शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कोरचीत घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 23:48 IST

येथील विश्वनाथ नागोजी मोहुर्ले यांच्या घराला बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत घर जळून खाक झाले.

ठळक मुद्दे५० लाखांचे नुकसान : आठ पैकी सात खोल्यांमध्ये आग

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : येथील विश्वनाथ नागोजी मोहुर्ले यांच्या घराला बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत घर जळून खाक झाले.आग लागलेले घर हे चाळीप्रमाणे असून या घरी चरणदास खोब्रागडे, अशोक करंजेवार, प्रदीप नंदेश्वर, राजू नेवारे, मोहन इरले आदी भाड्याने राहत होते. दिवाळी असल्याने सर्वच कुटुंब बाहेरगावी गेल्या होत्या. दुपारी ३ वाजताच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. घरातून धूर निघत असल्याचे नागरिकांना दिसल्यानंतर नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. महेश जांभूळकर यांच्या पत्नी घरात स्वयंपाक करीत होत्या. ओरडण्याचा आवाज आल्यानंतर त्या घराबाहेर पडल्या. काही प्रमाणात साहित्यही बाहेर काढले. त्यामुळे त्यांचे साहित्य बचावले. मात्र इतर भाडेकरूंचे साहित्य जळून खाक झाले. नेमके किती रूपयांचे नुकसान झाले आहे, याचा निश्चित आकडा सांगता येत नसला तरी या घरात जवळपास १० भाडेकरू राहत होते. सर्वच भाडेकरू शासकीय कर्मचारी असल्याने प्रत्येकाच्या घरी टीव्ही, फ्रिज, अलमारी, गॅस, दागदागिणे, कपडे व इतर साहित्य होते. हे सर्व साहित्य जळाल्याने जवळपास ५० लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.आग लागल्याचे कळाल्यानंतर नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात आली नाही. आग लागल्याची माहिती कळताच पोलीस निरीक्षक गोरखनाथ दहिफडे, नायब तहसीलदार ओके, माजी नगराध्यक्ष नसरूद्दीन भामानी, उपाध्यक्ष कमलनारायण खंडेलाल, नंदकिशोर वैरागडे यांच्यासह गावातील नागरिक व वीज कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.नागरिकांनी मागच्या खिडक्या तोडून स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तरीही आठपैकी सात कर्मचाऱ्यांच्या खोलीतील साहित्य जळून खाक झाले. केवळ एका कर्मचाºयाचे साहित्य वाचले.

टॅग्स :fireआग