शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

सी-60 पथकाने नक्षल्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला, २६ नक्षलवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 07:13 IST

प्रथमच एकावेळी २६ नक्षल्यांचा वेध, आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई

ठळक मुद्दे२२ एप्रिलच्या चकमकीदरम्यान रात्रीच्या अंधारात इंद्रावती नदी पार करून छत्तीसगडकडे पळ काढण्याच्या प्रयत्नात काही नक्षलवाद्यांनी नदीपात्रात उड्या मारल्या; पण नदी पार करून पैलतीर गाठणे त्यांना शक्य झाले नाही. 

मनोज ताजने

गडचिरोली : नक्षल्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांकडून योजना आखणे सुरू होते; पण त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवत गडचिरोलीच्या सी-६० कमांडोंनी शनिवारी केलेली आक्रमक चढाई नक्षल्यांसाठी मोठा झटका ठरली आहे. विशेष म्हणजे एकाच चकमकीत २६ नक्षलवादी मारले जाण्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली आहे. त्यामुळे पोलिसांचे सी-६० कमांडो पथक पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाले आहे.

धानोरा उपविभागांतर्गत गॅरापत्ती पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत, कोरची तालुक्यातील मदीनटोला जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे शिबिर लागले असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून पोलिसांना मिळाली होती. विशेष म्हणजे त्यात नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे हासुद्धा असण्याची शक्यता असल्यामुळे सी-६० कमांडो आणि विशेष कृती दलाच्या मिळून जवळपास ३०० कमांडोंनी शुक्रवारच्या रात्रीपासूनच शोधमोहीम सुरू केली होती. शनिवारच्या सकाळी चकमकीला सुरुवात झाली.

नक्षल्यांकडून गोळीबार करून पोलिसांना आपल्याकडे येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न सुरू होता; पण सी-६० पथकाने जिवाची बाजी लावत नक्षल्यांच्या दिशेने आगेकुच सुरूच ठेवली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत ही चकमक सुरूच होती. सतत इतका वेळ चालत राहिलेली ही पहिलीच चकमक ठरली आहे, हे विशेष. यापूर्वी २२ ते २५ एप्रिल २०१८ यादरम्यान भामरागड तालुक्यातील कसनासूर-बोरिया, नैनेरच्या जंगलात दोन वेळा झालेल्या चकमकीनंतर ३९ नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले होते. त्या चकमकीनंतर पहिल्या दिवशी १६ मृतदेह हाती लागले होते. त्यानंतर दोन मृतदेह सापडले. याशिवाय दोन दिवसांनंतर १५ मृतदेह इंद्रावती नदीच्या पात्रात सापडले होते. त्या मृतदेहांचा मगरींनी आणि मासोळ्यांनी फडशा पाडला होता. त्यामुळे त्यांचा मृत्यू पोलिसांच्या गोळीने झाला की, नदीत बुडून, हे स्पष्ट होऊ शकले नाही. २२ एप्रिलच्या चकमकीदरम्यान रात्रीच्या अंधारात इंद्रावती नदी पार करून छत्तीसगडकडे पळ काढण्याच्या प्रयत्नात काही नक्षलवाद्यांनी नदीपात्रात उड्या मारल्या; पण नदी पार करून पैलतीर गाठणे त्यांना शक्य झाले नाही. 

nअत्यंत विपरीत परिस्थितीत, जंगलात नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी १९९२ मध्ये सी-६० (कमांडे ६०) या विशेष प्रशिक्षित पोलिसांच्या पथकाची निर्मिती केली. nगडचिरोली तत्कालीन पोलीस अधीक्षक के.पी. रघुवंशी यांच्या कल्पनेतून या पथकाची निर्मिती केली. 

nसी-६० कमांडोंच्या अनेक तुकड्या गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांत नक्षलविरोधी अभियानासाठी कार्यरत आहेत. nविशेष म्हणजे तेलंगणा, छत्तीसगड, ओरिसा या राज्यांमध्येही नक्षलविरोधी अभियानासाठी त्या राज्यांच्या पोलिसांची वेगवेगळी कमांडो पथके आहेत. nगेल्या ४-५ वर्षांतील कारवायांमध्ये महाराष्ट्र पोलिसांचे सी-६० कमांडो पथक सरस ठरले आहे.

ते बक्षीस कोणाला ?चकमकीत ठार झालेल्या २६ पैकी ज्या १६ नक्षलवाद्यांची ओळख पटली त्यांच्या शिरावर राज्य शासनाने ठेवलेले १.५४ कोटींचे बक्षीस कोणाला मिळणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ज्यांनी नक्षल्यांबाबत माहिती दिली होती त्यांना हे बक्षीस दिले जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.या कारवाईत सहभागी सी-६० कमांडोंना आणि पोलीस अधिकाऱ्यांना इन्सेन्टिव्ह आणि प्रमोशन दिले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाकडे जातो. त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाते. दरम्यान, सी-६० कमांडोंचे गडचिरोली पोलीस मुख्यालयात आगमन झाल्यानंतर त्यांचे पोलिसांकडून वाजतगाजत स्वागत करण्यात आले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली