शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

हत्तींच्या स्थलांतराचा निर्णय केंद्र की राज्य सरकारचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2022 19:07 IST

Gadchiroli News कमलापूर आणि पातानीलच्या हत्ती कॅम्पमधील काही हत्तींसह ताडोबातील मिळून एकूण १३ हत्ती गुजरातच्या जामनगर येथील राधेकृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपविण्याचे पत्र मिळाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जनभावना उफाळून आली आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीकरांच्या भावनेला राजकीय साद

गडचिरोली : जिल्ह्यातील कमलापूर आणि पातानीलच्या हत्ती कॅम्पमधील काही हत्तींसह ताडोबातील मिळून एकूण १३ हत्ती गुजरातच्या जामनगर येथील राधेकृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टकडे सोपविण्याचे पत्र मिळाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जनभावना उफाळून आली आहे. हा निर्णय केंद्र सरकारचा की राज्य सरकारचा? असा प्रश्न नागरिकांमध्ये विचारला जात आहे. दरम्यान हत्तींना हलविण्यास होत असलेला विरोध पाहून राजकीय पक्ष आणि पुढाऱ्यांकडूनही विरोधाचा सूर आळवला जात आहे.

सदर हत्तींच्या हस्तांतरणासाठी केंद्र शासनाने ना हरकत दिली असल्याचा उल्लेख राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (नियोजन व व्यवस्थापन- वन्यजी) युवराज एस. यांनी पाठविलेल्या पत्रात केला आहे. त्यावरून हत्ती हलविण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या यंत्रणेकडूनच घेतल्याचा समज केला जात आहे; परंतु गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी दिल्लीत केंद्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय राज्य सरकारनेच घ्यायचा असतो, आम्ही केवळ सूचना करतो, असे स्पष्ट केले. यामुळे हत्ती हलविण्यासाठी नेमके कोण जबाबदार, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

पर्यटनाला चालना देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती कुठेही न हलविता येथेच त्यांचे योग्य पालनपोषण व्हावे, अशी जनभावना आहे. राज्य सरकारच्या वतीने गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हत्तींना हलविण्याचा निर्णय रद्द करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चा करणार असल्याचे तीन दिवसांपूर्वी सांगितले. मात्र, मुंबईतून अद्याप कोणतीही सूचना किंवा आदेश वनाधिकाऱ्यांना मिळाला नाही. अशातच गुरुवारी (दि.१९) ताडोबातील हत्ती हलविण्यात आले आहेत.

टॅग्स :wildlifeवन्यजीव