शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ट्रक जाळणाऱ्या इसमांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 01:04 IST

१६ जानेवारी २०१९ रोजी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून सात किमी अंतरावर गुरूपल्ली-कर्रेम दरम्यान आलापल्लीकडे जाणाºया बसला विरूध्द दिशेने येणाºया ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्यासह बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले तर अनेक प्रवासी जखमी झाले.

ठळक मुद्देगुरूपल्ली अपघात प्रकरण : आरोपींना केव्हाही अटक होणार

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : १६ जानेवारी २०१९ रोजी एटापल्ली-आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून सात किमी अंतरावर गुरूपल्ली-कर्रेम दरम्यान आलापल्लीकडे जाणाऱ्या बसला विरूध्द दिशेने येणाºया ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एका शाळकरी विद्यार्थ्यासह बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले तर अनेक प्रवासी जखमी झाले. या अपघात प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी ३० ते ४० इसमांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या आरोपींना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.सदर अपघात सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाºया ट्रकमुळे हा अपघात घडला. त्यामुळे सुरजागड प्रकल्प व लोहखनिज वाहतुकीला विरोध करीत लोकांनी सुरजागड पहाडावरील तब्बल १५ ट्रक जाळले. तसेच सात ट्रकच्या काचा फोडल्या. एटापल्ली येथे दोन दिवस मोठे आंदोलन करण्यात आले. अपघातात ठार झालेले वनपाल प्रकाश अंबादे यांचा मृतदेह आंदोलनस्थळी तब्बल ३० तास ठेवण्यात आला. याप्रसंगी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार दीपक आत्राम यांनीही आंदोलनाला पाठींबा दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अपघातातील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना लायड्स मेटल कंपनीकडून २५ लाख रूपयांची मदत मिळवून देऊन, कुटुंबातील एका सदस्याला अनुकंपावर नोकरी देणार, सुरजागड पहाडीवरील लोहदगडाची वाहतूक बंद करू, एटापल्ली-आलापल्ली या नवीन रोडचे काम आठ दिवसात सुरू करू, असे नानाविध आश्वासने दिली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सदर ट्रक जाळपोळ प्रकरणी एटापल्ली पोलीस ठाण्यात ३० ते ४० अज्ञात इसमाविरोधात भादंविचे कलम ४३५, ४२७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीची ओळख पटविणे सुरू असून आरोपींना केव्हाही अटक होऊ शकते. सदर प्रकरणातील आरोपींची संख्या वाढणार असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सदर प्रकरणाचा तपास एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी व ठाणेदार सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संजय राठोड करीत आहेत.

टॅग्स :fireआग