शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

गोंडवाना विद्यापीठाच्या पदभरतीवर उमेदवारांचे आक्षेप; स्थगितीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 22:19 IST

जनसंपर्क अधिकारी पदासाठी नियमांना तिलांजली देण्यात आल्याची चर्चा

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाकडून विविध पदांसाठी घेतली जात असलेली भरती प्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यातील जनसंपर्क अधिकारी या पदासाठीची मुलाखत प्रक्रिया नियमांना डावलून असल्याचा आरोप करत पदभरती प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी अनेक उमेदवारांनी केली आहे.कोणत्याही सरकारी पदभरतीत लेखी परीक्षेनंतर नमुना उत्तरपत्रिका आणि उमेदवारांना मिळालेले गुण जाहीर करणे आवश्यक असते. यासोबतच एका जागेसाठी किमान चार-पाच उमेदवारांना मुलाखतीला बोलविणे गरजेचे आहे. मात्र या दोन्ही बाबी गोंडवाना विद्यापीठाने टाळल्या. त्यामुळे यात घोळ झाल्याचा आरोप करून राज्यपाल, कुलगुरू यांच्याकडे दाद मागणार असल्याचे उमेदवारांनी सांगितले. तेथूनही दखल न घेतल्यास न्यायालयाचे दार ठोठावण्याचा इशारा दिला आहे.गेल्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पदभरतीची जाहीरात लागली. जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) या पदासाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवारांनी अर्ज केले. २३ मार्च २०१८ ला अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. पण बरेच दिवस वाट पाहूनही ही प्रक्रि या पुढे सरकली नाही. त्यानंतर तब्बल सव्वा वर्षानंतर ४ जून २०१९ ला अर्ज छाननीनंतर पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर टाकण्यात आली. यामध्ये ३७ उमेदवारांना पात्र ठरविण्यात आले, तर २४ उमेदवारांना विविध कारणांनी अपात्र ठरविण्यात आले. याच सुमारास या पदासाठी आवश्यक अभ्यासक्र म आणि नियमावलीही जाहीर करण्यात आली. नंतर १५ सप्टेंबरला लेखी परीक्षा असल्याचे पत्रक टाकण्यात आले. ही सर्व प्रक्रि या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जात होती. परीक्षेच्या ओळखपत्रासाठीही याच संकेतस्थळावर जावे लागले.  त्यानंतर लेखी परीक्षेच्या १० दिवसांत नमुना उत्तरपत्रिका याच संकेतस्थळावर झळकणे आवश्यक होते. पण उमेदवारांची निराशा झाली. एवढेच नाही तर उमेदवारांचे गुणही जाहीर करण्यात आले नाही. विद्यापीठाने थेट मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादीच जाहीर केली. त्यात केवळ दोन उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र ठरविले.वास्तविक मुलाखतीसाठी एका जागेसाठी किमान चार-पाच उमेदवारांना बोलविणे अपेक्षित असते. सोबतच लेखी परीक्षेनंतर नमुना उत्तरपत्रिकाही जाहीर करावी लागते. पण हे सारे नियम गोंडवाना विद्यापीठाने पायदळी तुडविल्याचा आरोपही उमेदवारांनी केला आहे.