शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:37 IST

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेली एकही आश्वासन सरकारने या चार वर्षात पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढविली, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी करण्यात आला.

ठळक मुद्देकाँग्रेसतर्फे विश्वासघात दिवस : पेट्रोल, डिझेल दरवाढीसह महागाई वाढविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने २६ मे रोजी चार वर्षे पूर्ण केली. परंतु निवडणुकीपूर्वी दिलेली एकही आश्वासन सरकारने या चार वर्षात पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल दरवाढीसह जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून महागाई वाढविली, असा आरोप जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी करण्यात आला.केंद्र सरकारची चार वर्ष पूर्ण झाल्याच्या विरोधात काँग्रेसतर्फे शनिवारी विश्वासघात दिवस पाळून स्थानिक इंदिरा गांधी चौकात सरकारविरोधी निदर्शने करण्यात आली. पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ याप्रसंगी दुचाकीला हार टाकून सरकारचा निषेध करण्यात आला. चार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी लोकांना भरपूर स्वप्ने दाखविली. जनतेनेही त्यांना मोठ्या प्रमाणावर मते देऊन सत्तेवर काबीज केले. सत्तेवर आल्यावर दिलेली आश्वासने पूर्ण करतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वासघात केला. मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कारभाराचा पंचनामा जनतेसमोर मांडू, असेही जिल्हा काँग्रेसने म्हटले आहे.परदेशातून १०० दिवसांत काळा पैसा आणू व सर्वांच्या खात्यात १५ लाख देऊ, असे आश्वासन निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु आज ४८ महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु काळा पैसा आला नाही. उलट निरव मोदी यांच्यासारख्या लोकांनी देशातील सफेद पैसा घेऊन परदेशात पळ काढला. हा विश्वासघात नाही तर काय, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला. आंतरराष्टÑीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना सरकारने पेट्रोल, डिझेलचे भाव वाढवून २५ टक्के वॅटच्या माध्यमातून १७ लाख कोटी रूपये जनतेच्या खिशातून काढून घेतले. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला सरकारकडे पैसा नाही. उलट १२ उद्योगपतींचे २ लाख ४१ हजार कोटी रूपये माफ करण्यात आले. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोदी सरकारने कृषी क्षेत्रात कर लावला आहे. हा विश्वासघात नाही तर काय असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे.केंद्र शासनाचा निषेध करताना जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश ताकसांडे, समशेर खॉ पठाण, प्रभाकर वासेकर, पंकज गुड्डेवार, सतीश विधाते, नंदू वाईलकर, रजनीकांत मोटघरे, डी.डी. सोनटक्के, पी.टी.मसराम, हरबाजी मोरे, अधिर इंगोले, एजाज शेख, प्रभाकर बारापात्रे, तुकाराम पुरनवार, विवेक ब्राह्मणवाडे, नेताजी गावतुरे, महादेव भोयर, बाबुराव बावणे, सोनाली पुण्यपवार, नीलिमा राऊत, लता ढोक, पूजा अहिरे, तुळशिदास भोयर, कमलेश खोब्रागडे, मिलींद बागेसर, प्रतीक बारसिंगे, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, प्रकाश मोहुर्ले, वैभव कळस्कर, कल्पक मुपिडवार व काँग्रेस, राकाँ कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस