शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या ओझ्यात दिवाळी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:02 IST

दिवाळीपूर्वीच शेतकºयांना कर्जमुक्त केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र दिवाळीपूर्वी केवळ २४ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला.

ठळक मुद्दे२४ शेतकºयांना लाभ : सुट्यांमुळे पुढची प्रक्रिया थांबली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवाळीपूर्वीच शेतकºयांना कर्जमुक्त केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र दिवाळीपूर्वी केवळ २४ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. इतर शेतकºयांनी मात्र कर्जाचे ओझे मनावर ठेवतच दिवाळीचा सण साजरा केला आहे.कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाने प्रत्येक शेतकºयाला आॅनलाईन अर्ज भरणे सक्तीचे केले होते. यानुसार अपवाद वगळता बहुतांश शेतकºयांनी अर्ज केले. सदर अर्ज पात्र ठरण्यासाठी शासनाने अनेक निकष घातले आहेत. त्याचबरोबर प्रत्येक पातळीवर संबंधित शेतकºयाच्या अर्जाची, कर्जाची व त्याच्या आर्थिक परिस्थितीची चाचणी केली जात आहे. एखादा शेतकरी शासनाच्या अटीनुसार पात्र असला तरी बँक किंवा गावातील नागरिकांनी आक्षेप घेतल्यास सदर शेतकºयाचा अर्ज नामंजूर ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.शेतकºयांनी दिवाळी कर्जमुक्त व भयमुक्त वातावरणात साजरी करावी, यासाठी जास्तीत जास्त शेतकºयांना दिवाळीपूर्वीच कर्जमाफीचा लाभ देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र सदर आश्वासन फोल ठरले असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीपूर्वी नाममात्र केवळ २४ शेतकºयांना कर्जमुक्त करण्यात आले आहे. अगदी दिवाळीच्या एक दिवसाअगोदर पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रम घेऊन सदर शेतकºयांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. इतर शेतकरी कर्ज माफ होणार की नाही, या विवंचनेत सापडले आहेत. अशा वातावरणातच त्यांनी दिवाळी साजरी केली आहे.गुरूवारपासून शासकीय कार्यालयांना दिवाळीच्या सुट्या लागल्या. त्यामुळे कर्जमाफीची पुढील प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना अजून १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ५० हजार ३०६ शेतकºयांनी अर्ज केला आहे. यापैकी किती शेतकरी पात्र ठरणार आहेत, हे अजूनपर्यंत गुलदस्त्यातच असल्याने कर्जाचे ओझे कायम आहे.जिल्हा बँकेचे सर्वाधिक लाभार्थीगडचिरोली जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या ग्रामीण भागात शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून जिल्हा बँक शेतकºयांना कर्जाचे वितरण करते. राष्टÑीयकृत बँकांच्या तुलनेत जिल्हा बँकेचे सर्वाधिक कर्जदार शेतकरी आहेत. त्यामुळे कर्जमाफीच्या योजनेत सर्वाधिक लाभ जिल्हा बँकेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहे.कर्मचाºयांनीही भरले अर्जकर्मचाºयांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नाही, त्याचबरोबर कर्जमाफीचा लाभ घेतल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. मात्र याला न जुमानता अनेक कर्मचारी असलेल्या शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरला आहे. दबाव तंत्राचा वापर करून चावडी वाचनादरम्यान त्यांचे अर्ज पात्र सुद्धा ठरले आहेत. तहसीलदारांकडे तक्रार करण्याची मुदत आता संपली आहे. कर्मचाºयांच्या कर्जमाफीमुळे शासनाला लाखो रूपयांचा अनावश्यक चुना लागणार आहे. त्यामुळे अशा कर्मचाºयांचा शोध घेऊन संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.