शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अग्निशामक खरेदी ठराव रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:35 IST

देसाईगंज नगरपालिकेने देवी फायर सर्व्हिसेस या कंपनीकडून ५९ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक असून खरेदी किंमत व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची मागणी : दोन वाहने असतानाही तिसरे खरेदी करीत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज नगरपालिकेने देवी फायर सर्व्हिसेस या कंपनीकडून ५९ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सदर खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक असून खरेदी किंमत व बाजारभाव यात खूप मोठी तफावत आहे. शिवाय नगर पालिकेकडे आधीच दोन अग्निशामक असताना तिसऱ्या वाहनाची गरज काय, असा प्रश्न काही नगरसेवकांनी उपस्थित करून अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदीचा ठराव रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.देसाईगंज नगर पालिकेची सर्वसाधारण सभा १४ नोव्हेंबर २०१७ ला घेण्यात आली. या सभेत विषय क्रमांक ६३/२ नुसार अग्निशामक सुरक्षा वाहन खरेदी करण्याचा ठराव घेण्यात आला. परंतु ठरावानुसार अग्निशामक यंत्र ज्या कंपनीकडून खरेदी केले जाणार आहे, त्या कंपनीच्या वाहनाची खरेदी किंमत बाजारभावापेक्षा अधिक आहे. देसाईगंज शहरात अग्निशामक वाहन खरेदी करण्यापेक्षा पालिका क्षेत्रातील अनेक समस्या आहेत. तसेच आवश्यक सोयीसुविधाही अनेक वॉर्डांमध्ये नाही. वाहनावर खर्च होणारा निधी विकास कामांसाठी लावल्यास शहराचा विकास होण्यास मदत झाली असती, असे नगरसेवकांनी म्हटले आहे. अतिआवश्यक सेवा सोडून अग्निशामक सुरक्षा वाहनाची गरज नसतानाही वाहन खरेदी करण्यात आले. तसेच ५९ लाख ८५ हजार रूपये वाहन खरेदीच्या रकमेत वस्तूंचे विवरणही देण्यात आले नाही. विशेष म्हणजे ४९ लाख ९० हजार रूपये किंमतीपासून अनेक कंपनींचे अग्निशामक वाहन बाजारात उपलब्ध आहेत.वाहन खरेदीत ९ ते १० लाख रूपयापर्यंतचा अधिक निधी खर्च केला जात असून शासनाच्या पैशाचा दुरूपयोग पालिकेकडून केला जात आहे. यात नगर परिषदेलाही आर्थिक भूर्दंड पडणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आलेला अग्निशामक यंत्र खरेदी करण्याचा ठराव रद्द करावा, अशी मागणी गटनेता हाजी मो. आरिफ खानानी, नगरसेवक गणेश फाफट, नगरसेवक हरीश मोटवानी, नगरसेविका भाविका तलमले, उत्तरा तुमराम यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेद्वारे केली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे.शहरात स्वर्गरथ व रुग्णवाहिकेची आवश्यकतादेसाईगंज नगर पालिका क्षेत्रातील मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याकरिता वैनगंगा नदीकाठावर न्यावे लागतात. मुख्यालयापासून सदर अंतर तीन किमीचे आहे. त्यामुळे पालिकेला स्वत:च्या मालकीचे एक स्वर्गरथ आवश्यक आहे. शिवाय नगरपालिकेत रुग्णवाहिकाही उपलब्ध नाही. पालिका क्षेत्रातील आजारी लोकांना खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे नगर पालिकेला रुग्णवाहिका व स्वर्गरथाची आवश्यकता आहे. अत्यंत निकडीच्या वस्तू खरेदी न करता पालिकेत उपलब्ध असलेल्या वस्तूंची खरेदी केली जात आहे, असा आरोपही नगरसेवकांनी प्रशासनावर केला आहे.