शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
7
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
8
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
9
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
10
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
11
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
12
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
13
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
14
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
15
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
16
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
17
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
18
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
19
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
20
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

विविध मागण्यांसाठी सुभाषनगर येथे चक्काजाम आंदोलन

By admin | Updated: February 1, 2015 22:56 IST

स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून नवीन तालुके निर्माण करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन अहेरी जिल्हा कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरीच्या

अहेरी : स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून नवीन तालुके निर्माण करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन अहेरी जिल्हा कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरीच्या वतीने रविवारी सुभाषनगर फाटा येथे तब्बल दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर नायब तहसीलदार सिल्लमवार व किरंगे हे आंदोलनस्थळी पोहोचले. दरम्याना त्यांना अहेरी जिल्हा कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सुभाषनगर येथील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी गावकऱ्यांशी संवाद साधून समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या आंदोलनाचे नेतृत्व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, प्रा. नागसेन मेश्राम यांनी केले. या आंदोलनात राहूल मडावी, राजू तोरे, अतुल नागुलवार, माधव मांडरे, गणपत देशमुख, मारोती चौधरी, रावजी बट्टे, प्रदीप डोके, मोरेश्वर मुलकलवार, गणपत पोरेड्डीवार, गजानन सोनटक्के, तिरूपती कावठीवार, संतोष चरडे, उमाजी डोके, रमेश मुद्रकोलवार, सुमन देशमुख, वच्छला मंडरे, सावित्री नागुलवार, शोभा चौधरी, विमला डोके, इंदिरा चौधरी, ताणाबाई बट्टे, सुरेश डोके, संदीप चौधरी, बळीराम डोके, उद्धव कुतरमारे, परशुराम डोके, नामदेव नागुलवार, उमाजी हुलके आदीसह सुभाषनगर, जामगाव, चिंतलपेठ, तानबोडी, महागाव, मुत्तापूर आदी गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान मार्गावर वाहनांची रांग लागून तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. (प्रतिनिधी)या मागण्यांसाठी नागरिक रस्त्यावरनिवेदनात स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून जिमलगट्टा, जारावंडी, कसनसूर, पेरमिली, आष्टी, आसरअल्ली व कमलापूर आदी तालुके निर्माण करावे ४सुभाषनगर, जामगाव, चिंतलपेठ, तानबोडी येथील नागरिकांना वनहक्काचे पट्टे देण्यात यावे ४तीन पिढ्याची अट रद्द करण्यात यावी ४सुभाषनगर जिलमगट्टा व आलापल्ली भागातील पाणी समस्या निकाली काढावी ४बालापल्ली-अहेरी-कागजनगर असा रेल्वे मार्ग तयार करण्यात यावा ४देवलमरी सिमेंट उद्योग व सुरजागड लोहपोलाद उद्योग निर्माण करण्यात यावा ४मुलचेरा येथील चेन्ना सिंचन प्रकल्प त्वरीत सुरू करण्यात यावा ४प्राणहिता नदीवर वांगेपल्ली येथे पुलाचे बांधकाम करावे.