शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:37 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेली एकही आश्वासन सरकारने या चार वर्षात पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढविली, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी करण्यात आला.

ठळक मुद्देकाँग्रेसतर्फे विश्वासघात दिवस : पेट्रोल, डिझेल दरवाढीसह महागाई वाढविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेली एकही आश्वासन सरकारने या चार वर्षात पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढविली, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी करण्यात आला.केंद्र सरकारची चार वर्ष पूर्ण झाल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे शनिवारी विश्वासघात दिवस पाळून स्थानिक इंदिरा गांधी चौकात सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ याप्रसंगी दुचाकीला हार टाकून सरकारचा निषेध करण्यात आला. चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी लोकांना भरपूर स्वप्ने दाखविली. जनतेनेही त्यांना मोठ्या प्रमाणावर मते देऊन सत्तेवर काबीज केले. सत्तेवर आल्यावर दिलेली आश्वासने पूर्ण करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वासघात केला. मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराचा पंचनामा जनतेसमोर मांडू, असेही जिल्हा काँग्रेसने म्हटले आहे.परदेशातून १०० दिवसांत काळा पैसा आणू व सर्वांच्या खात्यात १५ लाख देऊ, असे आश्वासन निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु आज ४८ महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु काळा पैसा आला नाही. उलट निरव मोदी यांच्यासारख्या लोकांनी देशातील सफेद पैसा घेऊन परदेशात पळ काढला. हा विश्वासघात नाही तर काय, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला. आंतरराष्टÑीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवून २५ टक्के वॅटच्या माध्यमातून १७ लाख कोटी रूपये जनतेच्या खिशातून काढून घेतले. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकारकडे पैसा नाही. उलट १२ उद्योगपतींचे २ लाख ४१ हजार कोटी रूपये माफ करण्यात आले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोदी सरकारने कृषी क्षेत्रात कर लावला आहे. हा विश्वासघात नाही तर काय असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.केंद्र शासनाचा निषेध करताना जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश ताकसांडे, समशेर खॉ पठाण, प्रभाकर वासेकर, पंकज गुड्डेवार, सतीश विधाते, नंदू वाईलकर, रजनीकांत मोटघरे, डी.डी. सोनटक्के, पी.टी.मसराम, हरबाजी मोरे, अधिर इंगोले, एजाज शेख, प्रभाकर बारापात्रे, तुकाराम पुरनवार, विवेक ब्राह्मणवाडे, नेताजी गावतुरे, महादेव भोयर, बाबुराव बावणे, सोनाली पुण्यपवार, नीलिमा राऊत, लता ढोक, पूजा अहिरे, तुळशिदास भोयर, कमलेश खोब्रागडे, मिलींद बागेसर, प्रतीक बारसिंगे, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, प्रकाश मोहुर्ले, वैभव कळस्कर, कल्पक मुपिडवार व काँग्रेस, राकाँ कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस