शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

कर्जाच्या ओझ्यात दिवाळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:02 IST

दिवाळीपूर्वीच शेतकºयांना कर्जमुक्त केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र दिवाळीपूर्वी केवळ २४ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

ठळक मुद्दे२४ शेतकºयांना लाभ : सुट्यांमुळे पुढची प्रक्रिया थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवाळीपूर्वीच शेतकºयांना कर्जमुक्त केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र दिवाळीपूर्वी केवळ २४ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. इतर शेतकºयांनी मात्र कर्जाचे ओझे मनावर ठेवतच दिवाळीचा सण साजरा केला आहे.कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाने प्रत्येक शेतकºयाला आॅनलाईन अर्ज भरणे सक्तीचे केले होते. यानुसार अपवाद वगळता बहुतांश शेतकºयांनी अर्ज केले. सदर अर्ज पात्र ठरण्यासाठी शासनाने अनेक निकष घातले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पातळीवर संबंधित शेतकºयाच्या अर्जाची, कर्जाची व त्याच्या आर्थिक परिस्थितीची चाचणी केली जात आहे. एखादा शेतकरी शासनाच्या अटीनुसार पात्र असला तरी बँक किंवा गावातील नागरिकांनी आक्षेप घेतल्यास सदर शेतकºयाचा अर्ज नामंजूर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतकºयांनी दिवाळी कर्जमुक्त व भयमुक्त वातावरणात साजरी करावी, यासाठी जास्तीत जास्त शेतकºयांना दिवाळीपूर्वीच कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र सदर आश्वासन फोल ठरले असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वी नाममात्र केवळ २४ शेतकºयांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. अगदी दिवाळीच्या एक दिवसाअगोदर पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रम घेऊन सदर शेतकºयांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. इतर शेतकरी कर्ज माफ होणार की नाही, या विवंचनेत सापडले आहेत. अशा वातावरणातच त्यांनी दिवाळी साजरी केली आहे.गुरूवारपासून शासकीय कार्यालयांना दिवाळीच्या सुट्या लागल्या. त्यामुळे कर्जमाफीची पुढील प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना अजून १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ५० हजार ३०६ शेतकºयांनी अर्ज केला आहे. यापैकी किती शेतकरी पात्र ठरणार आहेत, हे अजूनपर्यंत गुलदस्त्यातच असल्याने कर्जाचे ओझे कायम आहे.जिल्हा बँकेचे सर्वाधिक लाभार्थीगडचिरोली जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या ग्रामीण भागात शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून जिल्हा बँक शेतकºयांना कर्जाचे वितरण करते. राष्टÑीयकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेचे सर्वाधिक कर्जदार शेतकरी आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या योजनेत सर्वाधिक लाभ जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे.कर्मचाºयांनीही भरले अर्जकर्मचाºयांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही, त्याचबरोबर कर्जमाफीचा लाभ घेतल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र याला न जुमानता अनेक कर्मचारी असलेल्या शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरला आहे. दबाव तंत्राचा वापर करून चावडी वाचनादरम्यान त्यांचे अर्ज पात्र सुद्धा ठरले आहेत. तहसीलदारांकडे तक्रार करण्याची मुदत आता संपली आहे. कर्मचाºयांच्या कर्जमाफीमुळे शासनाला लाखो रूपयांचा अनावश्यक चुना लागणार आहे. त्यामुळे अशा कर्मचाºयांचा शोध घेऊन संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.