शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

महिनाभरासाठी तरी युद्धविराम करा; माओवाद्यांची आता विनवणीची भाषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 12:56 IST

तीन आठवड्यांतील तिसरे पत्रक समोर : उत्तर-पश्चिम सब झोनल ब्युरोच्या रुपेशची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छत्तीसगड व महाराष्ट्र पोलिसांच्या आक्रमक कारवायांना हतबल झालेल्या माओवाद्यांनी नरमाईची भूमिका घेतल्यानंतर तीन आठवड्यांतील तिसरे पत्रक २० एप्रिल रोजी समोर आले. यामध्ये एक महिन्यासाठी तरी युद्धविराम करा, अशी विनवणी उत्तर-पश्चिम सब झोनल ब्युरो रुपेश याने केली आहे.

नक्षलवाद्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता व केंद्रीय समितीचा सदस्य अभय उर्फ सोनू उर्फ भूपती याने मार्च महिन्याच्या अखेरीस तेलुगुतून पत्रक काढून केंद्र सरकारपुढे शांती प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर उत्तर पश्चिम सब झोनल ब्युरो प्रभारी रुपेश याने युद्धविरामाचा पुनरुच्चार करणारे पत्रक ८ एप्रिल रोजी जारी केले होते. आता रुपेशचेच १७ एप्रिल रोजीचे तिसरे पत्रक आले आहे. यात त्याने पहिल्यांदाच छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय वर्मा यांचे आभार मानले आहेत. त्याने म्हटले आहे की, माझ्या पत्रकावर त्यांनी प्रतिक्रिया दिली, याबद्दल मी आभारी आहे, असेही त्याने म्हटले आहे. 

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड, महाराष्ट्रातील गडचिरोली, झारखंड, तेलंगणा या प्रमुख नक्षल प्रभावित राज्यात सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी कारवाया सुरु आहेत. यामुळे मागील १५ महिन्यात ४०० हून अधिक नक्षलवादी ठार झाले. प्रमुख नेत्यांनी आत्मसमर्पण केल्याने ही चळवळीला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे घाबरलेल्या नक्षल नेत्यांनी आणि समर्थकांनी २४ मार्चला तेलंगणात एक बैठक घेऊन सरकारपुढे युद्ध विराम प्रस्ताव मांडला होता. 

दोन्ही पक्षात शांती वार्ता होईपर्यंत कारवाया रोखण्यात याव्या, अशी विनंतीही करण्यात आली होती. मात्र, कारवाया सुरूच असल्याने हतबल झालेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा पत्रक जारी करून महिनाभरासाठी तरी युद्धविराम करा, अशी विनवणी केली आहे. एरवी जहाल भाषेत सरकारला इशारा देणारा नक्षलवाद्यांच्या उत्तर पश्चिम सब झोनल ब्युरो प्रभारी रुपेश याने पहिल्यांदाच नरमाईची भूमिका घेतली आहे.

शांती प्रस्तावामागे दुसरा उद्देश नाहीशांती प्रस्तावासाठी नक्षलवाद्यांचे प्रतिनिधी मंडळ, केंद्रीय समिती सदस्य आणि विशेष झोनल समिती सदस्य यांच्यात चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, अशा वातावरणात आम्ही भेटल्यास आमच्या सुरक्षेची हमी सरकारने द्यायला हवी. कारवाया रोखल्या तरच शांतीप्रस्ताव पुढे नेणे शक्य आहे. त्यासाठी किमान महिनाभर तरी युद्धविराम लागू केले पाहिजे. शांती प्रस्तावामागे आमचा कुठलाही दुसरा उद्देश नाही, असा खुलासाही त्याने केला आहे.

आत्मसमर्पणावर सरकार ठाममाओवाद्यांच्या शांतीप्रस्तावानंतर सरकारने आत्मसमर्पण हाच मार्ग असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. २० वर्षांपूर्वी तेलंगणात असाच प्रयत्न झाला होता. मात्र, यातून कुठलाच मार्ग निघाला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा प्रस्ताव हा माओवाद्यांच्या रणनीतीचा एक भाग असल्याची शंका, यंत्रणेला आहे. त्यामुळे आत्मसमर्पणाच्या अटीवर सरकार ठाम आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली