शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

विविध मागण्यांसाठी सुभाषनगर येथे चक्काजाम आंदोलन

By admin | Updated: December 8, 2014 22:35 IST

अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याबरोबरच या परिसरातील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने

अहेरी : अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्याबरोबरच या परिसरातील समस्या सोडविण्यात याव्या या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुभाषनगर येथे दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जिमलगट्टा, जारावंडी, कसनसूर, गट्टा, कमलापूर, पेरमिली, आष्टी, आसरअल्ली या नवीन तालुक्यांची निर्मिती करावी, हिवाळी अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ घोषीत करावा, अहेरी सिरोंचा शहरांना नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा, चेन्ना सिंचन प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करावे, पर्लकोटा, गडअहेरी दिना नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, आशा वर्करला ५ हजार रूपये मानधन देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी सुभाषनगर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास चक्काजाम केल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली. आंदोलकांची आक्रमकता लक्षात घेऊन नायब तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी घटनास्थळ गाठून आंदोलकांचे मागण्या ऐकून घेतल्या त्यानंतर निवेदन स्वीकारले. आंदोलनाचे नेतृत्व अहेरी जिल्हा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, अतूल उईके, पवन कोसरे, राहूल मडावी, अतुल नागूलवार, सुनिल मडावी, निमकर कुमरे, राकेश मेश्राम, राजू तोरेम, मंगेश आत्राम, संयज आत्राम, संजय मडावी, सुरेश सडमेक, राकेश तोरेम, संतोष कुळमेथे, बाजीराव कुमरे, सलमान शेख, इमाम शेख, वाजिद शेख, निसार शेख, नुस्तफा शेख, चैकी तलांडे यांनी केले. आंदोलनात शेकडो नागरिक सहभागी झाले. (प्रतिनिधी)