शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:37 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेली एकही आश्वासन सरकारने या चार वर्षात पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढविली, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी करण्यात आला.

ठळक मुद्देकाँग्रेसतर्फे विश्वासघात दिवस : पेट्रोल, डिझेल दरवाढीसह महागाई वाढविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेली एकही आश्वासन सरकारने या चार वर्षात पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढविली, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी करण्यात आला.केंद्र सरकारची चार वर्ष पूर्ण झाल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे शनिवारी विश्वासघात दिवस पाळून स्थानिक इंदिरा गांधी चौकात सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ याप्रसंगी दुचाकीला हार टाकून सरकारचा निषेध करण्यात आला. चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी लोकांना भरपूर स्वप्ने दाखविली. जनतेनेही त्यांना मोठ्या प्रमाणावर मते देऊन सत्तेवर काबीज केले. सत्तेवर आल्यावर दिलेली आश्वासने पूर्ण करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वासघात केला. मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराचा पंचनामा जनतेसमोर मांडू, असेही जिल्हा काँग्रेसने म्हटले आहे.परदेशातून १०० दिवसांत काळा पैसा आणू व सर्वांच्या खात्यात १५ लाख देऊ, असे आश्वासन निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु आज ४८ महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु काळा पैसा आला नाही. उलट निरव मोदी यांच्यासारख्या लोकांनी देशातील सफेद पैसा घेऊन परदेशात पळ काढला. हा विश्वासघात नाही तर काय, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला. आंतरराष्टÑीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवून २५ टक्के वॅटच्या माध्यमातून १७ लाख कोटी रूपये जनतेच्या खिशातून काढून घेतले. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकारकडे पैसा नाही. उलट १२ उद्योगपतींचे २ लाख ४१ हजार कोटी रूपये माफ करण्यात आले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोदी सरकारने कृषी क्षेत्रात कर लावला आहे. हा विश्वासघात नाही तर काय असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.केंद्र शासनाचा निषेध करताना जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश ताकसांडे, समशेर खॉ पठाण, प्रभाकर वासेकर, पंकज गुड्डेवार, सतीश विधाते, नंदू वाईलकर, रजनीकांत मोटघरे, डी.डी. सोनटक्के, पी.टी.मसराम, हरबाजी मोरे, अधिर इंगोले, एजाज शेख, प्रभाकर बारापात्रे, तुकाराम पुरनवार, विवेक ब्राह्मणवाडे, नेताजी गावतुरे, महादेव भोयर, बाबुराव बावणे, सोनाली पुण्यपवार, नीलिमा राऊत, लता ढोक, पूजा अहिरे, तुळशिदास भोयर, कमलेश खोब्रागडे, मिलींद बागेसर, प्रतीक बारसिंगे, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, प्रकाश मोहुर्ले, वैभव कळस्कर, कल्पक मुपिडवार व काँग्रेस, राकाँ कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस