शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

विविध मागण्यांसाठी सुभाषनगर येथे चक्काजाम आंदोलन

By admin | Updated: February 1, 2015 22:56 IST

स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून नवीन तालुके निर्माण करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन अहेरी जिल्हा कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरीच्या

अहेरी : स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून नवीन तालुके निर्माण करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन अहेरी जिल्हा कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरीच्या वतीने रविवारी सुभाषनगर फाटा येथे तब्बल दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर नायब तहसीलदार सिल्लमवार व किरंगे हे आंदोलनस्थळी पोहोचले. दरम्याना त्यांना अहेरी जिल्हा कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सुभाषनगर येथील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी गावकऱ्यांशी संवाद साधून समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या आंदोलनाचे नेतृत्व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, प्रा. नागसेन मेश्राम यांनी केले. या आंदोलनात राहूल मडावी, राजू तोरे, अतुल नागुलवार, माधव मांडरे, गणपत देशमुख, मारोती चौधरी, रावजी बट्टे, प्रदीप डोके, मोरेश्वर मुलकलवार, गणपत पोरेड्डीवार, गजानन सोनटक्के, तिरूपती कावठीवार, संतोष चरडे, उमाजी डोके, रमेश मुद्रकोलवार, सुमन देशमुख, वच्छला मंडरे, सावित्री नागुलवार, शोभा चौधरी, विमला डोके, इंदिरा चौधरी, ताणाबाई बट्टे, सुरेश डोके, संदीप चौधरी, बळीराम डोके, उद्धव कुतरमारे, परशुराम डोके, नामदेव नागुलवार, उमाजी हुलके आदीसह सुभाषनगर, जामगाव, चिंतलपेठ, तानबोडी, महागाव, मुत्तापूर आदी गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान मार्गावर वाहनांची रांग लागून तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. (प्रतिनिधी)या मागण्यांसाठी नागरिक रस्त्यावरनिवेदनात स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून जिमलगट्टा, जारावंडी, कसनसूर, पेरमिली, आष्टी, आसरअल्ली व कमलापूर आदी तालुके निर्माण करावे ४सुभाषनगर, जामगाव, चिंतलपेठ, तानबोडी येथील नागरिकांना वनहक्काचे पट्टे देण्यात यावे ४तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी ४सुभाषनगर जिलमगट्टा व आलापल्ली भागातील पाणी समस्या निकाली काढावी ४बालापल्ली-अहेरी-कागजनगर असा रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा ४देवलमरी सिमेंट उद्योग व सुरजागड लोहपोलाद उद्योग निर्माण करण्यात यावा ४मुलचेरा येथील चेन्ना सिंचन प्रकल्प त्वरीत सुरू करण्यात यावा ४प्राणहिता नदीवर वांगेपल्ली येथे पुलाचे बांधकाम करावे.