शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
2
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
3
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
4
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
5
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
6
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
7
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
10
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
11
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
12
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
13
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
14
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
15
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
16
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
17
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
18
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण
19
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

अग्निशामक खरेदी ठराव रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:35 IST

देसाईगंज नगरपालिकेने देवी फायर सर्व्हिसेस या कंपनीकडून ५९ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक असून खरेदी किंमत व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची मागणी : दोन वाहने असतानाही तिसरे खरेदी करीत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज नगरपालिकेने देवी फायर सर्व्हिसेस या कंपनीकडून ५९ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक असून खरेदी किंमत व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे. शिवाय नगर पालिकेकडे आधीच दोन अग्निशामक असताना तिसऱ्या वाहनाची गरज काय, असा प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित करून अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदीचा ठराव रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.देसाईगंज नगर पालिकेची सर्वसाधारण सभा १४ नोव्हेंबर २०१७ ला घेण्यात आली. या सभेत विषय क्रमांक ६३/२ नुसार अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याचा ठराव घेण्यात आला. परंतु ठरावानुसार अग्निशामक यंत्र ज्या कंपनीकडून खरेदी केले जाणार आहे, त्या कंपनीच्या वाहनाची खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक आहे. देसाईगंज शहरात अग्निशामक वाहन खरेदी करण्यापेक्षा पालिका क्षेत्रातील अनेक समस्या आहेत. तसेच आवश्यक सोयीसुविधाही अनेक वॉर्डांमध्ये नाही. वाहनावर खर्च होणारा निधी विकास कामांसाठी लावल्यास शहराचा विकास होण्यास मदत झाली असती, असे नगरसेवकांनी म्हटले आहे. अतिआवश्यक सेवा सोडून अग्निशामक सुरक्षा वाहनाची गरज नसतानाही वाहन खरेदी करण्यात आले. तसेच ५९ लाख ८५ हजार रूपये वाहन खरेदीच्या रकमेत वस्तूंचे विवरणही देण्यात आले नाही. विशेष म्हणजे ४९ लाख ९० हजार रूपये किंमतीपासून अनेक कंपनींचे अग्निशामक वाहन बाजारात उपलब्ध आहेत.वाहन खरेदीत ९ ते १० लाख रूपयापर्यंतचा अधिक निधी खर्च केला जात असून शासनाच्या पैशाचा दुरूपयोग पालिकेकडून केला जात आहे. यात नगर परिषदेलाही आर्थिक भूर्दंड पडणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आलेला अग्निशामक यंत्र खरेदी करण्याचा ठराव रद्द करावा, अशी मागणी गटनेता हाजी मो. आरिफ खानानी, नगरसेवक गणेश फाफट, नगरसेवक हरीश मोटवानी, नगरसेविका भाविका तलमले, उत्तरा तुमराम यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेद्वारे केली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे.शहरात स्वर्गरथ व रुग्णवाहिकेची आवश्यकतादेसाईगंज नगर पालिका क्षेत्रातील मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याकरिता वैनगंगा नदीकाठावर न्यावे लागतात. मुख्यालयापासून सदर अंतर तीन किमीचे आहे. त्यामुळे पालिकेला स्वत:च्या मालकीचे एक स्वर्गरथ आवश्यक आहे. शिवाय नगरपालिकेत रुग्णवाहिकाही उपलब्ध नाही. पालिका क्षेत्रातील आजारी लोकांना खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे नगर पालिकेला रुग्णवाहिका व स्वर्गरथाची आवश्यकता आहे. अत्यंत निकडीच्या वस्तू खरेदी न करता पालिकेत उपलब्ध असलेल्या वस्तूंची खरेदी केली जात आहे, असा आरोपही नगरसेवकांनी प्रशासनावर केला आहे.