शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

रस्त्याच्या दुरवस्थेने बससेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:39 IST

तालुक्यातील मन्नेराजाराम-भामनपल्ली या मार्गाचे १० ते १२ वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर अनेकदा सदर मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात मुरूम व गिट्टी टाकून डागडुजी करण्यात आली. मात्र वाहनाच्या वर्दळीने व पावसामुळे सदर मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देमन्नेराजाराम-भामनपल्ली मार्ग उखडला : खासगी वाहनातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील मन्नेराजाराम-भामनपल्ली या मार्गाचे १० ते १२ वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर अनेकदा सदर मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात मुरूम व गिट्टी टाकून डागडुजी करण्यात आली. मात्र वाहनाच्या वर्दळीने व पावसामुळे सदर मार्गाची पूर्णत: दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सदर मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंद झाली आहे. परिणामी मन्नेराजाराम परिसरातील शेकडो नागरिकांना दररोज खासगी वाहनाद्वारे याच खडतर मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.सद्य:स्थितीत मन्नेराजाराम-भामनपल्ली या डांबरी मार्गाची अवस्था खडीकरण मार्गासारखी झाली आहे. डांबरीकरण उखडल्यानंतर दुरूस्तीदरम्यान येथे डांबर टाकायला पाहिजे होते. मात्र मुरूम व गिट्टी तसेच मातीची मलमपट्टी करून कशीबशी या मार्गाची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली. गेल्या १० वर्षात सदर मार्गाची एकदाही पक्की दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे सदर मार्गावर खड्ड्यांची आरास निर्माण झाली आहे. परिसरातील २० गावातील नागरिक याच मार्गाने आवागमन करतात. भामरागड तालुका मुख्यालयापासून ३२ किमी अंतरावरील ताडगावापासून २० किमी अंतर मन्नेराजाराम गावाचे आहे. जड वाहनांचे आवागमन नसताना सुध्दा मन्नेराजाराम मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्ता दुरूस्तीची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्यानंतर मुरूम व गिट्टी टाकून गतवर्षी या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली. त्यानंतर महामंडळाची बससेवा सुरू झाली. त्यानंतर डांबरी पॅचेस टाकून रस्ता दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र काम सुरू करण्यापूर्वीच नक्षलवाद्यांनी या कामाला विरोध करीत डांबराचे ड्रम जाळून टाकले. तेव्हापासून रस्ता दुरूस्तीच्या कामाकडे प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.मन्नेराजाराम-भामनपल्ली मार्गावर बससेवा सुरू होती. २० नागरिकांचा या मार्गावरून प्रवास सुरू होता. परंतु १५ आॅगस्टपासून रस्त्याच्या दुरवस्थेच्या कारणावरून महामंडळाची बसफेरी बंद झाली. सदर मार्गावरील खड्डे बुजविणे आवश्यक आहे. रस्ता दुरूस्तीबाबतचा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत पारीत करण्यात आला आहे. सदर ठराव पालकमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील नागरिकांचा खडतर प्रवास सुरू आहे. सदर गंभीर समस्येकडे जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी लक्ष घेऊन सदर मार्गाची पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.- रंगय्या मडावी,सरपंच, मन्नेराजाराम, ता.भामरागड