शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरासाठी तरी युद्धविराम करा; माओवाद्यांची आता विनवणीची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 12:56 IST

तीन आठवड्यांतील तिसरे पत्रक समोर : उत्तर-पश्चिम सब झोनल ब्युरोच्या रुपेशची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगड व महाराष्ट्र पोलिसांच्या आक्रमक कारवायांना हतबल झालेल्या माओवाद्यांनी नरमाईची भूमिका घेतल्यानंतर तीन आठवड्यांतील तिसरे पत्रक २० एप्रिल रोजी समोर आले. यामध्ये एक महिन्यासाठी तरी युद्धविराम करा, अशी विनवणी उत्तर-पश्चिम सब झोनल ब्युरो रुपेश याने केली आहे.

नक्षलवाद्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता व केंद्रीय समितीचा सदस्य अभय उर्फ सोनू उर्फ भूपती याने मार्च महिन्याच्या अखेरीस तेलुगुतून पत्रक काढून केंद्र सरकारपुढे शांती प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर उत्तर पश्चिम सब झोनल ब्युरो प्रभारी रुपेश याने युद्धविरामाचा पुनरुच्चार करणारे पत्रक ८ एप्रिल रोजी जारी केले होते. आता रुपेशचेच १७ एप्रिल रोजीचे तिसरे पत्रक आले आहे. यात त्याने पहिल्यांदाच छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय वर्मा यांचे आभार मानले आहेत. त्याने म्हटले आहे की, माझ्या पत्रकावर त्यांनी प्रतिक्रिया दिली, याबद्दल मी आभारी आहे, असेही त्याने म्हटले आहे. 

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड, महाराष्ट्रातील गडचिरोली, झारखंड, तेलंगणा या प्रमुख नक्षल प्रभावित राज्यात सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी कारवाया सुरु आहेत. यामुळे मागील १५ महिन्यात ४०० हून अधिक नक्षलवादी ठार झाले. प्रमुख नेत्यांनी आत्मसमर्पण केल्याने ही चळवळीला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे घाबरलेल्या नक्षल नेत्यांनी आणि समर्थकांनी २४ मार्चला तेलंगणात एक बैठक घेऊन सरकारपुढे युद्ध विराम प्रस्ताव मांडला होता. 

दोन्ही पक्षात शांती वार्ता होईपर्यंत कारवाया रोखण्यात याव्या, अशी विनंतीही करण्यात आली होती. मात्र, कारवाया सुरूच असल्याने हतबल झालेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा पत्रक जारी करून महिनाभरासाठी तरी युद्धविराम करा, अशी विनवणी केली आहे. एरवी जहाल भाषेत सरकारला इशारा देणारा नक्षलवाद्यांच्या उत्तर पश्चिम सब झोनल ब्युरो प्रभारी रुपेश याने पहिल्यांदाच नरमाईची भूमिका घेतली आहे.

शांती प्रस्तावामागे दुसरा उद्देश नाहीशांती प्रस्तावासाठी नक्षलवाद्यांचे प्रतिनिधी मंडळ, केंद्रीय समिती सदस्य आणि विशेष झोनल समिती सदस्य यांच्यात चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, अशा वातावरणात आम्ही भेटल्यास आमच्या सुरक्षेची हमी सरकारने द्यायला हवी. कारवाया रोखल्या तरच शांतीप्रस्ताव पुढे नेणे शक्य आहे. त्यासाठी किमान महिनाभर तरी युद्धविराम लागू केले पाहिजे. शांती प्रस्तावामागे आमचा कुठलाही दुसरा उद्देश नाही, असा खुलासाही त्याने केला आहे.

आत्मसमर्पणावर सरकार ठाममाओवाद्यांच्या शांतीप्रस्तावानंतर सरकारने आत्मसमर्पण हाच मार्ग असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. २० वर्षांपूर्वी तेलंगणात असाच प्रयत्न झाला होता. मात्र, यातून कुठलाच मार्ग निघाला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा प्रस्ताव हा माओवाद्यांच्या रणनीतीचा एक भाग असल्याची शंका, यंत्रणेला आहे. त्यामुळे आत्मसमर्पणाच्या अटीवर सरकार ठाम आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली