राज्यभरात उपक्रम राबविला जात आहे. राज्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी जैन संघटनेने स्वीकारली आहे. मूल्यवर्धन हा कार्यक्रम राज्यातील काही निवडक शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे. सरकारने या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे महत्त्व जाणले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा विचार शासन करीत असून भविष्यात राज्यातील सर्व शाळांमध्ये मूल्यशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आपण गडचिरोली जिल्ह्यात यापुढे नेहमी येत राहू, असे आश्वासन शांतिलाल मुथ्था यांनी उपस्थितांना दिले. कार्यक्रमाचे संचालन शैलेश महाजन यांनी केले. (नगर प्रतिनिधी)