शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख क्विंटल धानाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:23 IST

जिल्ह्यात यावर्षी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत आतापर्यंत जवळपास दिड लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. २९ कोटींच्या या धानापैकी जवळपास १५ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

ठळक मुद्दे१५ कोटींचे चुकारे दिले : पुढील आठवड्यात सुरू होणार सर्व खरेदी केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात यावर्षी आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत आतापर्यंत जवळपास दिड लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. २९ कोटींच्या या धानापैकी जवळपास १५ कोटींचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील १९ खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाहीत. ते पुढील आठवड्यात सुरू होणार आहेत.खरीप हंगामातील धानाची कापणी होऊन बहुतांश भागात मळणीही आटोपत आली आहे. दक्षिण गडचिरोली भागातल्या सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी आणि मुलचेरा या पाच तालुक्यातील ३४ पैकी १९ खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाहीत. याशिवाय मार्केटिंग फेडरेशनचे ४ खरेदी केंद्र सुरू व्हायचे आहेत. जिल्हाभरातील एकूण १०१ मंजूर खरेदी केंद्रांपैकी ७८ केंद्र सुरू झाले आहेत.आदिवासी विकास महामंडळाचे जिल्हाभरात सर्वाधिक ८६ केंद्र मंजूर आहेत. त्यापैकी गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५२ केंद्र असून ते सर्वच केंद्र सुरू झाले आहेत. मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदीसाठी १५ केंद्र मंजूर आहेत. त्यापैकी ११ केंद्र सुरू असून चार केंद्र गोदाम उपलब्ध झाले नसल्यामुळे अद्याप सुरू झालेले नाहीत. मार्केटिंग फेडरेशन खरेदी केलेला सर्व धान गोदामातच ठेवते हे विशेष. गोदामाची व्यवस्था होईपर्यंत धानाची खरेदी सुरूच केली जात नाही.विशेष म्हणजे यावर्षी ‘ए’ ग्रेडचा धान अद्याप कोणत्याही केंद्रावर आलेला नाही. खरेदी केलेला संपूर्ण धान साधारण ग्रेडचा आहे. आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांना ९ कोटी ४४ लाख ४० हजार रुपयांचे चुकारे केले आहे तर मार्केटिंग फेडरेशनने ५ कोटी ५३ लाख ५२ हजार रुपयांचे चुकारे दिले आहेत.आठ केंद्रांवर आवकच नाहीअहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत ३४ केंद्र मंजूर आहेत. त्यापैकी १५ केंद्र सुरू झाले आहेत. मात्र ८ केंद्रांवर अद्याप शेतकºयांनी धानच आणलेला नाही. त्यात मुलचेरा तालुक्यातील इंदाराम, आलापल्ली व पेरमिली, मुलचेरा तालुक्यातील मुलचेरा, सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, भामरागड तालुक्यातील ताडगाव आणि कोठी तसेच एटापल्ली तालुक्यातील गेंदा व जाराबंडी या केंद्रांचा समावेश आहे. या भागात उशिरा धान निघत असल्यामुळे ही परिस्थिती असून पुढील आठवड्यात उर्वरित १९ केंद्र सुरू होतील, असे अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक मुलेवार यांनी सांगितले.यावर्षीही धान उघड्यावरआदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला धान सध्या संस्था, ग्रामपंचायती, कृषी विभाग आणि शासकीय गोदामांमध्ये साठवून ठेवला आहे. या गोदामांत ८० ते ९० हजार क्विंटल धान आहे. मात्र उर्वरित जवळपास ५० हजार क्विंटल धान उघड्यावरच आहे. यापुढे खरेदी होणारा धानही उघड्यावरच राहणार आहे.भरडाईसाठी ४९ प्रस्तावांना मंजुरीधानाच्या भरडाईसाठी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील ४९ राईस मिलर्सचे प्रस्ताव आदिवासी विकास महामंडळाकडे आले आहेत. त्या प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून करारनामे होताच धानाच्या भरडाईला सुरूवात होणार आहे. महामंडळाकडे धान साठविण्यासाठी पुरेशा प्रमाणात गोदामे नसल्यामुळे उघड्यावरच धान ठेवावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर भरडाईला सुरूवात होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.