शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

वणवा थांबविण्याचे वन विभागासमोर आव्हान

By admin | Updated: March 10, 2017 02:18 IST

मार्च महिना सुरू होताच जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढते. यावर्षी पावसाळ्यानंतर केवळ ७ मार्च रोजी थोडाफार अवकाळी पाऊस झाला

कोट्यवधींचा खर्च : घनदाट जंगलामुळे आगीची शक्यता अधिकवैरागड : मार्च महिना सुरू होताच जंगलांना वनवे लागण्याचे प्रमाण वाढते. यावर्षी पावसाळ्यानंतर केवळ ७ मार्च रोजी थोडाफार अवकाळी पाऊस झाला. काही तालुक्यांमध्ये तर पाऊसही पडला नाही. त्यामुळे जंगलातील गवत पूर्णपणे वाळून आहे. थोडीशीही ठिणगी पडताच त्याला वनव्याचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यावर्षी वनवे थांबविणे हे वन विभागासमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे. मार्च महिन्याच्या प्रारंभापासून पूर्व विदर्भातील पानझडीच्या जंगलांना आगी लागण्याचे प्रकार घडतात. आगी लागू नये म्हणून वन विभागाच्या मार्फतीने फायरलाईन जाळली जाते. मात्र सदर उपाययोजना केवळ देखावा असल्याचे आजपर्यंत निष्पन्न झाले आहे. याबाबीवर मोठ्या प्रमाणात वन विभाग पर्यायाने शासनाचा पैसा खर्च होतो. मार्चपासून मोहफुलाचा हंगाम सुरू होते. मोहफूल विकणारे लोक झाडाखालील जागा साफ असावी, यासाठी पालापाचोळा गोळा करतात आणि त्याची ठिकाणी पालापाचोळा जाळून टाकतात. ही आग पसरत जाऊन वनव्याचे रूप धारण करते. वनवे लागण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकरी रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतातील गवत जाळतात. आग लावल्यानंतर आग विझविणे ही संबंधित शेतकऱ्याची जबाबदारी आहे. मात्र शेतकरी आग न विझविताच घराकडे परतात. त्यामुळे आग संपूर्ण जंगलात पसरते व आगीमुळे जंगलाचे मोठे नुकसान होते. या सर्व बाबी टाळण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. मात्र जनजागृतीचे काम वन विभागाच्या मार्फतीने पाहिजे त्या प्रमाणात केले जात नसल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात दाट जंगल आहे. त्यामुळे वनव्यांची समस्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक आहे. वन विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना अत्यंत तोकड्या असल्याचे दिसून येत आहे. वनव्याने रौद्ररूप धारण केल्यानंतर या वनव्यात दरवर्षी कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होते. त्यामुळे वन विभागाने आग थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)