शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

गावांतर्गत वाहतूक कर रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:37 IST

आरमोरी तालुक्यातील मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वैरागड येथे अंतर्गत रस्त्यावर बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर वाहतूक कर आकारला जातो. परंतु सदर वाहतूक कर व्यावसायिक व सर्वसामान्यांसाठी नुकसानकारक असल्याने सदर कर रद्द करावा, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.

ठळक मुद्देव्यावसायिकांची मागणी : वैरागड येथे स्थानिक प्रशासनाद्वारे दरवर्षी होते प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : आरमोरी तालुक्यातील मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असलेल्या वैरागड येथे अंतर्गत रस्त्यावर बाहेरून येणाऱ्या चारचाकी वाहनांवर वाहतूक कर आकारला जातो. परंतु सदर वाहतूक कर व्यावसायिक व सर्वसामान्यांसाठी नुकसानकारक असल्याने सदर कर रद्द करावा, अशी मागणी येथील व्यावसायिकांनी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे.प्रवासी वाहतूक करणारी चारचाकी वाहने बस थांब्यानंतर गांधी चौक, ग्रामपंचायत चौक, फुले चौक किंवा गावाअंतर्गत रस्त्यावर आल्यास त्यावर ग्रामपंचायत वाहतूक कर आकारते. त्यामुळे कोणतेही प्रवाशी वाहनधारक वाहतूक कराच्या भीतीपोटी गावात वाहन आणत नाही. एखादा व्यक्ती आजारी असल्यास किंवा वयोवृद्ध, दिव्यांग असल्यास त्याला बसथांब्यापासून घरापर्यंत पायपीट करून पोहोचावे लागते. एखाद्या चारचाकी वाहनचालकाला घरी पोहोचवून देण्याची विनंती केल्यास सदर वाहनधारक वाहतूक करावी संपूर्ण रक्कम वसूल केल्याशिवाय तो घरापर्यंत वाहनाद्वारे पोहोचवून देत नाही. या वाहतूक करामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय वैरागड येथे बहुसंख्य व्यापारी प्रतिष्ठाने असल्याने अनेक दुकानदार विविध प्रकारचा माल दुकानात वाहनाद्वारे आणतात. अशावेळी त्यांनाही वाहतूक कराचा बोजा सहन करावा लागतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लागू केलेला वाहतूक कर गावातील सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांच्या मुळावर आला आहे. सदर कर रद्द करून केवळ मोठ्या वाहनांवर वाहतूक कर कायम ठेवावा, अशी मागणी येथील व्यावसायिकांकडून होत आहे.स्थानिक प्रशासनाने गावात लागू केलेला वाहतूक कर ग्रामस्थांच्या मुळावर असल्याचे दिसून येते. सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कराच्या नियमाचा फटका बसत आहे. तर व्यावसायिकांचे नुकसान होत आहे. गावाअंतर्गत वाहतूक कर रद्द करावा, अशी मागणी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे केली. यासंदर्भात गावातील नागरिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.ठराव पारित करण्याची प्रतीक्षाया वर्षात प्रवासी वाहन किंवा चारचाकी वाहनावरील वाहतूक करासंदर्भात लिलाव होणार नाही. परंतु चारचाकी वाहनापेक्षा मोठी वाहने गावात प्रवेश करतील. त्यांच्यावर वाहतूक कर आकारण्यात येणार आहे. धान डुलाई करणारी मोठी वाहने तसेच मोठी भारवाहक वाहने गावात रस्त्यावर उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. परिणामी रस्त्याने आवागमन करणाऱ्या लोकांना प्रचंड त्रास होतो. तसेच मालाची चढउतार करण्यासाठी गावात मोठी वाहने येतात. अशा वाहनांवर कर आकारला जाणार आहे. यामध्ये कृषी व शासकीय वाहनांना सूट दिली जाईल. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने विचार सुद्धा केलेला आहे. परंतु अद्यापही रीतसर ठराव पारित करण्यात आला नाही.

टॅग्स :Taxकर