शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

विविध मागण्यांसाठी सुभाषनगर येथे चक्काजाम आंदोलन

By admin | Updated: February 1, 2015 22:56 IST

स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून नवीन तालुके निर्माण करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन अहेरी जिल्हा कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरीच्या

अहेरी : स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून नवीन तालुके निर्माण करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन अहेरी जिल्हा कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरीच्या वतीने रविवारी सुभाषनगर फाटा येथे तब्बल दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर नायब तहसीलदार सिल्लमवार व किरंगे हे आंदोलनस्थळी पोहोचले. दरम्याना त्यांना अहेरी जिल्हा कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सुभाषनगर येथील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी गावकऱ्यांशी संवाद साधून समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या आंदोलनाचे नेतृत्व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, प्रा. नागसेन मेश्राम यांनी केले. या आंदोलनात राहूल मडावी, राजू तोरे, अतुल नागुलवार, माधव मांडरे, गणपत देशमुख, मारोती चौधरी, रावजी बट्टे, प्रदीप डोके, मोरेश्वर मुलकलवार, गणपत पोरेड्डीवार, गजानन सोनटक्के, तिरूपती कावठीवार, संतोष चरडे, उमाजी डोके, रमेश मुद्रकोलवार, सुमन देशमुख, वच्छला मंडरे, सावित्री नागुलवार, शोभा चौधरी, विमला डोके, इंदिरा चौधरी, ताणाबाई बट्टे, सुरेश डोके, संदीप चौधरी, बळीराम डोके, उद्धव कुतरमारे, परशुराम डोके, नामदेव नागुलवार, उमाजी हुलके आदीसह सुभाषनगर, जामगाव, चिंतलपेठ, तानबोडी, महागाव, मुत्तापूर आदी गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान मार्गावर वाहनांची रांग लागून तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. (प्रतिनिधी)या मागण्यांसाठी नागरिक रस्त्यावरनिवेदनात स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून जिमलगट्टा, जारावंडी, कसनसूर, पेरमिली, आष्टी, आसरअल्ली व कमलापूर आदी तालुके निर्माण करावे ४सुभाषनगर, जामगाव, चिंतलपेठ, तानबोडी येथील नागरिकांना वनहक्काचे पट्टे देण्यात यावे ४तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी ४सुभाषनगर जिलमगट्टा व आलापल्ली भागातील पाणी समस्या निकाली काढावी ४बालापल्ली-अहेरी-कागजनगर असा रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा ४देवलमरी सिमेंट उद्योग व सुरजागड लोहपोलाद उद्योग निर्माण करण्यात यावा ४मुलचेरा येथील चेन्ना सिंचन प्रकल्प त्वरीत सुरू करण्यात यावा ४प्राणहिता नदीवर वांगेपल्ली येथे पुलाचे बांधकाम करावे.