शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

संस्कारक्षम पिढी घडविणे पालकांसमोर आव्हान

By admin | Updated: December 23, 2016 00:58 IST

बदलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये मुलाला संस्कारक्षम बनविणे सर्वात मोठे आव्हान असून हे आव्हान पालकांनी पेलले पाहिजे,

शांतिलाल मुथ्था यांचे प्रतिपादन : भारतीय जैन समाजातर्फे सत्कार कार्यक्रम गडचिरोली : बदलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये मुलाला संस्कारक्षम बनविणे सर्वात मोठे आव्हान असून हे आव्हान पालकांनी पेलले पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष तथा शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी केले. चामोर्शी तालुक्यातील तळोधी केंद्रात चालू वर्षात मूल्यवर्धन हा उपक्रम शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी शांतिलाल मुथ्था गडचिरोली जिल्ह्यात गुरूवारी आले होते. या निमित्त भारतीय जैन संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने धानोरा मार्गावरील रामायण हॉटेलमध्ये गुरूवारी शांतिलाल मुथ्था यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुथ्था बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटना शाखा चंद्रपूरचे अमर गांधी, दीपक पारख, महेंद्र मंडलेचा, प्रशांत बैद, नीरज खजांची, जितेंद्र जोगड, गौरव कोचर, दिलीप भंडारी, पद्म लोढा, रोहित पुगलिया, भारतीय जैन संघटना शाखा गडचिरोलीचे डॉ. गणेश जैन, शैलेश महाजन, प्रकाशभाई कामदार, धनराज जैन, मनोज जैन, डॉ. सुषमा गणेश जैन, सुरेश खजांची, टोपरे, डोळस, अनिल जैन, सावळकर, निरज बोथरा यांच्यासह जैन समाजातील अनेक नागरिक व महिला उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान भारतीय जैन संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने शांतिलाल मुथ्था यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना शांतिलाल मुथ्था म्हणाले की, मुलगी बाहेरच्या वातावरणाचा सामना करू शकेल, यासाठी तिला शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली जाते. या कार्यशाळेत मुलींना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ३ हजार मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात आले आहे. जैन समाजाच्या विकासासाठीही विविध कार्यक्रम भारतीय जैन संघटनेच्या वतीने राबविले जातात. राज्य दृष्काळमुक्त करण्यासाठी चित्रपट अभिनेते आमीर खान व जैन संघटनेच्या विद्यमाने राज्यभरात उपक्रम राबविला जात आहे. राज्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी जैन संघटनेने स्वीकारली आहे. मूल्यवर्धन हा कार्यक्रम राज्यातील काही निवडक शाळांमध्ये सुरू करण्यात आला आहे. सरकारने या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे महत्त्व जाणले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा विस्तार करण्याचा विचार शासन करीत असून भविष्यात राज्यातील सर्व शाळांमध्ये मूल्यशिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आपण गडचिरोली जिल्ह्यात यापुढे नेहमी येत राहू, असे आश्वासन शांतिलाल मुथ्था यांनी उपस्थितांना दिले. कार्यक्रमाचे संचालन शैलेश महाजन यांनी केले. (नगर प्रतिनिधी)