शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

केंद्रीय पथक पूरग्रस्त भागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली/देसाईगंज : केंद्र सरकारच्या पथकाने शनिवारी (दि.१२) गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांशी संवाद । शेतावर जाऊन जाणून घेतली पीकांची दुरवस्था, गावांमध्येही पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/देसाईगंज : केंद्र सरकारच्या पथकाने शनिवारी (दि.१२) गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन आॅगस्टच्या अखेरीस निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना दिलासाही देण्याचा प्रयत्न या पथकाने केला. ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, यात खचून न जाता धीर धरा. झालेल्या नुकसानासाठी निकषाप्रमाणे मदत मिळेल, असा विश्वास शेतकऱ्यांना दिला.यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी जिल्हाधिकारी अनंत वालस्कर, प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर, आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार दहाट आणि देसाईगंजमधील अधिकाºयांसह संबंधित विभागाचे सर्व विभाग प्रमुख, स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यावेळी उपस्थित होते.शेतकºयांनी आपल्या शेतामध्ये उभे राहून नुकसानाबाबतची माहिती सांगितली. केंद्रीय पथकात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे सहसचिव तथा पथक प्रमुख रमेशकुमार गंटा, अर्थ मंत्रालयाचे सल्लागार आर.बी. कौल व कार्यकारी अभियंता तुषार व्यास यांचा समावेश होता.दौºयाआधी जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरणाद्वारे या पथकाला नुकसानाची माहिती देण्यात आली.या पथकाने कनेरी, पारडी, गोगाव, देऊळगाव, ठाणेगाव, देसाईगंजमधील हनुमान वार्ड व सावंगी या ठिकाणी भेट दिली. यादरम्यान पथकाने स्थानिक नागरिकांसोबतही संवाद साधताना घरांचे, जनावरांचे तसेच शेतीमधील पिकांचा, झालेल्या इतर नुकसानाचा मोबदला मिळेल. त्याकरीताच आम्ही येथे आलो असल्याचे सांगितले. नुकसानाची संपूर्ण माहिती ग्रामसेवक, तलाठी तसेच शासनस्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांना पंचनामा करताना द्यावी, असे त्यांनी सांगितले. देसाईगंज येथील बायपास रस्त्याचे झालेले नुकसान, तसेच सावंगी गावातील घरांची झालेली पडझड, महावितरणचे वीज पुरवठ्याबाबत झालेले नुकसान, शेतीविषयक नुकसान याबाबत त्यांनी सविस्तर पाहणी केली.स्थानिक लोकप्रतिनीधींचा ेपथकातील सदस्यांशी संवादआरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, स्थानिक सभापती, सरपंच यांनी यावेळी गावस्तरावर उपस्थित राहून पथकातील सदस्यांशी संवाद साधला. जिल्हयातील पूरिस्थतीबाबत पथकाला निवेदनातून माहिती सादर केली. जिल्हयातील नागरिकांनी असा विनापावसाचा पूर कधीही पाहिला नाही. गेल्या २५ वर्षापूर्वीच्या पूरापेक्षा हा पूर जास्त मोठा असून जास्तीत जास्त मदत मिळावी अशी मागणी त्यांनी पथकाकडे केली.

टॅग्स :floodपूरagricultureशेती