शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रस्त्याच्या दुरवस्थेने बससेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:39 IST

तालुक्यातील मन्नेराजाराम-भामनपल्ली या मार्गाचे १० ते १२ वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर अनेकदा सदर मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात मुरूम व गिट्टी टाकून डागडुजी करण्यात आली. मात्र वाहनाच्या वर्दळीने व पावसामुळे सदर मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देमन्नेराजाराम-भामनपल्ली मार्ग उखडला : खासगी वाहनातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील मन्नेराजाराम-भामनपल्ली या मार्गाचे १० ते १२ वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर अनेकदा सदर मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात मुरूम व गिट्टी टाकून डागडुजी करण्यात आली. मात्र वाहनाच्या वर्दळीने व पावसामुळे सदर मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सदर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद झाली आहे. परिणामी मन्नेराजाराम परिसरातील शेकडो नागरिकांना दररोज खासगी वाहनाद्वारे याच खडतर मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.सद्य:स्थितीत मन्नेराजाराम-भामनपल्ली या डांबरी मार्गाची अवस्था खडीकरण मार्गासारखी झाली आहे. डांबरीकरण उखडल्यानंतर दुरूस्तीदरम्यान येथे डांबर टाकायला पाहिजे होते. मात्र मुरूम व गिट्टी तसेच मातीची मलमपट्टी करून कशीबशी या मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली. गेल्या १० वर्षात सदर मार्गाची एकदाही पक्की दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे सदर मार्गावर खड्ड्यांची आरास निर्माण झाली आहे. परिसरातील २० गावातील नागरिक याच मार्गाने आवागमन करतात. भामरागड तालुका मुख्यालयापासून ३२ किमी अंतरावरील ताडगावापासून २० किमी अंतर मन्नेराजाराम गावाचे आहे. जड वाहनांचे आवागमन नसताना सुध्दा मन्नेराजाराम मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्ता दुरूस्तीची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्यानंतर मुरूम व गिट्टी टाकून गतवर्षी या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली. त्यानंतर महामंडळाची बससेवा सुरू झाली. त्यानंतर डांबरी पॅचेस टाकून रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र काम सुरू करण्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी या कामाला विरोध करीत डांबराचे ड्रम जाळून टाकले. तेव्हापासून रस्ता दुरूस्तीच्या कामाकडे प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.मन्नेराजाराम-भामनपल्ली मार्गावर बससेवा सुरू होती. २० नागरिकांचा या मार्गावरून प्रवास सुरू होता. परंतु १५ आॅगस्टपासून रस्त्याच्या दुरवस्थेच्या कारणावरून महामंडळाची बसफेरी बंद झाली. सदर मार्गावरील खड्डे बुजविणे आवश्यक आहे. रस्ता दुरूस्तीबाबतचा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत पारीत करण्यात आला आहे. सदर ठराव पालकमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील नागरिकांचा खडतर प्रवास सुरू आहे. सदर गंभीर समस्येकडे जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी लक्ष घेऊन सदर मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.- रंगय्या मडावी,सरपंच, मन्नेराजाराम, ता.भामरागड