शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

साडेसहा दशकानंतर चारभट्टीत पोहोचली बस

By admin | Updated: December 7, 2015 05:33 IST

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष उलटले तरी कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील असलेल्या चारभट्टी

कुरखेडा : भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष उलटले तरी कुरखेडा तालुक्यातील अतिदुर्गम व संवेदनशील असलेल्या चारभट्टी गावासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे बससेवा सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे गावातील नागरिकांना दळणवळणासाठी प्रचंड पायपीट करावी लागत होती. स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे महामंडळाच्या गडचिरोली आगाराने रविवारपासून कुरखेडा-चारभट्टी बसफेरी सुरू केली आहे. स्वातंत्र्याच्या साडेसहा दशकानंतर दुर्गम चारभट्टी गावाला महामंडळाची बस पोहोचली. रविवारी कुरखेडा येथे जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट यांनी प्रथमच सुरू झालेल्या कुरखेडा-चारभट्टी बसफेरीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी प्रभाकर तुलावी, बसस्थानक प्रमुख राठोड, नरेंद्र किरणकर, सरपंच संजय दर्रो, उपसरपंच पितांबर बह्याळ, ग्रा.पं. सदस्य तुलाराम हलामी, रंजना तिरगम, सुगंधा मडावी, शामराव गोटा, करगसू कवडो, सुरेश कवडो, यशवंत मांडवे, ऋषी हलामी, वासुदेव निंबेकर, रमेश सरदारे, संदीप तिरगम, गजानन नाट आदीसह प्रवाशी व नागरिक उपस्थित होते. चारभट्टी गावासाठी महामंडळाने बससेवा सुरू केल्यामुळे चारभट्टी गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (तालुका प्रतिनिधी)विद्यार्थ्यांसह प्रवाशांची झाली सोय४चारभट्टी गावातील अनेक विद्यार्थी कुरखेडा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची ये-जा करण्यासाठी प्रचंड पायपीट होत होती. या समस्यची दखल घेऊन जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट व पं.स. सदस्य प्रभाकर तुलावी यांनी बसफेरीसाठी आगाराकडे पाठपुरावा केला. त्यामुळे बसफेरी सुरू झाली.