शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वाघाच्या हल्ल्यात गुरे चारणाऱ्याचा मृत्यू, आरमोरी तालुक्यातील घटना; दहा महिन्यांत १६ वा बळी

By गेापाल लाजुरकर | Updated: October 7, 2022 21:12 IST

ठेमाजी आत्राम हे नेहमीप्रमाणे ७-८ सहकाऱ्यांसाेबत आपापली गुरे चराईसाठी कुरंझा परिसरातील जंगलात सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गेले होते.

गडचिरोली - गावापासून अगदी ३ किमी अंतरावरील जंगलात स्वमालकीची गुरे चारणाऱ्या इसमावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना शुक्रवार ७ ऑक्टाेबर राेजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. गेल्या दहा महिन्यात वाघाने घेतलेला हा १६ वा बळी आहे.

ठेमाजी माधव आत्राम (५५) रा. देशपूर ता. आरमाेरी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. ठेमाजी आत्राम हे नेहमीप्रमाणे ७-८ सहकाऱ्यांसाेबत आपापली गुरे चराईसाठी कुरंझा परिसरातील जंगलात सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गेले होते. हा परिसर झुडपी जंगलयुक्त असून याच भागातून पाल नदी वाहते. सर्वजण चहुबाजूंनी उभे राहून आपापली गुरे राखत हाेते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ठेमाजी आत्राम हे सहकाऱ्यांना दिसेनाशे झाले. याचवेळी सहकाऱ्यांनी एकमेकांना आवाज दिला; परंतु ठेमाजी यांनी प्रतिसाद दिला नाही. 

तेव्हा वाघाचा हल्ला झाला असावा, अशी शंका सहकाऱ्यांच्या मनात आली. त्यांनी गावात याबाबत माहिती दिली. तेव्हा गावातील नागरिक माेठ्या संख्येने जंगलाच्या दिशेने आले. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळविले. त्यानंतर दुपारपासून जंगलात शाेधमाेहीम राबविण्यात आली. शेवटी सायंकाळी ५:४५ वाजताच्या सुमारास ठेमाजी आत्राम यांचा मृतदेह सापडला. वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले हाेते.

गुरे चारण्यासाठी गुराखी मिळेनादेशपूरलगतच्या कुरंझा येथील एका गुराख्याला याच वर्षी २० जानेवारी राेजी वाघाने ठार केले हाेते. तेव्हापासून गुरे चराईसाठी गुराखी मिळेनासा झाला. त्यामुळे प्रत्येक पशुपालक आपापली गुरे शेतशिवारात चराईसाठी नेतात. अनेकजण शेतशिवारात गुरे राखतात तर काहीजण समुहाने जंगलालगत गुरे नेतात. तरीसुद्धा वाघाचे हल्ले सुरूच आहेत. विशेष म्हणजे, कुरंझासह परिसरातील यावर्षीची ही दुसरी घटना आहे. 

टॅग्स :Tigerवाघforestजंगलforest departmentवनविभाग