शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

जिल्हाभर वृक्ष लागवडीचा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:16 IST

३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत जिल्ह्यात सोमवारी पहिल्याच दिवशी सुमारे २२ हजार २७० रोपट्यांचे रोपण करण्यात आले. वन विभाग, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामान्य नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी व राजकीय पदाधिकारी वृक्ष लागवडीच्या या कामात व्यस्त होते.

ठळक मुद्देवृक्षदिंडीसह विविध उपक्रम : एकाच दिवशी २२ हजार रोपट्यांची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत जिल्ह्यात सोमवारी पहिल्याच दिवशी सुमारे २२ हजार २७० रोपट्यांचे रोपण करण्यात आले. वन विभाग, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामान्य नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी व राजकीय पदाधिकारी वृक्ष लागवडीच्या या कामात व्यस्त होते.गडचिरोली जिल्ह्याला सुमारे १ कोटी ८ लाख ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शासकीय कार्यालये, वन विभागाने वृक्ष लागवड करावी व त्याची प्रसिध्दी करावी, असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने दिले असल्याने सकाळपासूनच कर्मचारी वृक्ष लागवडीचे नियोजन करीत होते. आठ दिवसापर्यंत पाऊस झाला नव्हता. त्यामुळे वृक्ष लावायचे कसे, असा प्रश्न पडला होता. मात्र चार दिवसांपूर्वीपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीतील अडथळे दूर झाले. वृक्ष लागवड योजनेंतर्गत लावलेल्या वृक्षांची संख्या कळावी, यासाठी शासनाने स्वतंत्र वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप व कॉलसेंटर तयार केला आहे.सोमवारी सायंकाळपर्यंत सुमारे २२ हजार २७० वृक्षांची लागवड झाली असल्याचे वृक्ष लागवडीच्या वेबसाईटवर दिसत आहे. यामध्ये वन विभागाने सर्वाधिक १७ हजार ७५०, सामाजिक वनिकरण विभागाने ३ हजार ५२०, नगर परिषद, नगर पंचायतींनी १ हजार वृक्षांची लागवड केली आहे. वन विभागाने उद्दिष्टापेक्षा अधिक १ कोटी १२ लाख १४ हजार ९१० खड्डे खोदले आहेत. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने वन विभाग उद्दिष्टाएवढे वृक्ष लागवड करणार आहे. नोंदणीसाठी वन विभागाने माय प्लॅन्ट हा अ‍ॅप तयार केला आहे. त्यावर वृक्ष लागवड नोंदणीची सुविधा आहे.मागील वर्षी गडचिरोली जिल्ह्याला ५० लाख ७२ हजार ४२६ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात ५४ लाख ६० हजार ६६६ वृक्षांची लागवड झाली.आलापल्लीत विविध संस्थांचा पुढाकारवन विभाग आलापल्ली, अहेरी, आलापल्ली वन परिक्षेत्राधिकारी कार्यालय, उडाण फाऊंडेशन, राणी दुर्गावती विद्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आलापल्ली यांच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रम पार पडला. वृक्षदिंडीला आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे, उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे, संतोष मंथनवार यांनी वृक्षदिंडीला हिरवी झेंडी दाखविली. वन विभागाच्या कक्ष क्रमांक ४२ मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपवनसंरक्षक तांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून आलापल्लीच्या सरपंच सुगंधा मडावी, नागेपल्लीचे सरपंच सरोज दुर्गे, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत ठेपाले, डॉ. चरणजितसिंह सलुजा, लक्ष्मण येर्रावार, उपसरपंच पुष्पा अलोणे, रेखा तलांडे, आशिष झाडे, विनोद अंकपल्लीवार, सलिम शेख, सुधाकर पेद्दिवार, कैलास कोरेत, लक्ष्मण गंजीवार आदी उपस्थित होते. आभार अहेरीचे वन परिक्षेत्राधिकारी मनोज चव्हाण यांनी मानले. यावेळी उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे म्हणाले, वृक्ष लागवड करून निसर्ग संगोपण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वृक्ष लागवड हाच तरणोपाय आहे, असे मार्गदर्शन केले.गडचिरोलीत ५०० वृक्षांची लागवडगडचिरोली नगर परिषदेने शहरात एकाच दिवशी ५०० वृक्ष लावले आहेत. नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शिक्षण सभापती वर्षा बट्टे, महिला व बाल कल्याण सभापती गीता पोटावी, नगरसेविका अल्का पोहणकर, अनिता विश्रोजवार, वैष्णवी नैताम, रंजना गेडाम, नगरसेवक प्रमोद पिपरे, भुपेश कुळमेथे, केशव निंबोड, गुलाब मडावी यांच्यासह मुख्याधिकारी संजीव ओहोड व कर्मचारी हजर होते.